शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

दोन तरुणींना बुडताना वाचवणा-या पार्डीच्या एजाजला राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:18 IST

पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला.

ठळक मुद्देदेशात २५ बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाफला हा शौर्य पुरस्कार मिळणार आहे. ३० एप्रिल२०१७ रोजी पार्डीनजीक असलेल्या नदीवरील बंधा-यात बुडणा-या २ तरुणींना त्याने वाचवले होते

पार्डी ( जि. नांदेड) : पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला. यंदा महाराष्ट्रातून हा पुरस्कार एकमेव एजाजला मिळाला. २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणा-या शानदार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार एजाजला दिला जाणार आहे. 

बुधवारी (दि. ६) या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणा-या दिल्ली येथील पथसंचलनामध्येही  सहभाग घेता येणार आहे. देशात २५ बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाफला हा शौर्य पुरस्कार मिळणार आहे. तसे पत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले. सदरील पत्राची प्रत पुरस्कारप्राप्त एजाज नदाफ यांस देऊन तहसील प्रशासनाच्या वतीने देऊन तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारीशेख शफिय्योद्दीन, पार्डी म.चे तलाठी माधव पाटील, माजी जि. प.सदस्य रामराव भालेराव, नागोराव भांगे पाटील, सय्यद युनूस पार्डीकर, पालक अ.रउफ नदाफ, अरबाज नदाफ आदी उपस्थित होते.

तरुणींना बुडताना वाचवले होते ३० एप्रिल२०१७ रोजी पार्डीनजीक असलेल्या नदीवरील बंधा-यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी चार तरुणी गेल्या होत्या. त्यांचा तोल गेल्यामुळे त्या पाण्यात बुडत होत्या. यावेळी  त्यांच्यासोबत असलेल्या बहिणीस ही बाब लक्षात आल्यानंतर तिने मदतीचा धावा केला. यावेळी नागरिक धावून गेले असता मदत मिळाल्यामुळे दोघींना वाचविण्यात यश आले़ तर दोघींचा मृत्यू झाला. यात एजाज नदाफ या बालकाने जिवाची पर्वा न करता दोघींचे प्राण वाचविले होते. एका विद्यार्थ्याच्या धाडस व समयसुचकतेमुळे दोन युवतीचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्याची दखल घेऊन तहसीलदार डॉ.अरविंद नरसीकर यांच्या मार्फत  भारतीय बालकल्याण परिषद दिल्ली यांना माहिती पाठविण्यात आली होती.

टॅग्स :Nandedनांदेड