शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दहावीतही पुन्हा मुलीच ठरल्या सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:00 IST

जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के तर मुलींचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या निकालाची तुलना करता यंदाही जवळपास तेवढाच निकाल लागला आहे.

ठळक मुद्देमुखेड तालुक्याचा सर्वाधिक निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के तर मुलींचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या निकालाची तुलना करता यंदाही जवळपास तेवढाच निकाल लागला आहे.तालुकानिहाय निकाल पाहता मुखेड तालुक्याचा सर्वाधिक ९२.२ टक्के इतका निकाल लागला आहे. नांदेड ८२.६३, अर्धापूर ७८.२५, भोकर ७६.९६, बिलोली ८८.२७, देगलूर ८५.९२, धर्माबाद ७७.९२, हदगाव ७३.४७, हिमायतनगर ७४.०१, कंधार ९१.२३, किनवट ८२.१२, लोहा ८३.२६, माहूर ८१.२८, नायगाव ८७.७३, उमरी ७७.०३ तर मुदखेड तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६९.६७ टक्के लागला आहे.परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील ६६० शाळांतील ४६ हजार १६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २४ हजार ४२९ मुले आणि २१ हजार ३२२ मुली अशा ४५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३७ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.उत्तीर्ण झालेल्यांमध्ये १९ हजार ५६० मुले तर १८ हजार ४२६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ४१७ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर १३ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे. दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ९९६ इतकी आहे.मार्चमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील ३ हजार ३२८ पुनर्परीक्षार्थिंंनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३ हजार २८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थिंच्या यशाचे प्रमाण ४१.२९ टक्के एवढे आहे. यात ३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळविले असून २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षेचा तालुकानिहाय निकाल पाहता नांदेड ३१.७८, अर्धापूर ३९.८३, भोकर २४, बिलोली ४२.३१, देगलूर ६०, धर्माबाद १३.२७, हदगाव २१.६०, हिमायतनगर १९.७२, कंधार ७३.०९, किनवट २९.९२, लोहा ४४.६०, माहूर ३९.७४, मुखेड ६३.८६, मुदखेड २४.४३, नायगाव ६७.६९ तर उमरी तालुक्यातील पुनर्परीक्षेचा निकाल ११.८६ टक्के इतका लागला आहे. पुनर्परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९६२ मुले तर ३९६ मुलींचा समावेश आहे.---लातूर विभागात नांदेड तिसºया स्थानावरइयत्ता दहावीचा लातूर विभागाचा निकाल ८६.३० टक्के इतका लागला असून यावेळी नांदेड जिल्हा निकालात तिसºया स्थानावर गेला आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक चांगला म्हणजेच ९०.२० टक्के एवढा लागला आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८५.६६ टक्के इतका लागला असून नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३.०३ टक्के तर मागील वर्षी निकाल ८३.०६ टक्के इतका होता.---८६.४२ टक्के मुली, ८०.०७ टक्के मुले उत्तीर्णदहावी परीक्षेच्या निकालाची आकडेवारी पाहता मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४२ टक्के तर मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६.३५ टक्के एवढे अधिक आहे. तालुकानिहाय मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी पाहता नांदेड ८५.२५, अर्धापूर ८५.२२, भोकर ७९.१७, बिलोली ९१.५०, देगलूर ८८.६७, धर्माबाद ८१.४३, हदगाव ७७.४५, हिमायतनगर ८१.१२, कंधार ९५ टक्के, किनवट ८५.२६ टक्के, लोहा ८७.६२, माहूर ८७.१६, मुखेड ९६.०५, मुदखेड ७६.७२, नायगाव ९१.५२ तर उमरीतील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे.

टॅग्स :NandedनांदेडSSC Results 2018दहावी निकाल २०१८