शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शौचालय बांधकामात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल, ७ महिन्यात बांधले तब्बल १ लाख १२ हजार शौचालये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 12:17 IST

नांदेड : जिल्ह्यात ग्रामीण भागातून गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल १ लाख १२ हजार २०३  शौचालय बांधून नांदेड जिल्ह्याने राज्यात ...

ठळक मुद्देयोजनेला गती देण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली गुरुवारपासून ५० टक्के शौचालयाचे उद्दिष्ट असलेल्या २१२ ग्रामपंचायतींसाठी ‘मिशन लक्षवेध’ हा उपक्रम राबविला जात आहे

नांदेड : जिल्ह्यात ग्रामीण भागातून गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल १ लाख १२ हजार २०३  शौचालय बांधून नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वलस्थान मिळविले आहे. या काळात योजनेला गती देण्यासाठी जिल्हाभर राबविण्यात विविध उपक्रम राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

शौचालय बांधकामात मागे असलेल्या नांदेड जिल्ह्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी विविध मिशन आणि उपक्रम राबवून शौचालय बांधकामाची गती वाढविली आहे. याला अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यामुळेच नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.  जिल्ह्यात १ लाख १२ हजार २०३ शौचालय बांधण्यात आली आहेत. दुस-या क्रमांकावर बीड जिल्हा असून या जिल्ह्याने १ लाख ११ हजार ८२० शौचालय बांधले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याने १ लाख १० हजार ६३६ शौचालय बांधले आहेत. औरंगाबाद विभागातील इतर जिल्ह्यांतून बांधलेले शौचालय- उस्मानाबाद जिल्हा- ८२ हजार ५८५, औरंगाबाद- ७९ हजार ५९, जालना- ७५ हजार ८४८ (हागणदारीमुक्त), हिंगोली- ४२ हजार ७२२, लातूर- ३५ हजार ५६० तर परभणी जिल्ह्यातून ३१ हजार ७२२ शौचालय बांधण्यात  आलेली  आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दौ-यादरम्यान मला स्वच्छतेची निकड लक्षात आली , त्यानंतर जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी- कर्मचारी यांच्या बैठका घेऊन नियोजन केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. या मोहिमेला चळवळीचे स्वरूप  देण्यासाठी ५० पर्यंत शौचालय बांधकाम करावयाच्या १८१ गावांमधून मिशन १८१, त्यानंतर फास्ट ट्रॅक ७५, मोठ्या गावांसाठी १३० ग्रामपंचायतींमधून मिशन दस अश्वमेध, चालू वर्षात एकही शौचालय  बांधकाम न केलेल्या ८८ ग्रामपंचायतीसाठी फोर्स फिनिक्स, फास्ट ट्रॅक १०० हे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. गुरुवारपासून ५० टक्के शौचालयाचे उद्दिष्ट असलेल्या २१२ ग्रामपंचायतींसाठी ‘मिशन लक्षवेध’ हा उपक्रम राबविला  जात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. पायाभूत सर्वेक्षणानुसार आता नांदेड जिल्ह्यात केवळ ९० हजार शौचालयांचे बांधकाम करणे शिल्लक असून येत्या डिसेंबरअखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा संकल्प केल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी  शिनगारे यांनी  दिली  आहे. 

जिल्ह्यात पाच तालुके हागणदारी मुक्तमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी शौचालय बांधकामासाठी राबविलेल्या  विविध उपक्रमांमुळेच आत्तापर्यंत  जिल्ह्यातील ५ तालुके हागणदारीमुक्त झाली आहेत. यात अधार्पूर, मुदखेड, धमार्बाद, माहूर आणि नांदेड या तालुक्यांचा समावेश आहे. या महिन्याअखेर जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर, हदगाव आणि उमरी हे तालुके हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. शौचालय बांधकाम करण्याच्या देशव्यापी स्वच्छ भारत मिशन उपक्रमाला नांदेड जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात  सहकार्य मिळाले आहे. विशेषत: जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,  अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील नागरिक यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. यामुळेच नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात राज्यात अव्वल ठरला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNandedनांदेड