शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

कंधार तालुक्यातील 30 गावांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:31 IST

राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. त्यात कंधार तालुक्यातील 30 गावाची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे.

- प्रा .गंगाधर तोगरे.

कंधार ( नांदेड ) : राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. त्यात कंधार तालुक्यातील 30 गावाची निवड करण्यात आली आहे. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन राबविला जाणार आहे. यामुळे यात निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना प्रगती साधण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे. हवामान बदलाने शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळ, नापीकी, जमीन आरोग्य, भूगर्भातील पाणी साठा धोक्यात आला आहे.त्यामुळे हवामान बदलाशी जुळवून घेऊन शेती समृध्द करणे,उत्पन्न व उत्पादन वाढविण्यासाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सहा वर्षांत तीन टप्पात हा प्रकल्प राबविला जाईल. गावातील गरजेनुसार पाणलोट आधारित कामे  व उपाययोजना करण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती लाभार्थी निवड करणार आहे. निवड करताना अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी जो अनु.जाती,अनु.जमाती, महिला, दिव्यांग आदिना प्राधान्य क्रम राहणार आहे. 

सध्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनात असलेल्या अनुदान मर्यादा,प्रचलित मापदंड, व निकष या प्रकल्पाला लागू असल्याचे सांगण्यात आले आहे.ग्राम सभेतून प्रकल्पाची माहिती देण्यात आली.जनजागरण केले जात आहे. या प्रकल्पातून शेती प्रगतीसाठी प्रयत्न होणार आहेत. त्याचा लाभ किती होणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी