शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपाचा अर्थसंकल्प अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:49 IST

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळेच महापालिकेची सोमवारी होणारी अर्थसंकल्पीय विशेष सभाही पुढे ढकलावी लागली आहे.

ठळक मुद्देआचारसंहिता : शहरात शंभरहून अधिक बॅनर हटविले

नांदेड : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळेच महापालिकेची सोमवारी होणारी अर्थसंकल्पीय विशेष सभाही पुढे ढकलावी लागली आहे. आचारसंहितेची तत्काळ अंमलबजावणी करताना महापालिकेने शहरातील बॅनर्स हटविण्यास प्रारंभ केला आहे.महापालिका प्रशासनाने ५ मार्च रोजी कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला होता. स्थायी समितीने दोन दिवसांच्या अभ्यासानंतर या अर्थसंकल्पात जवळपास ५० कोटींची नवे कामे सुचवत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली होती. ११ मार्च रोजी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार होता. यासाठी ११ मार्च रोजी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. १० मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा अंमल तत्काळ सुरू झाला. याच बाबीमुळे मनपाची अर्थसंकल्पीय सभा पुढे ढकलण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.महापालिकेचा २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प ८२२ कोटी ३९ लाखांचा होता. तो सुधारित अर्थसंकल्प ६६७ कोटी ७५ लाखांवर आला आहे. २०१९-२० चा प्रशासकीय अर्थसंकल्प ७३२ कोटी ७५ लाखांचा आहे. १ लाख ४० हजार ८२९ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प होता. सभापती फारुख अली खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या ८ मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा केल्या आहेत़ त्यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच विविध विकासकामांचा समावेश होता. त्यात गुंठेवारी योजना पुन्हा सुरु करणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज व मालमत्ता विभागाची अभय योजना सुरु करणे, मनपा हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी मालमत्ता मनपा रेकॉर्डवर आणून करवसुली करणे, नगररचना विभागाच्या कामकाजात गती आणणे, नंदीग्राम मार्केट, महात्मा फुले मार्केट, राजीव गांधी मार्केटची पुनर्निर्मिती करणे, मनपाच्या इतर मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे या उत्पन्नवाढीसाठीच्या सुधारणा त्यात नमूद करण्यात आल्या होत्या.आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आता महापालिकेचा अर्थसंकल्प निवडणुकानंतरच मंजूर होणार आहे. पण त्याचवेळी स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असल्याने प्रशासकीय कारभाराला कोणतीही अडचण येणार नसल्याचे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले.आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई-डोंगरेलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी सायंकाळपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विविध पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. निवडणुका घोषित होताच रविवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करत आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे.पदाधिकाऱ्यांची वाहने काढली

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे असलेली वाहने आचारसंहिता लागू होताच काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती पदाधिकाºयांची वाहने तात्काळ काढून घेतली आहेत.
  • लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या शक्यतेने महापालिकेचा अर्थसंकल्प मोठ्या गतीने मंजूर करण्याचे प्रयत्न केले जात होते. स्थायी समितीने अवघ्या दोन दिवसांत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांत सर्वसाधारण सभेपुढे हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी आणला जाणार होता. ११ मार्च रोजी दुपारनंतर निवडणुकांची घोषणा होईल, या अंदाजाने मनपाची अर्थसंकल्पीय सभा सकाळी १० वाजताच ठेवण्यात आली होती.