शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बारुळ परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:46 IST

बारुळ व परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली. त्यात अनेकांची घरे, शेतीचे, उभ्या पिकांचे, महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. बारुळसह परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबारुळ : बारुळ व परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली. त्यात अनेकांची घरे, शेतीचे, उभ्या पिकांचे, महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. बारुळसह परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी दिले आहेत.बारुळ, औराळा, चिखली, हळदा, सावळेश्वर, मंगलसांगवी, काटकळंबा, तेलूर, वळसंगवाडी यांसह परिसरातील गावांत २१ जून रोजी ५० मिमी तर २२ जून रोजी १४० मिमी पावसाची नोंद झाली. सलग अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नागरिक रात्री झोपेत असताना झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरांत पाणी जमा झाले. त्यात काही नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.या अतिवृष्टीत जवळपास ३०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील गाळ वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.आ. प्रताप पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे , तालुका कृषी अधिकारी देशमुख, उपविभागीय अभियंता श्रीसागर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, तहसीलदार अरुणा संगेवार, सरपंच शंकरराव नाईक यांनी बारुळ, औराळा, चिखली, सावळेश्वर, मंगलसांगवी येथील शेती व घरांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच काही नागरिकांना आ. चिखलीकर यांनी संसारोपयोगी साहित्यांसाठी आर्थिक मदत दिली. तर तहसीलदार संगेवार यांनी जवळपास १५० नागरिकांंना अन्नधान्य देण्याची सोय केली.----मदतीचा ओघबारुळ परिसरात सलग दोन दिवसांत २१० मिमी पाऊस झाला. वादळीवाºयामुळे महावितरणचे अनेक खांब व इतर साहित्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आ. प्रताप पाटील चिखलीकर व जि. प. सदस्य अ‍ॅड. विजय धोंडगे यांच्याकडून नुकसान झालेल्यांना संसारोपयोगी साहित्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.---कापसी- पिंपळदरी रस्त्यावरील पूल वाहून गेलामारतळा: परिसरात २२ जूनच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने धनज (खुर्द) येथील पूल पुराच्या पाण्याने तुटला तर कापसी-पिंपळदरी येथील पादचारी लोखंडी पूल वाहून गेल्याची घटना घडली. यामुळे येथील संपर्क तुटला असून अनेकांची शेती खरडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. कापसी मंडळात मृगाच्या प्रारंभीच जोरदार पाऊस झाला. गुरुवारी झालेल्या पावसाने पेरणीची लगबग सुरु झाली. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह रस्त्यांचे नुकसान झाले. यात धनज येथील पुलाचा काही भाग पुराने वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे तर पिंपळदरी-कापसी येथील लोखंडी पादचारी पूल वाहून गेल्याने अवघ्या दीड किमी अंतरासाठी चार किमीची पायपीट करावी लागते. कापसी मंडळात १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसfloodपूर