शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:26 IST

डॉ. गंगाधर तोगरे। लोकमत न्यूज नेटवर्क कंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न ...

ठळक मुद्दे राज्य शासन, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य

डॉ. गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. त्यातून शेतक-यांना सक्षम केले जाणा असून त्यात कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड करण्यात आली आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने निवड झालेल्या गावांतील शेतक-यांची प्रगती साधण्याची संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे.सतत नापिकी, दुष्काळ, पीक उत्पादनाची घसरण आदीने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. हवामान बदलाने शेती क्षेत्र प्रभावित झाले आहे. हवामान बदलाची व्यापकता वाढण्याची व शेती, भूगर्भातील पाणीसाठा, जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातूनही भिती व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळ, नापिकीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे, उत्पादकता क्षमता वाढवून शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांत निवडक गावांत राबविला जाणार आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील ३८४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कंधा तालुक्यातील ३० गावे प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहेत.तालुक्यातील आलेगाव, औराळ, बामणी (पक), बिंडा, चिखली, दहीकळंबा, दाताळा, दिंडा, गुंडा, हिस्से औराळ, हाळदा, मंगलसांगवी, नंदनवन, सावळेश्वर, देवयाचीवाडी, गोणार, जाकापूर, कल्हाळी, पेठवडज, रुई, सावरगाव (नि), शिर्शी बु, शिर्शी खु, येलूर, बाचोटी, चौकी धर्मापुरी, चिंचोली (पक), गोगदरी, मजरे वरवंट, चौकी महाकाया या गावांचा समावेश आहे.या गावांत येत्या सहा वर्षांत तीन टप्प्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या गावातील गरजानुसार पाणलोट आधारित जलसंधारण, पाणी उपलब्धतेसाठी विहीर, पाणी साठवण्यासाठी शेततळे, खारपण जमिनीचे व्यवस्थापन, जमिनीतील कर्बग्रहण प्रमाण वृद्धीसाठी रोपे व फळबाग लागवड, हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, पाणी कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषार सिंचन, शेतकरी उत्पादक गटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, कृषी व हवामान विषयक सल्ला, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी गाव व गाव समूहाचा सुक्षम नियोजन आराखडा लोकांच्या सहभागातून केला जाणार आहे. त्यात पाणी ताळेबंद, जमिनीचे आरोग्य, शेती, शेती उत्पादन, उत्पन्न व शेतीपूरक व्यवसाय समस्या, गरजा व संधी याचा आराखड्यात समावेश राहणार आहे.कृषी विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार असून याची अंमलबजावणी करण्यासाठी गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समितीचे गठण होणार आहे. या प्रकल्पातील बाबीसाठी सध्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांत असलेल्या अनुदान मर्यादा, प्रचलित मापदंड व निकष लागू राहणार आहेत. समितीकडे अर्ज सादर करायचा असून निवड ही समितीच करणा आहे. लाभार्थी निवड करताना अत्यल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांंग) व अल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांग), शेतकरी असा प्रधान्यक्रम राहणार आहे.लाभार्थी निवड झालेल्या शेतक-यांनी घटकाची उभारणी केल्यानंतर पूर्वतपासणी करुन देय अनुदान डीबीटी पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातून शेती व शेतक-यांचे हित किती प्रमाणात होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणा आहे.शेतक-यांचे योगदान महत्वाचे...प्रकल्पाची माहिती ग्रामसभेतून दिली. जनजागरण, मार्गदर्शनपर भर देण्यात आला आहे. पीक पद्धतीत बदल करणे, हवामानाच्या विषम घटकांना सहन करणा-या पीक व पिकाच्या वाणांची निवड करणे, यातून पिकांचे होणारे नुकसान कमी करणे हा प्रकल्पाचा उद्देश राहील. यात सहभागी शेतक-यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. संजय गायकवाड,तालुका कृषी अधिकारी