शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

अचानक झाडाझडती, जिल्हा परिषद सीईओंचा लेटलतिफांना २९ कर्मचाऱ्यांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:16 IST

बुधवारी सकाळी १०च्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या एका खाजगी गाडीने जिल्हा परिषद मुख्यालयात दाखल झाल्या.

ठळक मुद्देयापूर्वी कर्मचाऱ्यांना तंबी दिलेली

नांदेड: दिवाळीच्या सलग तीन दिवस सुट्या मिळाल्यानंतरही जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयामध्ये वेळेमध्ये हजर राहिले नसल्याचे बुधवारी सकाळी उघड झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बुधवारी सकाळी १० वाजता विविध विभागांना भेटी दिल्या असता तब्बल २९ कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचाऱ्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे.

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने प्रत्येक शनिवार आणि रविवारी कर्मचाऱ्यांना सुटी मिळत आहे. या आठवड्यात तर रविवारला लागून सोमवार आणि मंगळवारीही दिवाळीची सुट्टी होती. त्यामुळे बुधवारी कार्यालयीन कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील, असा अंदाज होता. बुधवारी सकाळी १०च्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या एका खाजगी गाडीने जिल्हा परिषद मुख्यालयात दाखल झाल्या. कार्यालयात आल्याबरोबर त्यांनी मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.

वर्षा ठाकूर यांनी केलेल्या या अचानक पाहणी वेळी बांधकाम दक्षिण विभागाचे तब्बल १४ कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आढळले. याबरोबरच कृषि विभागाचे ३, समाजकल्याण २, बांधकाम उत्तर विभाग २, आरोग्य विभाग, शिक्षण माध्यमिक  विभाग, वित्त विभाग आणि ग्रामपंचायत विभागाचेही प्रत्येकी एक कर्मचारी गैरहजर होते. याबरोबरच लघु पाटबंधारे विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे प्रत्येकी २ कर्मचारी सकाळी १० वाजल्यानंतरही कार्यालयात दाखल झालेले नव्हते.  या सर्व २९ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश वर्षा ठाकूर यांनी दिले आहे. दरम्यान, या कार्यवाहीमुळे जिल्हा परिषद मुख्यालयातील लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यापूर्वी जि.प.चे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी जिल्हा परिषदेतील अनेक विभागांना भेटी देवून पाहणी केली होती. यावेळी अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी याबाबत त्यांना नोटिसाही बजाविल्या होत्या. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. दरम्यान, शासनाने कामकाज सुटसुटीत व्हावे आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी पाच दिवसांचा आठवडा केली. त्यामुळे दोन दिवस सुटी मिळते. परंतु ही सुट्टी लेटलतिफांना पुरेशी होत नसल्याचे दिसून येते. 

यापूर्वी कर्मचाऱ्यांना तंबी दिलेलीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी रुजू झाल्यानंतर काही दिवसातच जिल्हा परिषदेत अशाच प्रकारे अचानक तपासणी केली होती. त्यावेळीही अनेक कर्मचारी लेटलतीफ असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. परंतु त्यावेळी त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना यापुढे लेटलतीफपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात तंबी दिली होती. परंतु त्यानंतरही लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळा पाळण्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदNandedनांदेडEmployeeकर्मचारी