शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महानगरपालिकेच्या करवाढीला विरोध नांदेडकरांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:18 IST

दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देशहरवासियांपुढे समस्यांचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आली आहे. करवाढीची कोणतीही घोषणा होण्यापूर्वीच अपेक्षित करवाढीला नागरिकांसह विविध राजकीय मंडळींकडून विरोध होत आहे.शहरात सध्या जीआयएस कंपनीकडून मालमत्तांचे मूल्यांकन केले जात आहे. शहरात प्रतिदिन १ ते दीड हजार मालमत्ताचे मूल्यांकन केले जात आहे. या मूल्यांकनानंतर मालमत्तधारकांना कराच्या नोटीस बजावल्या जाणार आहेत. प्रस्तावित करवाढ किती राहील? हे अद्यापही अस्पष्टच असले तरीही करवाढ होणार हे निश्चित आहे. रेडी रेकनर दरानुसार करवाढ झाल्यास ती विद्यमान कराच्या दुप्पट होईल. मात्र चालू कराच्या ४० टक्क्याहून अधिक करवाढ करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून जवळपास ४० टक्के करवाढ केली जाईल, असे संकेत दिले जात आहेत. प्रशासनाकडून मालमत्ताकराच्या नोटीसही तयारीही केली जात आहे. त्यात नवीन दरानुसार वाढीव अथवा कमी झालेला कर यापुढेही कर नोटीसीमध्येही वसूल केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हातात पडलेल्या कराच्या मागणी नोटीसमध्ये कमी-अधिक आकारणी झाल्यास ती पुढच्या कर आकारणीत वसूल केली जाणार आहे.महापालिकेच्या प्रस्तावित करवाढीस शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांनीही विरोध दर्शविला आहे. शिवसेनेचे एकमेव नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनीही करवाढ झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता महापालिकेने सुचविलेल्या करवाढीला सत्ताधारी कितपत स्वीकारतील, हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे.---काँग्रेसकडूनही करवाढीच्या नोटीसला विरोधच !सत्ताधारी काँग्रेसनेही प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या करवाढीच्या नोटीसला विरोध दर्शविला आहे. शहरातील मालमत्तांचे जीआयएसकडून फेरमूल्यांकन केले जात आहे. या फेरमूल्यांकनानंतर जी काही नैसर्गिक करवाढ होईल ती मान्य करण्यात येईल. मात्र प्रशासनाकडून फेरमूल्यांकनापूर्वीच दिल्या जाणाºया नोटीस या चुकीच्या असल्याचे सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी स्पष्ट केले. याबाबत महापौर शीलाताई भवरे, सभागृहनेते गाडीवाले यांनी आयुक्तांशी चर्चाही करत प्रस्तावित करवाढीस विरोध दर्शविला आहे. यापूर्वी शहरवासियावर रेडी रेकनर दरानुसार करवाढीचा मोठा बोजा बसला आहे. शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकनानुसार कर आकारणी करावी. मात्र त्यात कोणतीही वाढ करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडTaxकरNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका