शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

समाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:23 IST

मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़

ठळक मुद्देमराठा युवकांशी संवाद : हर्षवर्धन जाधव यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़रविवारी ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’निमित्त नांदेडात आले असता त्यांनी मराठा युवकांशी संवाद साधला़ औरंगाबादचे प्रा़चंद्रकांत भराट, मानसोपचार तज्ज्ञ इशा झा, डॉ़शाम पाटील, विलास तांगडे यांच्यासह डॉ़संजय कदम, भागवत देवसरकर, पंजाबराव काळे, धनंजय सूर्यवंशी, शाम पाटील वडजे, अविनाश कदम, संदिप पावडे, मारूती देशमुख नरंगलकर, इंजि़पी़ आऱ देशमुख, माधव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक डॉ़संजय कदम यांनी केले़आरक्षणाच्या लढाईत अनेकांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन, स्वत:वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून घेतले आहेत़ ही लढाई एवढ्यावरच न थांबता मागील काही दिवसात मराठवाड्यात जवळपास २७ युवक-युवतींनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले़आत्महत्यांचे सत्र सुरूच असून ते कुठेतरी थांबले पाहिजे़ यासाठी एक मराठा बांधवा या नात्याने मराठवाड्यात ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’ काढली असल्याचे आ़ जाधव यांनी सांगितले़शांततेच्या मार्गाने अठावन्न मुकमोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाचा अंत न पाहता सरकारने समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत़ आरक्षण देण्यासाठी कोणत्याही अहवालाची गरज नसून विधिमंडळात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून हा प्रश्न मार्गी लावता येवू शकतो़ परंतु, राजकीय स्वार्थापोटी अनेकजण दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप आ़जाधव यांनी केला़ मराठा समाज आत्महत्या करीत असल्याचे पाहून सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण राजीनामा दिला़ परंतु, त्याचे काही मंडळी राजकारण करीत आहेत ते चुकीचे आहे़ मला समाजाचे नेतृत्व करायचे नाही किंवा कोणता राजकीय पक्ष काढायचा नाही़यात कुठलाही राजकीय स्वार्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ परंतु, मराठा समाज कोणत्याही एका पक्षाच्या मागे नसल्याने तो विविध पक्षात विखुरला गेल्याने लाखांमध्ये असूनही त्यांचा सरकारवर दबाव निर्माण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मराठा आरक्षणासाठी एकट्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नसून सर्वांनी समाजाला न्याय देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत आ़जाधव यांनी व्यक्त केले़---

  • तरूणांनो आत्महत्या नको; लढणे आपल्या रक्तात

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणे, रस्त्यावर उतरणे इतपर्यंत ठिक आहे़ परंतु, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलने आपल्या शोभणारे नाही़ आपण शिवरायांच्या रक्ताचे वंशज असून लढणे हे आपल्या रक्तात आहे़ त्यामुळे आत्महत्या न करता शासनावर अहिंसक, लोकशाही मार्गाने आपण दबाव आणू परंतु, आत्महत्या नको, असे आवाहन आ़हर्षवर्धन जाधव यांनी केले़

  • जीवन अनमोल आहे ते गमवू नका- इशा झा

जगण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात संषर्ष असतो़ परंतु, तो संघर्ष विकोपाला जावून आत्महत्या करणे हा पर्याय नाही़ आयुष्यातील संघर्षावर मार्ग शोधून जगणं गरजेचे आहे़ आत्महत्या हा पर्याय नाही, असे मत मानसोपचार तज्ज्ञ इशा झा यांनी व्यक्त केले़ कोणी नैराश्यात असेल आत्महत्येसारखे विचार मनात येत असतील तर त्यांना समुपदेशनसाठी आमच्यापर्यंत घेवून यावे़

टॅग्स :NandedनांदेडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv Senaशिवसेनाmarathaमराठा