शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:45 IST

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़

नांदेड : बारूळ येथील चार तालुक्यांसाठी कामधेनू असलेल्या मानार प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा असल्यामुळे बिलोली, धर्माबाद, नायगाव या तीन तालुक्यांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ 

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पावरच चार तालुक्यांची तहान भागते़ त्यात कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यांचा समावेश आहे़ उपलब्ध असलेले ११ टक्के आरक्षित पाण्यात १ घनमीटर नायगावसाठी शिल्लक असून जि़ प़ विभाग पाणीपुरवठा ग्रामीण भागासाठी ५ घनमीटर ठेवण्यात आला आहे़ जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार उन्हाळ्यात पाणी देण्यात येईल, अशी माहिती मानार उपविभागीय अधिकारी बारूळचे एऩएमक़ुरेकर यांनी दिली़

मानार प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे़ मात्र प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे ही शेती आता कोरडवाहू झाली आहे़ पावसाळा चार महिन्यांवर असून अत्यल्प साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ उपलब्ध असलेल्या ११ टक्के पाणीसाठ्याची बाष्पीभवनामुळे पातळी कमी होणार आहे़ या प्रकल्पावर २०० भोई समाज कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो़ त्यात धर्मापुरी, बारूळ, कौठा, चिंचोली, बाचोटी, तेलूर, बहाद्दरपुरा आदी ठिकाणी या समाजाचे कुटुंब असून पाणीसाठा कमी झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे़ 

या प्रकल्पात डावा कालवा व उजवा कालवा असे दोन कालवे आहेत़ शासनाच्या आदेशानुसार उन्हाळी आरक्षित पाण्याची पाळी या कालव्यातून सोडली जाणार आहे़ त्यामुळे प्रकल्पात नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभागाचे आरक्षित पाणी सोडून उर्वरित पाण्यावर चार महिने काढावे लागणार आहे़ त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ 

आदेशानंतर पाणी देण्यात येईलजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आरक्षित नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभाग यांना मानार प्रकल्पातील पाणी देण्यात येईल - एऩएमक़ुरेकर, उपविभागीय अधिकारी, बारूळ

जमीन कोरडवाहू बनलीप्रकल्पात साठा कमी असल्यामुळे १२ महिने ओलित राहणारी जमीन आज कोरडवाहू बनली आहे - मोहन नाईक, शेतकरी़ 

मत्स्य व्यवसायावर परिणाम प्रकल्पात पाणी कमी असल्याने मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला आहे. - नारायण टोकलवाड     

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड