शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एक हजार नागरिकांमागे फक्त एक पोलीस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

नांदेड : सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद घेऊन अहोरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलावर दिवसेंदिवस ताण ...

नांदेड : सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद घेऊन अहोरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलावर दिवसेंदिवस ताण वाढतच चालला आहे. ३६ लाख लोकसंख्येच्या नांदेड जिल्ह्यात आजघडीला केवळ साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे १ हजार २८ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे. येत्या पोलीस भरती प्रक्रियेत जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या अधिक जागा भरण्याची गरज आहे.

जिल्ह्यात सध्या ३६ पोलीस ठाणी आहेत. त्यातही माहूर, किनवट असे दुर्गम तालुकेही आहेत. तर जिल्ह्याच्या सीमा शेजारील विदर्भ आणि तेलंगणाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. यापूर्वी चंद्रकिशोर मीणा यांच्या काळात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हजार नागरिकांमध्ये एक पोलीस कर्मचारी आहे. त्यातही बंदोबस्तासाठीच अधिक वेळ जात असल्याने गुन्ह्यांचा तपास रखडतो. नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांत लूटमारी, खंडणी, चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अतिरिक्त कर्मचारी मिळाल्यास पोलीस दलाला बुस्टर मिळेल. परंतु दरवर्षी होणारी भरती पाहता, या वेळी जिल्ह्याला पुरेसे मनुष्यबळ मिळण्याची अपेक्षा कमीच आहे.

नांदेड जिल्हा संवेदनशील आहे. या ठिकाणी किरकोळ कारणावरून मोठ्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांना सारखे बंदोबस्तावर राहावे लागते. रात्रीची गस्त, सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक पोलिसांना मधुमेह, ब्लडप्रेशर यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. कर्तव्य बजाविताना कुटुंबाकडेही पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते.