शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

देशात नैसर्गिक शेतीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:07 IST

मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे २० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात कृषी विभागाने जरी संबंधित कंपनीला क्लिनचीट दिली असली तरी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आज देशाला नैसर्गिक शेतीची गरज असल्याचे आम आदमी पार्टीचे ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले.

ठळक मुद्देब्रिगेडीअर सावंत : शेतक-यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे २० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात कृषी विभागाने जरी संबंधित कंपनीला क्लिनचीट दिली असली तरी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आज देशाला नैसर्गिक शेतीची गरज असल्याचे आम आदमी पार्टीचे ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते़ ते म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे देशातील नागरिकांशी खेळत आहेत. आज देशात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असल्याचे सांगत त्यांनी सीसीटीव्हीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यात आले. त्यासाठी ९०० कोटी रूपयांचा खर्च झाला. परंतु, आम आदमी पार्टीचे सरकार असलेल्या दिल्लीत मात्र अवघ्या २७२ कोटी रूपयांत दीड लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे ब्रिगेडीअर सावंत यांनी सांगितले.देशात आज नैसर्गिक शेतीची आवश्यकता आहे. यवतमाळ जिल्ह्यात रासायनिय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे २० शेतकºयांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात कृषी विभागाच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट औषध कंपनीला क्लीनचीट देण्यासाठी खटाटोप करण्यात आला़ परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याचे ते म्हणाले़भ्रष्टाचारमुक्त भारतसाठी आम आदमी पार्टी हा नवीन पर्याय असून येत्या ३१ मार्चपर्यंत पार्टी मजबूत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात वाटचाल सुरू करण्यात आली आहे़आतापर्यंत ४ तालुकाध्यक्ष, ३७ ग्राम कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात पक्षाची झपाट्याने वाढ होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे ३० एप्रिलपर्यंत राज्यातही पार्टी मजबूत करण्यासाठी बांधणी केली जात असल्याचे ब्रिगेडीअर सावंत म्हणाले, सांगितले. यावेळी मराठवाडा समन्वयक अजिंक्य शिंदे, धनंजय जोगदंड, बालाजी आबादार, शिवाजी हंबर्डे यांच्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.