शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नांदेड शहर स्वच्छता निविदेचा निकाल सोमवारी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:18 IST

दोन महिन्यापासून वादात पडलेल्या स्वच्छता निविदेचा निकाल ५ फेब्रुवारी रोजी लागण्याची अपेक्षा आहे. महापालिकेला हा निकाल आपल्या बाजुने लागण्याची अपेक्षा आहे तर न्यायालयात गेलेल्या ठेकेदारानेही पुढची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे कचरा प्रश्न ६ महिन्यांपासून प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दोन महिन्यापासून वादात पडलेल्या स्वच्छता निविदेचा निकाल ५ फेब्रुवारी रोजी लागण्याची अपेक्षा आहे. महापालिकेला हा निकाल आपल्या बाजुने लागण्याची अपेक्षा आहे तर न्यायालयात गेलेल्या ठेकेदारानेही पुढची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.शहर स्वच्छतेच्या निविदामध्ये वर्षाच्या सुरुवातीला आर अ‍ॅन्ड बी या मुंबईच्या ठेकेदाराच्या निविदा कमी दराने असल्याने त्या मंजूर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या निर्णयास महापालिकेच्या पहिल्या सर्व साधारण सभेत मान्यताही देण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या बेंगळूरूच्या पी गोपीनाथ रेड्डी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीत खंडपीठाने प्रारंभी आयुक्तांच्या स्तरावरच निर्णय घ्यावा, असे आदेश पारित केले होते. या आदेशानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी आर अ‍ॅन्ड बी आणि पी गोपीनाथ रेड्डी या दोघांचीही समोरासमोर बाजू ऐकून घेतली. त्यानंतर सदर प्रकरणात आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्या संदर्भात सूचना दिल्या होत्या. ही बाब समजताच पी गोपीनाथ रेड्डी यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावताना न्यायाची मागणी केली आहे.मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचा अनुभव नाही. मुंबईमध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये एकाच ठिकाणाहून कचरा संकलित केला जातो. आपल्याला तसा अनुभव असल्याचे पी गोपीनाथ रेड्डी यांनी आपल्या रिट याचिकेत नमुद केले आहे. विशेष म्हणजे पी गोपीनाथ रेड्डी यांनी आर. अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराने दिलेल्या दरातच काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. असे असताना महापालिकेने निविदा प्रक्रियेत ज्या ठेकेदाराचे दर सर्वात कमी असतील त्यांच्याशी करार करणे नियमानुसार आवश्यक असल्याचे सांगितले. दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या ठेकेदाराने अशा पद्धतीने पहिल्या ठेकेदाराच्या दरात काम करण्याची तयारी दर्शविली तर त्याला काम देणे ही बाब नियमात बसत नसल्याचे स्पष्ट केले आहे.