शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावर निर्बंध हवेत, तरच शेतकऱ्यांना कंपन्या योग्य मोबदला देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:19 AM

लोकमत वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष पुरवणीच्या प्रकाशन निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे प्रतोद ...

लोकमत वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष पुरवणीच्या प्रकाशन निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, महापौर मोहिनी येवनकर, विजय येवनकर, काँग्रेस प्रवक्ता संतोष पांडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पीक विमा आणि आणेवारी पद्धतीचा संबंध नाही, त्याचबरोबर ज्या निकषातून पीक विमा दिला जातो, त्यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना मोबदला मिळत नाही. तसेच शासनाच्या वतीने बसविण्यात आलेल्या हवामान मोजणी यंत्रात नेहमीच काहीतरी तांत्रिक बिघाड असतो, अथवा ही यंत्रे हवेच्या विरुद्ध दिशेेने बसविलेली असतात. त्यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आराेपही माजी मंत्री सावंत यांनी केला. पंतप्रधान पीक विमा योजनेचे निकष पसंत नसल्याने गुजरातसह अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यात ही योजना लागू करण्यास नकार दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने बीड पॅटर्न स्वीकारणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे बीड पॅटर्न? शेतकरी बांधवांनी पीक विमा काढल्यानंतर त्यात १.५ टक्के ते २ टक्के हिस्सा शेतकरी भरतो. जर १०० कोटी प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागला तर ५० कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागली. उर्वरित ५० कोटींमध्ये कंपनीचा नफा अधिक प्रशासकीय खर्च धरुन २० कोटी कंपनीला राहतील. उर्वरित ३० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरण्यासाठी कंपनीनं राज्य सरकारला द्यावेत. या उलट ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येईल. त्यावेळी १०० कोटी प्रीमियम मिळालेल्या कंपनीला १५० कोटी खर्च करायचे असतील त्यावेळी कंपनीने ११० कोटी द्यावेत, राज्य सरकार वरचे ४० कोटी रुपये कंपन्यांना देईल. हा पॅटर्न बीड जिल्ह्यात राबवण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना बीड पॅटर्नप्रमाणे मिळावा अशी शिफारस केंद्राकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.