शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कंधार तालुक्यातील 30 गावांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:31 IST

राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. त्यात कंधार तालुक्यातील 30 गावाची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे.

- प्रा .गंगाधर तोगरे.

कंधार ( नांदेड ) : राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. त्यात कंधार तालुक्यातील 30 गावाची निवड करण्यात आली आहे. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन राबविला जाणार आहे. यामुळे यात निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना प्रगती साधण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे. हवामान बदलाने शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळ, नापीकी, जमीन आरोग्य, भूगर्भातील पाणी साठा धोक्यात आला आहे.त्यामुळे हवामान बदलाशी जुळवून घेऊन शेती समृध्द करणे,उत्पन्न व उत्पादन वाढविण्यासाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सहा वर्षांत तीन टप्पात हा प्रकल्प राबविला जाईल. गावातील गरजेनुसार पाणलोट आधारित कामे  व उपाययोजना करण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती लाभार्थी निवड करणार आहे. निवड करताना अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी जो अनु.जाती,अनु.जमाती, महिला, दिव्यांग आदिना प्राधान्य क्रम राहणार आहे. 

सध्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनात असलेल्या अनुदान मर्यादा,प्रचलित मापदंड, व निकष या प्रकल्पाला लागू असल्याचे सांगण्यात आले आहे.ग्राम सभेतून प्रकल्पाची माहिती देण्यात आली.जनजागरण केले जात आहे. या प्रकल्पातून शेती प्रगतीसाठी प्रयत्न होणार आहेत. त्याचा लाभ किती होणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी