शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या शेतकऱ्याने दुष्काळातही रेशीम उद्योगामुळे साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:05 IST

यशकथा :  दुष्काळी परिस्थितीमधूनही अल्पभूधारक शेतकऱ्याने वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले.

- प्रा. शरद वाघमारे (मालेगाव, जि.नांदेड)

शेतकरी शेतात विविध पिकांची लागवड करताना पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेत असतात. यामुळे एकतर खर्च जास्त होतो अन् त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. दुष्काळी परिस्थिती, पिकांना योग्य भाव मिळत नाही, अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी अ‍ॅड. बालाजी माधवराव कदम या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात गेल्या चार वर्षांपासून रेशीम उद्योग सुरू केला आहे. दुष्काळी परिस्थितीमधूनही ते वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवीत आहेत. उत्पादित रेशमाला परराज्यात मोठी मागणी आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या बालाजी माधवराव कदम यांनी २०१४ साली दोन एकर शेतीमध्ये रेशीम उद्योग सुरू केला. यासाठी त्यांना रेशीम विकास विभागाकडून अनुदान मिळाले आहे. यात त्यांनी शेड व लोखंडी रॅक उभारले आहे. रेशीम उद्योगाची प्रक्रिया वीस दिवसांची आहे. ही प्रक्रिया चार अवस्थांमध्ये असते. एका दिवसात २५० अंडपुंजातून साठ ते सत्तर किलो कोष मिळतो. सद्य:स्थितीत बाजारात ४५० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दिवसाला तीन हजार रुपये मिळतात. यासाठी मजूरही खूप कमी लागतात. पहिल्या आठवड्यात दोन मजूरांवर काम भागते. रेशीम अळ्यांना दररोज सकाळी व संध्याकाळी खाद्य द्यावे लागते.

सुरुवातीला रेशीम उद्योग सुरू करताना केवळ दहा हजार इतक्या कमी प्रमाणात खर्च येतो. खत फवारणीला जास्त खर्च येत नाही. एप्रिल व मे महिन्यात पाण्याची कमतरता पडते. मात्र, या काळात पाणी मिळाले नाहीतर, तुतीच्या झाडावर परिणाम होतो. मात्र, ती झाडे मरत नाहीत. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय करता येतो. रेशीम व्यवसायात तुती लागवड, कीटक संगोपन, धागानिर्मिती आणि कापडनिर्मिती असे प्रामुख्याने चार प्रकारचे व्यवसाय करता येतात.

अल्पभूधारक शेतकरी कदम यांनी दोन एकर शेतात हा तुतीचा रेशीम उद्योग सुरू केला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील हा पहिला रेशीम उद्योग आहे.  तयार झालेले रेशीम कोष  बंगळुरू, हैदराबाद याठिकाणी विकल्या जातात. स्वत: शेतकरी बालाजी कदम रेशमाची विक्री करून रोख पैसे मिळवितात. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शेतात रेशीम उद्योग सुरू असून, वर्षाकाठी ते जवळजवळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवितात.

शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बघावे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योग क्षेत्रात शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असा सल्ला कदम यांनी दिला. सद्य:स्थितीत पर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिके हातचे जाण्याची वेळ आली आहे. उत्पादित पिकांना योग्य भाव मिळत नाही; परंतु रेशीम उद्योगात अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी