शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापालिकेची केळी मार्केटमधील व्यापाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:56 IST

जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देथकीत भाड्यासाठी पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे एकूण ४४ गाळे आहेत. त्यातील २४ गाळे हे फळ विक्रेत्यांना भाड्याने दिले आहेत. २० गाळे अद्यापही रिकामे आहेत. रिकामे असलेले गाळे भाजीपाला विक्रेत्यांना देण्याबाबत महापालिका धोरण ठरवित आहे. त्याचवेळी दोन वर्षांपासून भाडे थकलेल्या २४ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. सदर गाळेधारक हे फळ विक्रेते आहेत.केळी मार्केट येथून फळमार्केट विमानतळ परिसरातील म्हाळजा येथे दोन वर्षापूर्वी स्थलांतरीत झाले होते. या स्थलांतरानंतर गाळेधारकांनी केळी मार्केट येथील गाळे हे आपल्या ताब्यात ठेवले.विमानतळ परिसरातील सुरक्षेला धोकादायक असल्याच्या कारणावरुन महापालिकेने म्हाळजा परिसरातील फळ मार्केट हटविले.फळ तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागेचा शोध घेतला जात असताना दुसरीकडे थकीत असलेले भाडे वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी सदर दुकानांवर नोटीस डकवल्या आहेत. यामध्ये थकीत भाडे हे नवीन दरानुसार भरण्यासही सूचित करण्यात आले आहे. यापूर्वी सदर दुकानांना अडीच हजार रुपये भाडे होते.आता नव्या दराप्रमाणे गाळेधारकांना ८ हजार रुपये भाडे भरावे लागणार आहेत. या भाडेवाढीस फळ विक्रेत्यांनी विरोध केला आहे. इतके दिवस दुकाने बंद असताना आता नव्या दराप्रमाणे भाडे भरणे शक्य नसल्याचे व्यापाºयांनी म्हटले आहे. पण महापालिकेने आता स्पष्ट भूमिका घेत नव्या दराप्रमाणे भाडे ंआकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपाकडून या गाळ्यासंदर्भात निश्चितच भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गाळेधारक आता हे थकीत भाडे कधी भरतील हा प्रश्न आहे. भाडे न भरल्यास मनपाच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल.---भागिदारधारकांसाठी अभय योजनाशहरात महापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये जे गाळेधारक भागिदारीमध्ये व्यवसाय करतात अशा भागिदारधारकांसाठी महापालिकेने नाव परिवर्तनासाठी अभय योजना घोषित केली आहे. व्यापारी संकुलामध्ये भाडेपट्यावर देण्यात आलेले गाळे व मनपा मालकीच्या जागेमध्ये जे गाळेधारक भागिदारीत व्यवसाय करतात.सदर जागेच्या चालू बाजारभावाप्रमाणे एकूण किमतीच्या २५ टक्के रक्कम मनपात जमा करावी लागणार असून रक्कम जमा केल्यानंतरच नाव परिवर्तन होईल. व्यापारी संकुलामधील गाळेधारकांनी भागिदारी संपुष्टात आल्यानंतर सदर दुकान भागिदाराच्या नावे आल्यास त्याच्या नावे करण्यासाठी अर्ज करावे, असे महापालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक स. अजितपालसिंघ संधू यांनी कळविले आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका