शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

निराधारांचे अनुदान आता थेट खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:17 IST

जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षभरापासून बायोमेट्रीक मशीनवर वृद्ध निराधारांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे अनुदान रखडले होते. अशा निराधारांचे अनुदान आता थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देअडीच हजार लाभार्थ्यांचे ठसे उमटत नसल्याची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षभरापासून बायोमेट्रीक मशीनवर वृद्ध निराधारांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे अनुदान रखडले होते. अशा निराधारांचे अनुदान आता थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.शासनाच्या निर्देशाप्रमाणे निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने थेट गावात जावून वाटप केले जात होते. मात्र काही लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे बायोमेट्रीक मशीनवर उमटत नव्हते. परिणामी मागील वर्षभरापासून अशा जवळपास ४ हजारांहून अधिक निराधारांचे अनुदान वाटप रखडले होते. याबाबत शासनस्तरावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र निराधार अनुदानाअभावी आर्थिक विवंचनेत सापडले होते.बोटाचे ठसे उमटत नसल्याच्या अडचणीच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने बैठक घेऊन ज्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रीक मशीनवर ठसे उमटत नाहीत, अशा लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँकामध्ये जमा करण्याचे आदेश दिले. बँकेमार्फत हे अनुदान आता वाटप होणार आहे.या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी २ हजार ३५२ लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान त्या निराधारांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. मात्र अजूनही १ हजार ८५२ निराधारांचे बँकेमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया तहसीलस्तरावर सुरूच आहे.ज्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक पद्धतीने निराधार योजनेचे अनुदान प्राप्त झाले नाही अशा लाभार्थ्यांनी आपले आधार व बँक खात्याची झेरॉक्स त्या त्या तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यात संजय गांधी योजनेचे २१ हजार ५५० लाभार्थी आहेत तर श्रावणबाळ योजनेचे ३७ हजार १३५ लाभार्थी आहेत. जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचा २५ हजार ७३९ लाभार्थी लाभ घेतात तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे १५ लाभार्थी जिल्ह्यात आहेत.जिल्ह्यात राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत निराधारांचे अनुदान वाटप केले जाणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरील तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विजय अवधाने यांनी सांगितले. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर निराधारांच्या अनुदान वाटपास विलंब होणार नसल्याचे ते म्हणाले.एनएसएपी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची तयारीजिल्ह्यात राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. निराधारांचे अनुदान आता याच पोर्टल प्रणालीवर वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यात २५ हजार ७३९ लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेतात. यातील २३ हजार ७५९ लाभार्थ्यांचे आधार सिडींग करण्यात आले आहे. ही टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या २२३ लाभार्थ्यांचे आधार सिडींग केले. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या १०० टक्के लाभार्थ्यांचे सिडींग करण्यात आले आहे.