शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:45 IST

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़

नांदेड : बारूळ येथील चार तालुक्यांसाठी कामधेनू असलेल्या मानार प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा असल्यामुळे बिलोली, धर्माबाद, नायगाव या तीन तालुक्यांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ 

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पावरच चार तालुक्यांची तहान भागते़ त्यात कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यांचा समावेश आहे़ उपलब्ध असलेले ११ टक्के आरक्षित पाण्यात १ घनमीटर नायगावसाठी शिल्लक असून जि़ प़ विभाग पाणीपुरवठा ग्रामीण भागासाठी ५ घनमीटर ठेवण्यात आला आहे़ जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार उन्हाळ्यात पाणी देण्यात येईल, अशी माहिती मानार उपविभागीय अधिकारी बारूळचे एऩएमक़ुरेकर यांनी दिली़

मानार प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे़ मात्र प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे ही शेती आता कोरडवाहू झाली आहे़ पावसाळा चार महिन्यांवर असून अत्यल्प साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ उपलब्ध असलेल्या ११ टक्के पाणीसाठ्याची बाष्पीभवनामुळे पातळी कमी होणार आहे़ या प्रकल्पावर २०० भोई समाज कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो़ त्यात धर्मापुरी, बारूळ, कौठा, चिंचोली, बाचोटी, तेलूर, बहाद्दरपुरा आदी ठिकाणी या समाजाचे कुटुंब असून पाणीसाठा कमी झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे़ 

या प्रकल्पात डावा कालवा व उजवा कालवा असे दोन कालवे आहेत़ शासनाच्या आदेशानुसार उन्हाळी आरक्षित पाण्याची पाळी या कालव्यातून सोडली जाणार आहे़ त्यामुळे प्रकल्पात नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभागाचे आरक्षित पाणी सोडून उर्वरित पाण्यावर चार महिने काढावे लागणार आहे़ त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ 

आदेशानंतर पाणी देण्यात येईलजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आरक्षित नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभाग यांना मानार प्रकल्पातील पाणी देण्यात येईल - एऩएमक़ुरेकर, उपविभागीय अधिकारी, बारूळ

जमीन कोरडवाहू बनलीप्रकल्पात साठा कमी असल्यामुळे १२ महिने ओलित राहणारी जमीन आज कोरडवाहू बनली आहे - मोहन नाईक, शेतकरी़ 

मत्स्य व्यवसायावर परिणाम प्रकल्पात पाणी कमी असल्याने मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला आहे. - नारायण टोकलवाड     

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड