शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या ‘आयआयबी’चा भारतात उच्चांक; सहा विद्यार्थ्यांना ३६० पैकी तब्बल ३५५ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 03:05 IST

IIB : आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

नांदेड : नीट परीक्षेच्या निकालात आयआयबीने यंदाही आपले वेगळेपण आणि उच्चांक कायम राखला आहे. आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला. तसेच जवळपास १ हजार ४० विद्यार्थ्यांनी ३०० हून अधिक गुण मिळविले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत आयआयबीच्या वतीने ‘गौरव गुणवंतांचा’ हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील हे होते तर उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे, भार्गव राजे यांची प्रमुख उपस्थिती होती़. आयआयबीचे संचालक पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात यंदा आयआयबीचे जवळपास दीड हजार विद्यार्थी एमबीबीएस प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.  कोणत्याही तक्रारीविना लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाबरोबर  घरपोहोच नोट्स आयआयबीने दिल्या. यातूनच आयआयबी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास नेहमीच सज्ज असते, हा विद्यार्थी-पालकांचा विश्वास वृद्धिंगत झाल्याचे त्यांनी सांगितले़ .  प्रास्ताविक आयआयबी अकॅडमीचे संचालक डॉ. महेश पाटील यांनी तर शेख सादिक यांनी आयआयबीच्या यशाचा आलेख मांडला. एकावेळी ५० विद्यार्थी व पालक अशी व्यवस्था करून सर्वांना मास्क व हॅण्डग्लोव्हज देण्यात आले़. यशस्वीतेसाठी संचालक प्रा. नरेश भोसले व टीम आयआयबीचे डॉ. प्रभाकर देशमुख, डॉ़. मधुश्री राऊत, प्रा. प्रदीप कुशवाह डॉ. शिवप्रसाद गुंडरे, डॉ.रामकिशन गुंडरे, डॉ.रामप्रसाद हरकल, प्रा. संजय लुकने, प्रा. अभिजित राक्षे, डॉ. अश्विन दापकेकर प्रा. डॉ. जयंत राऊत, प्रा. समीर कुलकर्णी, सल्लागार बालाजी कदम आणि व्यवस्थापक संतोष पाटील, अक्षय नळदकर, भास्कर पाटील, विश्वास पाटील आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, काही निवडक विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ़  विपीन इटणकर यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात गौरव करीत आयआयबीच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. (व्या. प्र.)

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नीटच्या तयारीसाठी राजस्थान, दिल्ली व इतर राज्यांत जाण्याची गरज नसून मागील काही वर्षांपासून आयआयबी नीटमध्ये नवनवीन विक्रम करण्याचे काम करत आहे़  यंदाही एकूण १०४० विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३०० पेक्षा अधिक गुण मिळविल आहेत़  तर एकूण ७२० पैकी ५०० हून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७२३ आहे़. 

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षण