शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

२६ दिवसांपासून निर्जळी, टँकरचा आर्थिक भुर्दंड; संतप्त नागरिक धडकले जिल्हा कचेरीवर

By श्रीनिवास भोसले | Updated: May 18, 2024 21:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून भागात पाणीपुरवठा करण्याचे दिले आश्वासन

नांदेड: शहरातील लगत असलेल्या वाडी बु.हद्दीत गेल्या २६ दिवसांपासून निर्जळी आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून वाडी बु.भागात पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून वाडी बु.ची ओळख आहे. शहरानजीक असल्यामुळे झपाट्याने या भागात लोकवस्ती वाढत आहे. ग्रामपंचायतीला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर वाडीचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. गेल्या २६ दिवसांपासून वाडी भागात नळाला थेंबभर पाणी आले नाही.

या भागातील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना मनपाने पाणीपुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हजारो रुपये मोजून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर टँकरसाठी पैसे नसलेल्या नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे वाडी बु.भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी वाडी ग्रामपंचायतीकडे असलेली थकबाकी वसूल करण्याबाबत मनपाशी चर्चा करणार असून सोमवारपासून या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस.एम.भांगे, सागर मेदकर, प्राचार्य राम जाधव, डॉ.दिलीप शिंदे, एस.व्ही.नळगे, पवन सगरळे, सूरज सगरळे, मोहित मेश्राम, योगेश कटके, अमोल गवळी, उषाताई मेदकर, सुनीता दासरे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Nandedनांदेड