शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी नसोसवायफचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:18 AM

शैक्षणिक वर्ष २०१९-२०कोविड -१९च्या लॉकडाऊनमध्ये गेले आहे. पण, या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी ...

शैक्षणिक वर्ष २०१९-२०कोविड -१९च्या लॉकडाऊनमध्ये गेले आहे. पण, या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या पदवी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्या प्रमाणापेक्षा पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहे. तसेच या प्रमाणापेक्षा पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या जागा खूपच कमी आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या दुष्काळी व अविकसित जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी स्थापित केले होते. या चारही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची पहिलीच आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय व संकुलामध्ये पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा अल्प असल्याने त्यांना प्रवेश मिळू शकत नाही. या संदर्भात नसोसवायएफच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे चर्चा केली. पण, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. मागील दोन वर्षांपासून २० टक्क्यांपेक्षा अधिक जागा कुठलेही विद्यार्थी संघटनेची मागणी नसताना कुलगुरूंनी वाढविली आहे. मग याच शैक्षणिक वर्षात या नियमावर बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून का वंचित ठेवले जात आहे, असा सवाल केला आहे. २३ उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. हर्षवर्धन हे करणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा. सतीश वागरे यांनी केले आहे.