शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारुळ परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:46 IST

बारुळ व परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली. त्यात अनेकांची घरे, शेतीचे, उभ्या पिकांचे, महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. बारुळसह परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबारुळ : बारुळ व परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली. त्यात अनेकांची घरे, शेतीचे, उभ्या पिकांचे, महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. बारुळसह परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी दिले आहेत.बारुळ, औराळा, चिखली, हळदा, सावळेश्वर, मंगलसांगवी, काटकळंबा, तेलूर, वळसंगवाडी यांसह परिसरातील गावांत २१ जून रोजी ५० मिमी तर २२ जून रोजी १४० मिमी पावसाची नोंद झाली. सलग अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नागरिक रात्री झोपेत असताना झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरांत पाणी जमा झाले. त्यात काही नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.या अतिवृष्टीत जवळपास ३०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील गाळ वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.आ. प्रताप पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे , तालुका कृषी अधिकारी देशमुख, उपविभागीय अभियंता श्रीसागर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, तहसीलदार अरुणा संगेवार, सरपंच शंकरराव नाईक यांनी बारुळ, औराळा, चिखली, सावळेश्वर, मंगलसांगवी येथील शेती व घरांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच काही नागरिकांना आ. चिखलीकर यांनी संसारोपयोगी साहित्यांसाठी आर्थिक मदत दिली. तर तहसीलदार संगेवार यांनी जवळपास १५० नागरिकांंना अन्नधान्य देण्याची सोय केली.----मदतीचा ओघबारुळ परिसरात सलग दोन दिवसांत २१० मिमी पाऊस झाला. वादळीवाºयामुळे महावितरणचे अनेक खांब व इतर साहित्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आ. प्रताप पाटील चिखलीकर व जि. प. सदस्य अ‍ॅड. विजय धोंडगे यांच्याकडून नुकसान झालेल्यांना संसारोपयोगी साहित्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.---कापसी- पिंपळदरी रस्त्यावरील पूल वाहून गेलामारतळा: परिसरात २२ जूनच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने धनज (खुर्द) येथील पूल पुराच्या पाण्याने तुटला तर कापसी-पिंपळदरी येथील पादचारी लोखंडी पूल वाहून गेल्याची घटना घडली. यामुळे येथील संपर्क तुटला असून अनेकांची शेती खरडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. कापसी मंडळात मृगाच्या प्रारंभीच जोरदार पाऊस झाला. गुरुवारी झालेल्या पावसाने पेरणीची लगबग सुरु झाली. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह रस्त्यांचे नुकसान झाले. यात धनज येथील पुलाचा काही भाग पुराने वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे तर पिंपळदरी-कापसी येथील लोखंडी पादचारी पूल वाहून गेल्याने अवघ्या दीड किमी अंतरासाठी चार किमीची पायपीट करावी लागते. कापसी मंडळात १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसfloodपूर