शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

२६ दिवसांपासून निर्जळी, टँकरचा आर्थिक भुर्दंड; संतप्त नागरिक धडकले जिल्हा कचेरीवर

By श्रीनिवास भोसले | Updated: May 18, 2024 21:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून भागात पाणीपुरवठा करण्याचे दिले आश्वासन

नांदेड: शहरातील लगत असलेल्या वाडी बु.हद्दीत गेल्या २६ दिवसांपासून निर्जळी आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून वाडी बु.भागात पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून वाडी बु.ची ओळख आहे. शहरानजीक असल्यामुळे झपाट्याने या भागात लोकवस्ती वाढत आहे. ग्रामपंचायतीला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर वाडीचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. गेल्या २६ दिवसांपासून वाडी भागात नळाला थेंबभर पाणी आले नाही.

या भागातील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना मनपाने पाणीपुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हजारो रुपये मोजून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर टँकरसाठी पैसे नसलेल्या नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे वाडी बु.भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी वाडी ग्रामपंचायतीकडे असलेली थकबाकी वसूल करण्याबाबत मनपाशी चर्चा करणार असून सोमवारपासून या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस.एम.भांगे, सागर मेदकर, प्राचार्य राम जाधव, डॉ.दिलीप शिंदे, एस.व्ही.नळगे, पवन सगरळे, सूरज सगरळे, मोहित मेश्राम, योगेश कटके, अमोल गवळी, उषाताई मेदकर, सुनीता दासरे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Nandedनांदेड