शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नांदेडकरांची तहान भागणार; दिग्रस बंधाऱ्यातून पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:45 IST

जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली.

ठळक मुद्देदिग्रस बंधाऱ्यातून सोडलेल्या 25 दलघमी पाण्यापैकी 20 दलघमी पाणी उपलब्ध होईल

नांदेड़ - नांदेड शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी पहाटे 25 दलघमी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यासाठी होणारा विरोध लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.      नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी विष्णुपुरीतून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली. बंधाऱ्याची उभारणी करतानाच नांदेडसाठी या बंधाऱ्यात पाणी राखीव राहील अशी तरतूद करण्यात आली होती. पुढे पाणी मिळत गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून नांदेडला पाणी देण्यास स्थानिकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात पाणी घ्यावे लागत आहे. २२ जानेवारी २०२० रोजी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलनियोजन मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोमवारी पहाटे 5 वाजता बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. सकाळी 9.35 वाजता दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, करडीले, तहसीलदार ज्योती चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील माने यांची उपस्थिती होती.      दिग्रस बंधाऱ्यातून सोडलेल्या 25 दलघमी पाण्यापैकी 20 दलघमी पाणी उपलब्ध होईल अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. जुलै अखेरपर्यंचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे पाणी उपलब्ध झाल्याने मार्गी लागल्याचेही अंधारे म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका