शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दोन वर्षात केवळ साडेसातशे घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुटपुंजा निधी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आॅनलाईन प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील घरकुल योजनेला खिळ बसली असून १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळूनही दोन वर्षात केवळ ७४८ घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना नावालाच उरली आहे़जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून घरकुलांचे बांधकाम कासवगतीने सुरू आहेत़ केंद्र शासनाची ...

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनाजिल्ह्यात १५ हजार ५७१ लाभार्थ्यांंना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुटपुंजा निधी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आॅनलाईन प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील घरकुल योजनेला खिळ बसली असून १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळूनही दोन वर्षात केवळ ७४८ घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना नावालाच उरली आहे़जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून घरकुलांचे बांधकाम कासवगतीने सुरू आहेत़ केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेकडे पाहिले जाते़ या योजनेला २० नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रारंभ झाला़ ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे़ गोरगरीबांना आपल्या हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते़ या घरकुलात एक स्वयंपाक घर तसेच शौचालयाचा समावेश आहे़ २०११ च्या डाटामधून ग्रामसभेद्वारे या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते़ त्यानंतर चार टप्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत केला जातो़ लाभार्थ्यांना पहिला हप्ता ३० हजार तसेच दुसरा,तिसरा व चौथ्या टप्यातही ३० हजार रूपये असे एकुण १ लाख २० हजार रूपये दिले जातात़ जिल्ह्यासाठी १७ हजार ९३२ घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे़ दोन वर्षात केवळ ७४८ घरकुले पूर्ण झाले आहेत़लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत असली तरी त्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ आॅनलाईन प्रक्रियेत अनेकांची अर्ज त्रुटीत निघाले असून अपुºया कागदपत्रामुळे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे़ वाढत्या महागाईच्या काळात केवळ १ लाख २० हजार रूपयात घर बांधणे अशक्य झाले आहे़ विट, सिमेंट, वाळू यांचे भाव वाढले आहेत़ त्यात पहिला हप्ता ३० हजार रूपयाचा मिळत असल्याने पायाभरणीसाठी हा निधी अपुरा पडत आहे़ त्यामुळे घरकुलाचे बांधकाम दुसºया टप्यातच रेंगाळत आहे़ दुसºया हप्ताही ३० हजार रूपयांचा असल्याने बांधकामाला गती मिळत नाही़ त्यामुळे लाभार्थ्यांसाठी ही योजना डोकेदुखी ठरत आहे़ अनेकांना घर बांधण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे़४ घरकुल मंजुरी -अर्धापूर - २३०, भोकर-७६८, बिलोली- २०७४, देगलूर -१४०१, धर्माबाद -५८१, हदगाव -४२९, हिमायतनगर -६२५, कंधार -११०१, किनवट- १३२३, लोहा-८२४,माहूर - ७६८, मुदखेड- ४९४, मुखेड- २३००, नायगाव- १८४१, नांदेड -३६०, उमरी - ४५२़४बांधकाम पूर्ण झाले- अर्धापूर -३३, भोकर - ७, बिलोली- ७५, देगलूर -५२, धर्माबाद -६५, हदगाव -८, हिमायतनगर -९७, कंधार -२१, किनवट- ५१, लोहा-७, माहूर -६२, मुदखेड-२५, मुखेड-७३, नायगाव -३९, नांदेड-१२७, उमरी- ६़