शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:26 IST

डॉ. गंगाधर तोगरे। लोकमत न्यूज नेटवर्क कंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न ...

ठळक मुद्दे राज्य शासन, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य

डॉ. गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. त्यातून शेतक-यांना सक्षम केले जाणा असून त्यात कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड करण्यात आली आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने निवड झालेल्या गावांतील शेतक-यांची प्रगती साधण्याची संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे.सतत नापिकी, दुष्काळ, पीक उत्पादनाची घसरण आदीने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. हवामान बदलाने शेती क्षेत्र प्रभावित झाले आहे. हवामान बदलाची व्यापकता वाढण्याची व शेती, भूगर्भातील पाणीसाठा, जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातूनही भिती व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळ, नापिकीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे, उत्पादकता क्षमता वाढवून शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांत निवडक गावांत राबविला जाणार आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील ३८४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कंधा तालुक्यातील ३० गावे प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहेत.तालुक्यातील आलेगाव, औराळ, बामणी (पक), बिंडा, चिखली, दहीकळंबा, दाताळा, दिंडा, गुंडा, हिस्से औराळ, हाळदा, मंगलसांगवी, नंदनवन, सावळेश्वर, देवयाचीवाडी, गोणार, जाकापूर, कल्हाळी, पेठवडज, रुई, सावरगाव (नि), शिर्शी बु, शिर्शी खु, येलूर, बाचोटी, चौकी धर्मापुरी, चिंचोली (पक), गोगदरी, मजरे वरवंट, चौकी महाकाया या गावांचा समावेश आहे.या गावांत येत्या सहा वर्षांत तीन टप्प्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या गावातील गरजानुसार पाणलोट आधारित जलसंधारण, पाणी उपलब्धतेसाठी विहीर, पाणी साठवण्यासाठी शेततळे, खारपण जमिनीचे व्यवस्थापन, जमिनीतील कर्बग्रहण प्रमाण वृद्धीसाठी रोपे व फळबाग लागवड, हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, पाणी कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषार सिंचन, शेतकरी उत्पादक गटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, कृषी व हवामान विषयक सल्ला, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी गाव व गाव समूहाचा सुक्षम नियोजन आराखडा लोकांच्या सहभागातून केला जाणार आहे. त्यात पाणी ताळेबंद, जमिनीचे आरोग्य, शेती, शेती उत्पादन, उत्पन्न व शेतीपूरक व्यवसाय समस्या, गरजा व संधी याचा आराखड्यात समावेश राहणार आहे.कृषी विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार असून याची अंमलबजावणी करण्यासाठी गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समितीचे गठण होणार आहे. या प्रकल्पातील बाबीसाठी सध्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांत असलेल्या अनुदान मर्यादा, प्रचलित मापदंड व निकष लागू राहणार आहेत. समितीकडे अर्ज सादर करायचा असून निवड ही समितीच करणा आहे. लाभार्थी निवड करताना अत्यल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांंग) व अल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांग), शेतकरी असा प्रधान्यक्रम राहणार आहे.लाभार्थी निवड झालेल्या शेतक-यांनी घटकाची उभारणी केल्यानंतर पूर्वतपासणी करुन देय अनुदान डीबीटी पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातून शेती व शेतक-यांचे हित किती प्रमाणात होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणा आहे.शेतक-यांचे योगदान महत्वाचे...प्रकल्पाची माहिती ग्रामसभेतून दिली. जनजागरण, मार्गदर्शनपर भर देण्यात आला आहे. पीक पद्धतीत बदल करणे, हवामानाच्या विषम घटकांना सहन करणा-या पीक व पिकाच्या वाणांची निवड करणे, यातून पिकांचे होणारे नुकसान कमी करणे हा प्रकल्पाचा उद्देश राहील. यात सहभागी शेतक-यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. संजय गायकवाड,तालुका कृषी अधिकारी