शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नांदेडच्या ‘आयआयबी’चा भारतात उच्चांक; सहा विद्यार्थ्यांना ३६० पैकी तब्बल ३५५ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 03:05 IST

IIB : आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

नांदेड : नीट परीक्षेच्या निकालात आयआयबीने यंदाही आपले वेगळेपण आणि उच्चांक कायम राखला आहे. आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला. तसेच जवळपास १ हजार ४० विद्यार्थ्यांनी ३०० हून अधिक गुण मिळविले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत आयआयबीच्या वतीने ‘गौरव गुणवंतांचा’ हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील हे होते तर उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे, भार्गव राजे यांची प्रमुख उपस्थिती होती़. आयआयबीचे संचालक पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात यंदा आयआयबीचे जवळपास दीड हजार विद्यार्थी एमबीबीएस प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.  कोणत्याही तक्रारीविना लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाबरोबर  घरपोहोच नोट्स आयआयबीने दिल्या. यातूनच आयआयबी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास नेहमीच सज्ज असते, हा विद्यार्थी-पालकांचा विश्वास वृद्धिंगत झाल्याचे त्यांनी सांगितले़ .  प्रास्ताविक आयआयबी अकॅडमीचे संचालक डॉ. महेश पाटील यांनी तर शेख सादिक यांनी आयआयबीच्या यशाचा आलेख मांडला. एकावेळी ५० विद्यार्थी व पालक अशी व्यवस्था करून सर्वांना मास्क व हॅण्डग्लोव्हज देण्यात आले़. यशस्वीतेसाठी संचालक प्रा. नरेश भोसले व टीम आयआयबीचे डॉ. प्रभाकर देशमुख, डॉ़. मधुश्री राऊत, प्रा. प्रदीप कुशवाह डॉ. शिवप्रसाद गुंडरे, डॉ.रामकिशन गुंडरे, डॉ.रामप्रसाद हरकल, प्रा. संजय लुकने, प्रा. अभिजित राक्षे, डॉ. अश्विन दापकेकर प्रा. डॉ. जयंत राऊत, प्रा. समीर कुलकर्णी, सल्लागार बालाजी कदम आणि व्यवस्थापक संतोष पाटील, अक्षय नळदकर, भास्कर पाटील, विश्वास पाटील आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, काही निवडक विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ़  विपीन इटणकर यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात गौरव करीत आयआयबीच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. (व्या. प्र.)

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नीटच्या तयारीसाठी राजस्थान, दिल्ली व इतर राज्यांत जाण्याची गरज नसून मागील काही वर्षांपासून आयआयबी नीटमध्ये नवनवीन विक्रम करण्याचे काम करत आहे़  यंदाही एकूण १०४० विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३०० पेक्षा अधिक गुण मिळविल आहेत़  तर एकूण ७२० पैकी ५०० हून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७२३ आहे़. 

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षण