शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

समाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:23 IST

मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़

ठळक मुद्देमराठा युवकांशी संवाद : हर्षवर्धन जाधव यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़रविवारी ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’निमित्त नांदेडात आले असता त्यांनी मराठा युवकांशी संवाद साधला़ औरंगाबादचे प्रा़चंद्रकांत भराट, मानसोपचार तज्ज्ञ इशा झा, डॉ़शाम पाटील, विलास तांगडे यांच्यासह डॉ़संजय कदम, भागवत देवसरकर, पंजाबराव काळे, धनंजय सूर्यवंशी, शाम पाटील वडजे, अविनाश कदम, संदिप पावडे, मारूती देशमुख नरंगलकर, इंजि़पी़ आऱ देशमुख, माधव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक डॉ़संजय कदम यांनी केले़आरक्षणाच्या लढाईत अनेकांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन, स्वत:वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून घेतले आहेत़ ही लढाई एवढ्यावरच न थांबता मागील काही दिवसात मराठवाड्यात जवळपास २७ युवक-युवतींनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले़आत्महत्यांचे सत्र सुरूच असून ते कुठेतरी थांबले पाहिजे़ यासाठी एक मराठा बांधवा या नात्याने मराठवाड्यात ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’ काढली असल्याचे आ़ जाधव यांनी सांगितले़शांततेच्या मार्गाने अठावन्न मुकमोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाचा अंत न पाहता सरकारने समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत़ आरक्षण देण्यासाठी कोणत्याही अहवालाची गरज नसून विधिमंडळात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून हा प्रश्न मार्गी लावता येवू शकतो़ परंतु, राजकीय स्वार्थापोटी अनेकजण दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप आ़जाधव यांनी केला़ मराठा समाज आत्महत्या करीत असल्याचे पाहून सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण राजीनामा दिला़ परंतु, त्याचे काही मंडळी राजकारण करीत आहेत ते चुकीचे आहे़ मला समाजाचे नेतृत्व करायचे नाही किंवा कोणता राजकीय पक्ष काढायचा नाही़यात कुठलाही राजकीय स्वार्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ परंतु, मराठा समाज कोणत्याही एका पक्षाच्या मागे नसल्याने तो विविध पक्षात विखुरला गेल्याने लाखांमध्ये असूनही त्यांचा सरकारवर दबाव निर्माण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मराठा आरक्षणासाठी एकट्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नसून सर्वांनी समाजाला न्याय देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत आ़जाधव यांनी व्यक्त केले़---

  • तरूणांनो आत्महत्या नको; लढणे आपल्या रक्तात

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणे, रस्त्यावर उतरणे इतपर्यंत ठिक आहे़ परंतु, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलने आपल्या शोभणारे नाही़ आपण शिवरायांच्या रक्ताचे वंशज असून लढणे हे आपल्या रक्तात आहे़ त्यामुळे आत्महत्या न करता शासनावर अहिंसक, लोकशाही मार्गाने आपण दबाव आणू परंतु, आत्महत्या नको, असे आवाहन आ़हर्षवर्धन जाधव यांनी केले़

  • जीवन अनमोल आहे ते गमवू नका- इशा झा

जगण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात संषर्ष असतो़ परंतु, तो संघर्ष विकोपाला जावून आत्महत्या करणे हा पर्याय नाही़ आयुष्यातील संघर्षावर मार्ग शोधून जगणं गरजेचे आहे़ आत्महत्या हा पर्याय नाही, असे मत मानसोपचार तज्ज्ञ इशा झा यांनी व्यक्त केले़ कोणी नैराश्यात असेल आत्महत्येसारखे विचार मनात येत असतील तर त्यांना समुपदेशनसाठी आमच्यापर्यंत घेवून यावे़

टॅग्स :NandedनांदेडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv Senaशिवसेनाmarathaमराठा