शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

जिल्ह्यात एक हजार नागरिकांमागे फक्त एक पोलीस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

नांदेड : सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद घेऊन अहोरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलावर दिवसेंदिवस ताण ...

नांदेड : सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद घेऊन अहोरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलावर दिवसेंदिवस ताण वाढतच चालला आहे. ३६ लाख लोकसंख्येच्या नांदेड जिल्ह्यात आजघडीला केवळ साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे १ हजार २८ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे. येत्या पोलीस भरती प्रक्रियेत जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या अधिक जागा भरण्याची गरज आहे.

जिल्ह्यात सध्या ३६ पोलीस ठाणी आहेत. त्यातही माहूर, किनवट असे दुर्गम तालुकेही आहेत. तर जिल्ह्याच्या सीमा शेजारील विदर्भ आणि तेलंगणाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. यापूर्वी चंद्रकिशोर मीणा यांच्या काळात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हजार नागरिकांमध्ये एक पोलीस कर्मचारी आहे. त्यातही बंदोबस्तासाठीच अधिक वेळ जात असल्याने गुन्ह्यांचा तपास रखडतो. नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांत लूटमारी, खंडणी, चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अतिरिक्त कर्मचारी मिळाल्यास पोलीस दलाला बुस्टर मिळेल. परंतु दरवर्षी होणारी भरती पाहता, या वेळी जिल्ह्याला पुरेसे मनुष्यबळ मिळण्याची अपेक्षा कमीच आहे.

नांदेड जिल्हा संवेदनशील आहे. या ठिकाणी किरकोळ कारणावरून मोठ्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांना सारखे बंदोबस्तावर राहावे लागते. रात्रीची गस्त, सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक पोलिसांना मधुमेह, ब्लडप्रेशर यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. कर्तव्य बजाविताना कुटुंबाकडेही पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते.