शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नांदेड जिल्ह्यातील ३६ गावांत राष्ट्रीय पेयजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:40 IST

तालुक्यातील ३६ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आ.सुभाष साबणे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देगलूर तालुक्यातील ४७ तर बिलोली तालुक्यातील ३६ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी लावली बैठकीला हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यातील ३६ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आ.सुभाष साबणे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देगलूर तालुक्यातील ४७ तर बिलोली तालुक्यातील ३६ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेत करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने शनिवारी बिलोली तालुक्यातील पाणीपुरवठा समितीची बैठक झाली. या योजनेत समाविष्ट गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी बैठकीला हजेरी लावली. बैठकीत आ. साबणे यांनी योजनेची सर्व माहिती दिली व उपस्थितांशी संवाद साधला.नावीन्यपूर्ण माहिती देऊन योजनेतून आपल्या गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, जि. प. सदस्य संजय बेळगे, उपसभापती दत्तराम बोधने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ समन, तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे, तालुका संघटक शंकर मावलगे, व्यंकट गुजरवाड, नारायण राखे, गटविकास अधिकारी यू. डी. राहाटीकर, सदस्य संभाजी शेळके,शंकर यंकम, प्रयागबाई पा. जाधव, व्यंकटराव पा. गुजरीकर, मोहन पाटील, राजेंद्र रेड्डी, नायगाव पाणीपुरवठा उपअभियंता भोजराज, सुभाष कापावर, अशोक दगडे, गंगाधर प्रचंड, साहेबराव शिंदे, गंगाप्रसाद गंगोने, विस्तार अधिकारी मुसले आदी उपस्थित होते.

चार गावांना २ कोटी ३८ लाख मंजूरबडूर: बिलोली तालुक्यातील रामतीर्थ जि. प. गटात येणाऱ्या मुतन्याळ,थडीसावळी,खतगाव व किनाळा या गावातील पाणीपुरवठा व पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २ कोटी ३८ लाखांहून अधिक निधी प्राप्त झाल्याची माहीती आ.सुभाष साबणे यांनी राष्ट्रीय पेयजल आढावा बैठकीत दिली.देशातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई, समस्या दूर करण्याच्या हेतूने शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेस सुरुवात केली आहे. ज्यात ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दररोज ४० लिटर पाणी वापरण्याबाबतची सविस्तर माहिती तसेच थोड्याच दिवसांत तालुक्यातील ३३ गावांच्या प्रस्तावास मंजुरी मिळणार आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेत गावाचे नाव सामाविष्ट करण्याचा अर्ज पंचायत समितीकडे करण्याबाबतची माहीती आ. साबणे यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाºयांना दिली. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन प्रस्ताव मांडला. ४ गावांना मंजुरी मिळाली मात्र अन्य गावांना तात्काळ मंजुरी मिळणार असून हे काम अचारसंहिता लागण्यापूर्वी मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater transportजलवाहतूक