शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदेडमध्ये फक्त ९३२ शेतकऱ्यांनी भरला रबीचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 19:42 IST

विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ मिळाल्याने दिलासा

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना 

नांदेड : प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात रबी हंगाम २०१९-२० मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ९३२ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे़ त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी आता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे़ अधिक माहितीसाठी बँकेशी किंवा जवळच्या तालुका कृषी आधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

या योजनेतंर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असून, रबी हंगामातील पिकासाठी १़५ टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेतंर्गत जोखीमस्तर सर्व्हे पिकासाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट, काढणीपश्चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील गहू (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकासाठी ही योजना लागू आहे.

या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे राहील. पीक- गहू बा.- विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३५ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ५२५ रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड (सर्व महसूल मंडळ). तालुकास्तरीय कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर. ज्वारी- विमा संरक्षित रक्कम हेक्टरी २६ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३९० रुपये, विमा लागू असलेले तालुके बिलोली, धर्माबाद, मुखेड (सर्व महसूल मंडळ), अधिसूचना तालुकास्तरीय- देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट, हदगाव. हरभरा- विमा संरक्षित रक्कम हेक्टरी २४ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३६० रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट (सर्व महसूल मंडळ). अधिसूचना तालुकास्तरीय नायगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांना विमा लागू असेल. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, आजपर्यंत सेतू सुविधा केंद्रामार्फत केवळ ९३२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे़ तर बँकेकडे मात्र एकही शेतकरी फिरकला नाही़ आता पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत मिळाली आहे़ दरम्यान, मागील वर्षी पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली होती़ यंदा तसा प्रकार घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा