शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार हजेरीनंतर बळीराजाची पेरणीसाठी लगबग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 14:40 IST

जिल्ह्यात गुरूवारी पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ ७ मे रोजी जिल्ह्यात एकुण ५८२़७१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे़

ठळक मुद्देबळीराजाची खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे़.

- श्रीनिवास भोसले

नांदेड : जिल्ह्यात गुरूवारी पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ ७ मे रोजी जिल्ह्यात एकुण ५८२़७१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे़ सदर पावसामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे़ तर बळीराजाची खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे़.

नांदेड जिल्ह्यात मागील आठ दिवसात तीन ते चारवेळा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली़ वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने केळी, फळबागांचे नुकसान झाले़ परंतु, मृगाच्या अगोदर बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ दरम्यान, नांदेड तालुक्यातील खरबी, निळा, महिपाल पिंपरी, मालेगाव, अर्धापूर, हिमायतनगरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस आणि हळद लावगड सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ खरीपपूर्व मशागतीनंतर जमिनीवर आलेला काडी-कचरा उचलून रान निटनेटकं करण्यात महिला शेतकरी व्यस्त झाल्या आहेत़ थंड वातावरणामुळे आणि शेतात महिला-पुरूष शेतकऱ्यांची चहुबाजुने सुरू असलेली लगबग पहायला मिळत आहे़

दरम्यान, गुरूवारी जिल्ह्यात ५८२़७१ मि़मी पावसाची नोंद झाली़ यामध्ये नांदेड तालुका - २९ मिमी, मुदखेड - ४६़३३ मिमी, अर्धापूर - ३१़६७ मिमी, भोकर - ५४़५० मिमी, उमरी - २८ मिमी, कंधार - ३२़६७ मिमी, लोहा - २२़५० मिमी, किनवट - ३२़७१ मिमी, माहूर - ६७़५० मिमी, हदगाव - ६७़८६ मिमी, हिमायतनगर - ९३ मिमी, देगूलर -७़३३ मिमी, बिलोली - ११़२० मिमी, धर्माबाद - ५़६७ मिमी, नायगाव - २८़२० मिमी, मुखेड - २४़५७ पावसाची नोंद झाली आहे़ 

सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांना खुणावतोयमराठवाडा आणि विदर्भाची सीमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीवर इस्लापूर परिसरात असलेला सहस्त्रकुंड धबधबा गुरूवारी झालेल्या पावसाने ओसंडून वाहत आहे़ गतवर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने पर्यटकांना सहस्त्रकुंड धबधब्याचा फारसा आनंद घेता आला नव्हता़ परंतु, यंदा पहिल्याच पावसात सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगमदृष्य पर्यटकांना खुनावत आहे़

गुरूवारी मध्यरात्री हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील अनेक ठिकाणी नुकसान झाले़ अचानक आलेल्या धो-धो पावसाने नदी-नाल्यांना पाणी आले़ यामध्ये शेती साहित्य वाहून गेले़ तर शहर परिसरात २५ ते ३० मेंढ्या दगावल्याची माहिती आहे़  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र