शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नांदेड महापालिका रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:43 IST

पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले

ठळक मुद्देगोदावरी प्रदुषण : प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत शहरातील मोठे १७ नाले सोडल्यामुळे गोदावरीचे प्रदुषण होत आहे़ याबाबत पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून प्रदुषण नियंत्रण मंडळाने तो अहवाल महापालिकेला पाठवून यावर उपाययोजना करण्याची सुचना केली आहे़ त्यामुळे गोदावरी प्रदुषणाबाबत महापालिका पुन्हा एकदा रडारवर आली आहे़शहरातील मलनिस्सारण प्रकल्प बंद असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गोदावरीत शहरातील सांडपाण्याचे १७ नाले थेट सोडण्यात येतात़ त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा झाला असून त्याला दुर्गंधीही सुटली आहे़ याबाबत पर्यावरण प्रेमींना अनेकवेळा निवेदनेही दिली़ परंतु त्याकडे दुर्लक्ष केले़ त्यात वर्षभरापूर्वी पालकमंत्री रामदास कदम यांनी गोदावरी नदीवरील घाटांना भेट देवून पाहणी केली होती़ यावेळी गोदावरीच्या प्रदुषणावरुन त्यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ व महापालिका या दोघांनाही धारेवर धरले होते़ तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाला पाण्याची तपासणीचे आदेश दिले होते़ या विषयाला वर्ष उलटल्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाला उशीरा का होईना शहाणपण सुचले आहे़ प्रदुषण नियंत्रण मंडळाने १ मे रोजी गोवर्धन घाट, शनी मंदिर, नगीनाघाट आदी परिसराची पाहणी करुन नाल्याच्या पाण्याचे नमुने घेतले होते़ या पाणी नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत़ त्यानुसार जिल्ह्यातील गोदावरी नदीचे ए-२ मध्ये वर्गीकरण आहे़ या पाण्याच्या पृथकरण अहवालाची ए-२ वर्गीकरणासाठी विहित केलेल्या मर्यादेशी तुलना केली असता, पाण्यातील बीओडी व सीओडीचे घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहेत़ गोदावरी नदीपात्राचे सर्वेक्षण केले असता, नाल्यामधील प्रक्रिया न केलेले सांडपाण्यामुळे गोदावरीतील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे़ त्यामुळे या प्रकरणात त्वरित उचित कार्यवाही करावी, असे पत्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मनपाला दिले आहे़ त्यामुळे नदीचे प्रदुषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या मनपाला प्रदुषण नियंत्रण मंडळाने हा आणखी एक दणका दिला आहे़२२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडेमहापालिकेने गोदावरीत मिसळणारे १७ नाल्यातील घाण पाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे़ हा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला़ या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर गोदावरील मिसळणाºया या घाण पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात ये आहे़ परंतु गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या कायम असून नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषणRamdas Kadamरामदास कदम