शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील ३६ गावांत राष्ट्रीय पेयजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:40 IST

तालुक्यातील ३६ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आ.सुभाष साबणे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देगलूर तालुक्यातील ४७ तर बिलोली तालुक्यातील ३६ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी लावली बैठकीला हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यातील ३६ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आ.सुभाष साबणे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देगलूर तालुक्यातील ४७ तर बिलोली तालुक्यातील ३६ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेत करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने शनिवारी बिलोली तालुक्यातील पाणीपुरवठा समितीची बैठक झाली. या योजनेत समाविष्ट गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी बैठकीला हजेरी लावली. बैठकीत आ. साबणे यांनी योजनेची सर्व माहिती दिली व उपस्थितांशी संवाद साधला.नावीन्यपूर्ण माहिती देऊन योजनेतून आपल्या गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, जि. प. सदस्य संजय बेळगे, उपसभापती दत्तराम बोधने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ समन, तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे, तालुका संघटक शंकर मावलगे, व्यंकट गुजरवाड, नारायण राखे, गटविकास अधिकारी यू. डी. राहाटीकर, सदस्य संभाजी शेळके,शंकर यंकम, प्रयागबाई पा. जाधव, व्यंकटराव पा. गुजरीकर, मोहन पाटील, राजेंद्र रेड्डी, नायगाव पाणीपुरवठा उपअभियंता भोजराज, सुभाष कापावर, अशोक दगडे, गंगाधर प्रचंड, साहेबराव शिंदे, गंगाप्रसाद गंगोने, विस्तार अधिकारी मुसले आदी उपस्थित होते.

चार गावांना २ कोटी ३८ लाख मंजूरबडूर: बिलोली तालुक्यातील रामतीर्थ जि. प. गटात येणाऱ्या मुतन्याळ,थडीसावळी,खतगाव व किनाळा या गावातील पाणीपुरवठा व पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २ कोटी ३८ लाखांहून अधिक निधी प्राप्त झाल्याची माहीती आ.सुभाष साबणे यांनी राष्ट्रीय पेयजल आढावा बैठकीत दिली.देशातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई, समस्या दूर करण्याच्या हेतूने शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेस सुरुवात केली आहे. ज्यात ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दररोज ४० लिटर पाणी वापरण्याबाबतची सविस्तर माहिती तसेच थोड्याच दिवसांत तालुक्यातील ३३ गावांच्या प्रस्तावास मंजुरी मिळणार आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेत गावाचे नाव सामाविष्ट करण्याचा अर्ज पंचायत समितीकडे करण्याबाबतची माहीती आ. साबणे यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाºयांना दिली. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन प्रस्ताव मांडला. ४ गावांना मंजुरी मिळाली मात्र अन्य गावांना तात्काळ मंजुरी मिळणार असून हे काम अचारसंहिता लागण्यापूर्वी मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater transportजलवाहतूक