शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटेत २७१ गावे राहिले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

गावकऱ्यांच्या वज्रमुठीने कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही. त्याचवेळी दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेली २५६ गावे आता कोरोनामुक्त झाली आहे. ...

गावकऱ्यांच्या वज्रमुठीने कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही. त्याचवेळी दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेली

२५६ गावे आता कोरोनामुक्त झाली आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि गावकऱ्यांनी एकत्रित येत केलेल्या

उपाययोजनामुळे ही कोरोनामुक्ती साध्य झाली आहे.

जिल्ह्यात १३०९ ग्रामपंचायती अंतर्गत १ हजार ६०५ गावे येतात. त्यामध्ये कोरोनाच्या दोन्ही लाटेत २७१

गावांमध्ये कोरोनाला प्रवेश मिळाला नाही. ही उल्लेखनीय बाब आहे. त्याचवेळी दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या

२५६ गावांमध्ये गावकऱ्यांनी एकत्र येत कोरोनाला हद्दपार केले. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी

ग्रामपंचायतीची दखल थेट केंद्रीय आरोग्य विभागाने घेतली होती. त्याचवेळी अर्धापूर तालुक्यातील अमराबाद

तांडा येथेही गावकऱ्यांनी अशीच किमया साधली. गावात ४५ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यानंतर गावकऱ्यांची

तपासणी करत रुग्णांना घरीच उपचारासाठी ठेवण्यात आले. या रुग्णांची शिक्षकांकडून देखरेख करण्यात आली

तर आशा व अंगणवाडी कार्यकर्तींनी त्यांची आरोग्याची काळजी घेतली. त्यातून हे गाव कोरोनामुक्त झाले.

गावात तरुणांच्या पथकाने गावबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली. हा नियम मोडणाऱ्यांना दंडही आकारण्यात

आला. आरोग्य विभागाला महसूल व पोलीस यंत्रणेनेही चांगली मदत केली. किनवट तालुक्यातील ५ हजार ५००

लोकसंख्येचे गाव असलेल्या इस्लापूर येथेही तब्बल २०७ रुग्ण आढळले होते. त्यानंतर गावात दोन हजारांहून

अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. घरोघरी भेटी देत कोरोना लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरणात

ठेवण्यात आले. प्रत्येक संशयितांची तपासणी करण्यात आली. गावात आठवडी बाजार, सार्वजनिक कार्यक्रमावर

बंदी घालण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्रित येत या उपायोजना केल्या आणि गाव कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात

सध्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात गुरुवारी एकाही कोरोना

रुग्णाचा मृत्यू झाला नाही. गुरुवारी आढळलेल्या १३२ रुग्णांमध्ये ६२ रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत तर

१२ रुग्ण हे जिल्हा बाहेरील आहेत.

चौकट---------

लसीकरण मोहिमेला वेग

जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसअभावी या मोहिमेला गती

येत नसली तरीही आतापर्यंत ग्रामीण भागातील ३ लाख ४८ हजार ७४ नागरिकांना पहिली तर ८८ हजार ७४५

नागरिकांना दुसरी लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून आता संभावित तिसरी लाट रोखण्यासाठीही

नियोजन केले जात आहे. कोरोनामुक्तीसाठी गावकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले.

-डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.

चौकट--------------

कोरोनामुक्तीत गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग

जिल्ह्यात २७१ गावे कोरोनामुक्त राहिली. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. तर त्याचवेळी हॉटस्पॉट ठरलेली

गावे कोरोनामुक्त झाली. यातही विशेष आनंद आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा ठरला. आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य विभाग कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर आहेच. कोरोना संकट अद्याप संपले नसून सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे.

- वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड.