शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

नांदेडच्या शेतकऱ्याने दुष्काळातही रेशीम उद्योगामुळे साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:05 IST

यशकथा :  दुष्काळी परिस्थितीमधूनही अल्पभूधारक शेतकऱ्याने वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले.

- प्रा. शरद वाघमारे (मालेगाव, जि.नांदेड)

शेतकरी शेतात विविध पिकांची लागवड करताना पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेत असतात. यामुळे एकतर खर्च जास्त होतो अन् त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. दुष्काळी परिस्थिती, पिकांना योग्य भाव मिळत नाही, अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी अ‍ॅड. बालाजी माधवराव कदम या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात गेल्या चार वर्षांपासून रेशीम उद्योग सुरू केला आहे. दुष्काळी परिस्थितीमधूनही ते वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवीत आहेत. उत्पादित रेशमाला परराज्यात मोठी मागणी आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या बालाजी माधवराव कदम यांनी २०१४ साली दोन एकर शेतीमध्ये रेशीम उद्योग सुरू केला. यासाठी त्यांना रेशीम विकास विभागाकडून अनुदान मिळाले आहे. यात त्यांनी शेड व लोखंडी रॅक उभारले आहे. रेशीम उद्योगाची प्रक्रिया वीस दिवसांची आहे. ही प्रक्रिया चार अवस्थांमध्ये असते. एका दिवसात २५० अंडपुंजातून साठ ते सत्तर किलो कोष मिळतो. सद्य:स्थितीत बाजारात ४५० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दिवसाला तीन हजार रुपये मिळतात. यासाठी मजूरही खूप कमी लागतात. पहिल्या आठवड्यात दोन मजूरांवर काम भागते. रेशीम अळ्यांना दररोज सकाळी व संध्याकाळी खाद्य द्यावे लागते.

सुरुवातीला रेशीम उद्योग सुरू करताना केवळ दहा हजार इतक्या कमी प्रमाणात खर्च येतो. खत फवारणीला जास्त खर्च येत नाही. एप्रिल व मे महिन्यात पाण्याची कमतरता पडते. मात्र, या काळात पाणी मिळाले नाहीतर, तुतीच्या झाडावर परिणाम होतो. मात्र, ती झाडे मरत नाहीत. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय करता येतो. रेशीम व्यवसायात तुती लागवड, कीटक संगोपन, धागानिर्मिती आणि कापडनिर्मिती असे प्रामुख्याने चार प्रकारचे व्यवसाय करता येतात.

अल्पभूधारक शेतकरी कदम यांनी दोन एकर शेतात हा तुतीचा रेशीम उद्योग सुरू केला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील हा पहिला रेशीम उद्योग आहे.  तयार झालेले रेशीम कोष  बंगळुरू, हैदराबाद याठिकाणी विकल्या जातात. स्वत: शेतकरी बालाजी कदम रेशमाची विक्री करून रोख पैसे मिळवितात. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शेतात रेशीम उद्योग सुरू असून, वर्षाकाठी ते जवळजवळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवितात.

शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बघावे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योग क्षेत्रात शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असा सल्ला कदम यांनी दिला. सद्य:स्थितीत पर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिके हातचे जाण्याची वेळ आली आहे. उत्पादित पिकांना योग्य भाव मिळत नाही; परंतु रेशीम उद्योगात अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी