शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:26 IST

डॉ. गंगाधर तोगरे। लोकमत न्यूज नेटवर्क कंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न ...

ठळक मुद्दे राज्य शासन, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य

डॉ. गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. त्यातून शेतक-यांना सक्षम केले जाणा असून त्यात कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड करण्यात आली आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने निवड झालेल्या गावांतील शेतक-यांची प्रगती साधण्याची संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे.सतत नापिकी, दुष्काळ, पीक उत्पादनाची घसरण आदीने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. हवामान बदलाने शेती क्षेत्र प्रभावित झाले आहे. हवामान बदलाची व्यापकता वाढण्याची व शेती, भूगर्भातील पाणीसाठा, जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातूनही भिती व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळ, नापिकीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे, उत्पादकता क्षमता वाढवून शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांत निवडक गावांत राबविला जाणार आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील ३८४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कंधा तालुक्यातील ३० गावे प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहेत.तालुक्यातील आलेगाव, औराळ, बामणी (पक), बिंडा, चिखली, दहीकळंबा, दाताळा, दिंडा, गुंडा, हिस्से औराळ, हाळदा, मंगलसांगवी, नंदनवन, सावळेश्वर, देवयाचीवाडी, गोणार, जाकापूर, कल्हाळी, पेठवडज, रुई, सावरगाव (नि), शिर्शी बु, शिर्शी खु, येलूर, बाचोटी, चौकी धर्मापुरी, चिंचोली (पक), गोगदरी, मजरे वरवंट, चौकी महाकाया या गावांचा समावेश आहे.या गावांत येत्या सहा वर्षांत तीन टप्प्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या गावातील गरजानुसार पाणलोट आधारित जलसंधारण, पाणी उपलब्धतेसाठी विहीर, पाणी साठवण्यासाठी शेततळे, खारपण जमिनीचे व्यवस्थापन, जमिनीतील कर्बग्रहण प्रमाण वृद्धीसाठी रोपे व फळबाग लागवड, हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, पाणी कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषार सिंचन, शेतकरी उत्पादक गटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, कृषी व हवामान विषयक सल्ला, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी गाव व गाव समूहाचा सुक्षम नियोजन आराखडा लोकांच्या सहभागातून केला जाणार आहे. त्यात पाणी ताळेबंद, जमिनीचे आरोग्य, शेती, शेती उत्पादन, उत्पन्न व शेतीपूरक व्यवसाय समस्या, गरजा व संधी याचा आराखड्यात समावेश राहणार आहे.कृषी विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार असून याची अंमलबजावणी करण्यासाठी गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समितीचे गठण होणार आहे. या प्रकल्पातील बाबीसाठी सध्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांत असलेल्या अनुदान मर्यादा, प्रचलित मापदंड व निकष लागू राहणार आहेत. समितीकडे अर्ज सादर करायचा असून निवड ही समितीच करणा आहे. लाभार्थी निवड करताना अत्यल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांंग) व अल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांग), शेतकरी असा प्रधान्यक्रम राहणार आहे.लाभार्थी निवड झालेल्या शेतक-यांनी घटकाची उभारणी केल्यानंतर पूर्वतपासणी करुन देय अनुदान डीबीटी पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातून शेती व शेतक-यांचे हित किती प्रमाणात होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणा आहे.शेतक-यांचे योगदान महत्वाचे...प्रकल्पाची माहिती ग्रामसभेतून दिली. जनजागरण, मार्गदर्शनपर भर देण्यात आला आहे. पीक पद्धतीत बदल करणे, हवामानाच्या विषम घटकांना सहन करणा-या पीक व पिकाच्या वाणांची निवड करणे, यातून पिकांचे होणारे नुकसान कमी करणे हा प्रकल्पाचा उद्देश राहील. यात सहभागी शेतक-यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. संजय गायकवाड,तालुका कृषी अधिकारी