शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:45 IST

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़

नांदेड : बारूळ येथील चार तालुक्यांसाठी कामधेनू असलेल्या मानार प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा असल्यामुळे बिलोली, धर्माबाद, नायगाव या तीन तालुक्यांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ 

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पावरच चार तालुक्यांची तहान भागते़ त्यात कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यांचा समावेश आहे़ उपलब्ध असलेले ११ टक्के आरक्षित पाण्यात १ घनमीटर नायगावसाठी शिल्लक असून जि़ प़ विभाग पाणीपुरवठा ग्रामीण भागासाठी ५ घनमीटर ठेवण्यात आला आहे़ जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार उन्हाळ्यात पाणी देण्यात येईल, अशी माहिती मानार उपविभागीय अधिकारी बारूळचे एऩएमक़ुरेकर यांनी दिली़

मानार प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे़ मात्र प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे ही शेती आता कोरडवाहू झाली आहे़ पावसाळा चार महिन्यांवर असून अत्यल्प साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ उपलब्ध असलेल्या ११ टक्के पाणीसाठ्याची बाष्पीभवनामुळे पातळी कमी होणार आहे़ या प्रकल्पावर २०० भोई समाज कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो़ त्यात धर्मापुरी, बारूळ, कौठा, चिंचोली, बाचोटी, तेलूर, बहाद्दरपुरा आदी ठिकाणी या समाजाचे कुटुंब असून पाणीसाठा कमी झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे़ 

या प्रकल्पात डावा कालवा व उजवा कालवा असे दोन कालवे आहेत़ शासनाच्या आदेशानुसार उन्हाळी आरक्षित पाण्याची पाळी या कालव्यातून सोडली जाणार आहे़ त्यामुळे प्रकल्पात नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभागाचे आरक्षित पाणी सोडून उर्वरित पाण्यावर चार महिने काढावे लागणार आहे़ त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ 

आदेशानंतर पाणी देण्यात येईलजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आरक्षित नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभाग यांना मानार प्रकल्पातील पाणी देण्यात येईल - एऩएमक़ुरेकर, उपविभागीय अधिकारी, बारूळ

जमीन कोरडवाहू बनलीप्रकल्पात साठा कमी असल्यामुळे १२ महिने ओलित राहणारी जमीन आज कोरडवाहू बनली आहे - मोहन नाईक, शेतकरी़ 

मत्स्य व्यवसायावर परिणाम प्रकल्पात पाणी कमी असल्याने मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला आहे. - नारायण टोकलवाड     

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड