शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरुणींना बुडताना वाचवणा-या पार्डीच्या एजाजला राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:18 IST

पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला.

ठळक मुद्देदेशात २५ बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाफला हा शौर्य पुरस्कार मिळणार आहे. ३० एप्रिल२०१७ रोजी पार्डीनजीक असलेल्या नदीवरील बंधा-यात बुडणा-या २ तरुणींना त्याने वाचवले होते

पार्डी ( जि. नांदेड) : पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला. यंदा महाराष्ट्रातून हा पुरस्कार एकमेव एजाजला मिळाला. २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणा-या शानदार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार एजाजला दिला जाणार आहे. 

बुधवारी (दि. ६) या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणा-या दिल्ली येथील पथसंचलनामध्येही  सहभाग घेता येणार आहे. देशात २५ बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाफला हा शौर्य पुरस्कार मिळणार आहे. तसे पत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले. सदरील पत्राची प्रत पुरस्कारप्राप्त एजाज नदाफ यांस देऊन तहसील प्रशासनाच्या वतीने देऊन तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारीशेख शफिय्योद्दीन, पार्डी म.चे तलाठी माधव पाटील, माजी जि. प.सदस्य रामराव भालेराव, नागोराव भांगे पाटील, सय्यद युनूस पार्डीकर, पालक अ.रउफ नदाफ, अरबाज नदाफ आदी उपस्थित होते.

तरुणींना बुडताना वाचवले होते ३० एप्रिल२०१७ रोजी पार्डीनजीक असलेल्या नदीवरील बंधा-यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी चार तरुणी गेल्या होत्या. त्यांचा तोल गेल्यामुळे त्या पाण्यात बुडत होत्या. यावेळी  त्यांच्यासोबत असलेल्या बहिणीस ही बाब लक्षात आल्यानंतर तिने मदतीचा धावा केला. यावेळी नागरिक धावून गेले असता मदत मिळाल्यामुळे दोघींना वाचविण्यात यश आले़ तर दोघींचा मृत्यू झाला. यात एजाज नदाफ या बालकाने जिवाची पर्वा न करता दोघींचे प्राण वाचविले होते. एका विद्यार्थ्याच्या धाडस व समयसुचकतेमुळे दोन युवतीचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्याची दखल घेऊन तहसीलदार डॉ.अरविंद नरसीकर यांच्या मार्फत  भारतीय बालकल्याण परिषद दिल्ली यांना माहिती पाठविण्यात आली होती.

टॅग्स :Nandedनांदेड