शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

एनपीएससक्ती पूर्वी हिशोबाची पूर्तता होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:18 IST

नांदेड : शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना सन २००५नंतर एन.पी.एस. अर्थात राष्ट्रीय निवृत्ती योजना शासनाने लागू केली आहे. मात्र ...

नांदेड : शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना सन २००५नंतर एन.पी.एस. अर्थात राष्ट्रीय निवृत्ती योजना शासनाने लागू केली आहे. मात्र यापूर्वी असलेल्या डी.सी.पी.एस. योजनेचा हिशोब व अन्य बाबींची पूर्तता न करता नवीन योजनेचे फॉर्म भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सदर विषयाच्या आनुषंगाने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी शासनाला पत्र पाठविले आहे. या योजनेचे अर्ज भरण्याच्या पूर्वी सर्वबाबींची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. त्यात राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे सभासद करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी जमा झालेल्या रकमांचा पावत्यासह हिशोब, व्याजाची रक्कम, शासन हिस्सा त्यांच्या नवीन खात्यात वर्ग कराव्यात. त्यांना काही शंका असल्यास त्यांचे निराकरण करावे. त्यासाठी संबंधित कर्मचारी व संघटना यांच्याशी चर्चा घडवून आणावी ही सर्व कार्यवाही २८ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करावी व त्यानंतर त्यांच्याकडून नवीन योजनेचे फॉर्म भरून घ्यावे, असे शासन पत्रात स्पष्ट नमूद आहे. मात्र या निर्देशांना केराची टोपली दाखवत नांदेडसह अनेक जिल्ह्यांत शिक्षकांना फॉर्म भरण्याची सक्ती करत वेतन रोखण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे म्हटले आहे. सदर योजनेच्या जनजागृतीसाठी ऑनलाइन सभा लावावी, पूर्वीचा सर्व हिशोब द्यावा, राष्ट्रीय निवृत्ती योजनेत केंद्र सरकार जे लाभ त्यांच्या कर्मचाऱ्यांना देतात ते लाभ राज्य शासन आम्हाला देणार आहेत की नाही आदीबाबत स्पष्टता करावी. या मागण्यांची पूर्तता करूनच नवीन योजनेचे फॉर्म भरून घ्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, सर्व विभागांचे प्रधान सचिव यांच्याकडे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, राज्य नेते विजय भोगेकर, राज्य अध्यक्षा अल्का ठाकरे, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य प्रमुख संघटक भुपेश वाघ, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, राज्यकार्याध्यक्षा सुनंदा कल्याणकस्तुरे, राज्य कोषाध्यक्ष रुखमा पाटील, राज्य प्रमुख संघटक चंदा खांडरे, शिवशंकर सोमवंशी, युसुफ शेख, पी. पी. कौसल्ये, श्रीराम कलणे, ग. नु. जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबूराव माडगे, विनायक कल्याणकस्तुरे, बळीराम फाजगे, बी. टी. केंद्रे, जी. बी. मोरे, सुरेश मोकले, कविता गरुडकर यांनी केली आहे.