शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 19:54 IST

बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री, सचिवांच्या पत्रांना उत्तर देईनात दीडशे टीएमसी पाणी समुद्रात

- अनुराग पोवळे

नांदेड : पोचमपाड धरणातून दीडशे टीएमसी पाणी समुद्रात सोडून दिल्यानंतरही बाभळी बंधाऱ्यात केवळ २.७४ टीएमसी पाणी अडवू देण्याबाबत तेलंगणा सरकारने अडेलतट्टू भूमिका घेतली  आहे.  राज्याच्या सचिवांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला तेलंगणा सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. या भूमिकेतून बाभळी बंधाऱ्याबाबतचा तेलंगणाचा आकस कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यातील सर्वच बंधारे, धरणे परतीच्या पावसाने भरल्याने गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तिकडे तेलंगणातील पोचमवाड धरणही १०० टक्के भरल्याने या धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या संमतीने बाभळीचे दरवाजे २९ आॅक्टोबरपूर्वीच बंद करण्याबाबत तेलंगणा राज्याशी चर्चा करण्यात येईल अशी भूमिका पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली होती. याबाबत चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  पाठपुरावा केला. 

महाराष्ट्राच्या सचिवांनी तेलंगणा राज्याच्या सचिवांना २० दिवसापूर्वी याबाबत एक पत्र लिहिले. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी स्वत: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पत्र लिहिले. मात्र त्यांच्या पत्रालाही प्रतिसाद दिला नाही.  नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनीही याविषयात निझामाबाद जिल्हा प्रशासनासह तेलंगणा सरकारशी पत्रव्यवहार केला होता. धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे २९ आॅक्टोबर २०१४ रोजी पूर्ण झालेल्या २.७४ टीएमसी क्षमतेच्या या बंधाऱ्याच्या वादात सर्वोच न्यायालयाने १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडावेत आणि २९ आॅक्टोबर रोजी दरवाजे बंद करावेत असा निर्णय दिला आहे. 

५ हजार ५०० दलघमीपाणी तेलंगणातमराठवाड्यातील जायकवाडीसह सर्वच प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आतापर्यंत विष्णूपुरी प्रकल्पातून ५ हजार ५०० दलघमीहून अधिक पाणी तेलंगणात सोडले. हे पाणी थेट निझामाबाद जिल्ह्यातील पोचमपाड  धरणात पोहोचते. पोचमपाड धरणही १०० टक्के भरल्याने या धरणातून दीडशे टीएमसी पाणी समुद्रात सोडून दिले आहे. मात्र, बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे. 

टॅग्स :NandedनांदेडDamधरणTelanganaतेलंगणा