शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

नांदेड महापालिकेची केळी मार्केटमधील व्यापाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:56 IST

जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देथकीत भाड्यासाठी पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे एकूण ४४ गाळे आहेत. त्यातील २४ गाळे हे फळ विक्रेत्यांना भाड्याने दिले आहेत. २० गाळे अद्यापही रिकामे आहेत. रिकामे असलेले गाळे भाजीपाला विक्रेत्यांना देण्याबाबत महापालिका धोरण ठरवित आहे. त्याचवेळी दोन वर्षांपासून भाडे थकलेल्या २४ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. सदर गाळेधारक हे फळ विक्रेते आहेत.केळी मार्केट येथून फळमार्केट विमानतळ परिसरातील म्हाळजा येथे दोन वर्षापूर्वी स्थलांतरीत झाले होते. या स्थलांतरानंतर गाळेधारकांनी केळी मार्केट येथील गाळे हे आपल्या ताब्यात ठेवले.विमानतळ परिसरातील सुरक्षेला धोकादायक असल्याच्या कारणावरुन महापालिकेने म्हाळजा परिसरातील फळ मार्केट हटविले.फळ तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागेचा शोध घेतला जात असताना दुसरीकडे थकीत असलेले भाडे वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी सदर दुकानांवर नोटीस डकवल्या आहेत. यामध्ये थकीत भाडे हे नवीन दरानुसार भरण्यासही सूचित करण्यात आले आहे. यापूर्वी सदर दुकानांना अडीच हजार रुपये भाडे होते.आता नव्या दराप्रमाणे गाळेधारकांना ८ हजार रुपये भाडे भरावे लागणार आहेत. या भाडेवाढीस फळ विक्रेत्यांनी विरोध केला आहे. इतके दिवस दुकाने बंद असताना आता नव्या दराप्रमाणे भाडे भरणे शक्य नसल्याचे व्यापाºयांनी म्हटले आहे. पण महापालिकेने आता स्पष्ट भूमिका घेत नव्या दराप्रमाणे भाडे ंआकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपाकडून या गाळ्यासंदर्भात निश्चितच भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गाळेधारक आता हे थकीत भाडे कधी भरतील हा प्रश्न आहे. भाडे न भरल्यास मनपाच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल.---भागिदारधारकांसाठी अभय योजनाशहरात महापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये जे गाळेधारक भागिदारीमध्ये व्यवसाय करतात अशा भागिदारधारकांसाठी महापालिकेने नाव परिवर्तनासाठी अभय योजना घोषित केली आहे. व्यापारी संकुलामध्ये भाडेपट्यावर देण्यात आलेले गाळे व मनपा मालकीच्या जागेमध्ये जे गाळेधारक भागिदारीत व्यवसाय करतात.सदर जागेच्या चालू बाजारभावाप्रमाणे एकूण किमतीच्या २५ टक्के रक्कम मनपात जमा करावी लागणार असून रक्कम जमा केल्यानंतरच नाव परिवर्तन होईल. व्यापारी संकुलामधील गाळेधारकांनी भागिदारी संपुष्टात आल्यानंतर सदर दुकान भागिदाराच्या नावे आल्यास त्याच्या नावे करण्यासाठी अर्ज करावे, असे महापालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक स. अजितपालसिंघ संधू यांनी कळविले आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका