शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नांदेड मनपाचा अर्थसंकल्प अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:49 IST

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळेच महापालिकेची सोमवारी होणारी अर्थसंकल्पीय विशेष सभाही पुढे ढकलावी लागली आहे.

ठळक मुद्देआचारसंहिता : शहरात शंभरहून अधिक बॅनर हटविले

नांदेड : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळेच महापालिकेची सोमवारी होणारी अर्थसंकल्पीय विशेष सभाही पुढे ढकलावी लागली आहे. आचारसंहितेची तत्काळ अंमलबजावणी करताना महापालिकेने शहरातील बॅनर्स हटविण्यास प्रारंभ केला आहे.महापालिका प्रशासनाने ५ मार्च रोजी कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला होता. स्थायी समितीने दोन दिवसांच्या अभ्यासानंतर या अर्थसंकल्पात जवळपास ५० कोटींची नवे कामे सुचवत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली होती. ११ मार्च रोजी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार होता. यासाठी ११ मार्च रोजी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. १० मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा अंमल तत्काळ सुरू झाला. याच बाबीमुळे मनपाची अर्थसंकल्पीय सभा पुढे ढकलण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.महापालिकेचा २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प ८२२ कोटी ३९ लाखांचा होता. तो सुधारित अर्थसंकल्प ६६७ कोटी ७५ लाखांवर आला आहे. २०१९-२० चा प्रशासकीय अर्थसंकल्प ७३२ कोटी ७५ लाखांचा आहे. १ लाख ४० हजार ८२९ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प होता. सभापती फारुख अली खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या ८ मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा केल्या आहेत़ त्यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच विविध विकासकामांचा समावेश होता. त्यात गुंठेवारी योजना पुन्हा सुरु करणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज व मालमत्ता विभागाची अभय योजना सुरु करणे, मनपा हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी मालमत्ता मनपा रेकॉर्डवर आणून करवसुली करणे, नगररचना विभागाच्या कामकाजात गती आणणे, नंदीग्राम मार्केट, महात्मा फुले मार्केट, राजीव गांधी मार्केटची पुनर्निर्मिती करणे, मनपाच्या इतर मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे या उत्पन्नवाढीसाठीच्या सुधारणा त्यात नमूद करण्यात आल्या होत्या.आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आता महापालिकेचा अर्थसंकल्प निवडणुकानंतरच मंजूर होणार आहे. पण त्याचवेळी स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असल्याने प्रशासकीय कारभाराला कोणतीही अडचण येणार नसल्याचे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले.आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई-डोंगरेलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी सायंकाळपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विविध पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. निवडणुका घोषित होताच रविवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करत आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे.पदाधिकाऱ्यांची वाहने काढली

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे असलेली वाहने आचारसंहिता लागू होताच काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती पदाधिकाºयांची वाहने तात्काळ काढून घेतली आहेत.
  • लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या शक्यतेने महापालिकेचा अर्थसंकल्प मोठ्या गतीने मंजूर करण्याचे प्रयत्न केले जात होते. स्थायी समितीने अवघ्या दोन दिवसांत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांत सर्वसाधारण सभेपुढे हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी आणला जाणार होता. ११ मार्च रोजी दुपारनंतर निवडणुकांची घोषणा होईल, या अंदाजाने मनपाची अर्थसंकल्पीय सभा सकाळी १० वाजताच ठेवण्यात आली होती.