शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

अचानक झाडाझडती, जिल्हा परिषद सीईओंचा लेटलतिफांना २९ कर्मचाऱ्यांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:16 IST

बुधवारी सकाळी १०च्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या एका खाजगी गाडीने जिल्हा परिषद मुख्यालयात दाखल झाल्या.

ठळक मुद्देयापूर्वी कर्मचाऱ्यांना तंबी दिलेली

नांदेड: दिवाळीच्या सलग तीन दिवस सुट्या मिळाल्यानंतरही जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयामध्ये वेळेमध्ये हजर राहिले नसल्याचे बुधवारी सकाळी उघड झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बुधवारी सकाळी १० वाजता विविध विभागांना भेटी दिल्या असता तब्बल २९ कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचाऱ्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे.

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने प्रत्येक शनिवार आणि रविवारी कर्मचाऱ्यांना सुटी मिळत आहे. या आठवड्यात तर रविवारला लागून सोमवार आणि मंगळवारीही दिवाळीची सुट्टी होती. त्यामुळे बुधवारी कार्यालयीन कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील, असा अंदाज होता. बुधवारी सकाळी १०च्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या एका खाजगी गाडीने जिल्हा परिषद मुख्यालयात दाखल झाल्या. कार्यालयात आल्याबरोबर त्यांनी मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.

वर्षा ठाकूर यांनी केलेल्या या अचानक पाहणी वेळी बांधकाम दक्षिण विभागाचे तब्बल १४ कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आढळले. याबरोबरच कृषि विभागाचे ३, समाजकल्याण २, बांधकाम उत्तर विभाग २, आरोग्य विभाग, शिक्षण माध्यमिक  विभाग, वित्त विभाग आणि ग्रामपंचायत विभागाचेही प्रत्येकी एक कर्मचारी गैरहजर होते. याबरोबरच लघु पाटबंधारे विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे प्रत्येकी २ कर्मचारी सकाळी १० वाजल्यानंतरही कार्यालयात दाखल झालेले नव्हते.  या सर्व २९ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश वर्षा ठाकूर यांनी दिले आहे. दरम्यान, या कार्यवाहीमुळे जिल्हा परिषद मुख्यालयातील लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यापूर्वी जि.प.चे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी जिल्हा परिषदेतील अनेक विभागांना भेटी देवून पाहणी केली होती. यावेळी अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी याबाबत त्यांना नोटिसाही बजाविल्या होत्या. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. दरम्यान, शासनाने कामकाज सुटसुटीत व्हावे आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी पाच दिवसांचा आठवडा केली. त्यामुळे दोन दिवस सुटी मिळते. परंतु ही सुट्टी लेटलतिफांना पुरेशी होत नसल्याचे दिसून येते. 

यापूर्वी कर्मचाऱ्यांना तंबी दिलेलीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी रुजू झाल्यानंतर काही दिवसातच जिल्हा परिषदेत अशाच प्रकारे अचानक तपासणी केली होती. त्यावेळीही अनेक कर्मचारी लेटलतीफ असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. परंतु त्यावेळी त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना यापुढे लेटलतीफपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात तंबी दिली होती. परंतु त्यानंतरही लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळा पाळण्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदNandedनांदेडEmployeeकर्मचारी