शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांत ५७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:31 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पात २१ दलघमी साठा अधिक

ठळक मुद्दे नांदेडकरांना मिळाला दिलासा

नांदेड : उशिरा का होईना जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू व उच्च पातळी बंधाºयांत पाणीसाठा उपलब्ध झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा २१ दलघमी साठा अधिक झाला आहे़ सर्व प्रकल्पांत ५७ टक्के उपयुक्त साठा असल्याची नोंद झाली असून विष्णूपुरी व मानार हे प्रकल्प तुडुंब भरले आहेत़ त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या अनेक गावांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे़ 

यंदा जून, जुलै व आॅगस्टमध्ये समाधानकारक पाऊस  न पडल्यामुळे   जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेच होते़ विष्णूपुरी प्रकल्पाची अवस्था बिकट झाली होती़ मागील १५ वर्षांत प्रथमच विष्णूपुरी प्रकल्पात शून्य टक्के साठा शिल्लक राहिला होता़ त्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट नांदेडसह, ग्रामीण भागात निर्माण झाले होते़ गत चार वर्षांपासून दुष्काळासोबत लढणाºया ग्रामीण भागातील नागरिकांसमोर यंदाही मोठे आव्हान निर्माण झाले होते़

 त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती़ नाशिक विभागात झालेल्या पावसाने गोदावरीचे नदीपात्र वाहू लागले़ त्यामुळे जायकवाडी धरण भरले़ या पाण्यामुळे अर्ध्या मराठवाड्याची तहान भागली़ मात्र नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प रिकामे होते़ दरम्यान,  जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलासा दिल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले असून नद्या, नाल्या व बंधारे भरले आहेत़ काही ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे़ गुरूवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्याची  टक्केवारी वाढली असून आतापर्यंत सरासरी ८७ टक्के पाऊस झाला आहे़ हस्ताच्या पावसाने ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे़ परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाची सरासरी वाढल्यास प्रकल्पातील साठ्यात होण्याची अपेक्षा आहे़ 

सध्या मानार प्रकल्पात उपयुक्त साठा १०२़६५ दलघमी, विष्णूपुरी प्रकल्पात ८०़७९,  नऊ मध्यम प्रकल्पांत ७०़२८, आठ  उच्च पातळी बंधाºयांत ५८़८० व ५८ लघू प्रकल्पांत १०५़३३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ मात्र चार कोल्हापुरी बंधारे अद्यापही कोरडेच आहेत़ मागील वर्षी २० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत ३९१़ ५६ दलघमी साठा उपलब्ध झाला होता. यावर्षी २० सप्टेंबरपर्यंत ४१८़३७ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे़ सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पांत गतवर्षीपेक्षा चांगला पाणीसाठा आहे़ त्यामुळे दिलासा मिळाला.

विष्णूपुरी प्रकल्पामधील पाणी उपसून लाभक्षेत्रातील गावतळ्यामध्ये व लाभक्षेत्रामध्ये सोडण्याची पायाभूत सुविधा आहे़ त्यामुळे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीन हंगामात हे पाणी उपसून ग्रामीण भागात सोडले जाऊ शकते़ परंतु त्यादृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे़

आतापर्यंत जिल्ह्यात ६८५ मि़मी़पाऊसयंदा मृगासह आर्द्रा व इतर नक्षत्र कोरडेच गेले होते़ त्यामुळे शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ परंतु, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली़ त्यामुळे जिल्ह्यात ९५५ मि़मी़सरासरीच्या आतापर्यंत ६८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ सरासरी गाठण्यासाठी अद्यापही २७० मि़मी़पावसाची गरज आहे़ विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात यंदा तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी, नाशिकमध्ये पडलेल्या पावसाने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले़ त्यामुळे जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ हे पाणी विष्णूपुरीला मिळाले़ काही दिवसांपूर्वी विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने विष्णूपुरी प्रकल्प भरला. 

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणNandedनांदेडWaterपाणीRainपाऊस