शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नागपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

१३ लोकांवर वीजचोरीचे गुन्हे उमरी - तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बितनाळ, सिंगनापूर, हस्सा या गावातील १३ लोकांनी विद्युत तारेवर आकडा ...

१३ लोकांवर वीजचोरीचे गुन्हे

उमरी - तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बितनाळ, सिंगनापूर, हस्सा या गावातील १३ लोकांनी विद्युत तारेवर आकडा टाकून वीज चोरी केल्याचे महावितरण विभाग पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर भोकर पोलीस ठाण्यात वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विद्युत पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही.एम. मठपती यांनी दिली.

गड्डम यांची नियुक्ती

मुखेड - येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारीपदी नरेश गड्डम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर येथील शाखेत काम केल्यानंतर त्यांना मुखेड येथील शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी ग्राहक संघाचे राजू पाटील इंगोले, ॲड.सुनील पऊळकर, समाधान बरगे, जयभीम सोनकांबळे आदी उपस्थित होते.

तलाठी बासरे यांचा सत्कार

धर्माबाद - येथील नगर परिषदेच्या क्षेत्रातील बाळापूर सज्जाचे तलाठी सहदेव बासरे यांनी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्यांचा जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांच्या हस्ते गौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर आदी उपस्थित होते.

पावसाअभावी पिके सुकली

कुरुळा - मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील पिके पिवळी पडत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून पिके करपून जात आहेत. सोयाबीनवर चक्री भुंगा, पांढरी माशी, तुडतुडे, केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर कापसावर मावा राेगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

उस्माननगरात नाल्या तुंबल्या

लोहा - उस्माननगर ग्रामपंचायत इमारतीजवळ अंगणवाडीसमोर घाण पाणी तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या पाण्याचा निचरा करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी नाल्या तुंबल्यामुळे डासांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

सोयाबीन पिके धोक्यात

बरबडा - नायगाव तालुक्यातील सोयाबीन, मूग, कापूस पिके पावसाअभावी सुकून जात आहेत. गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत नसल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारा घास जाण्याची शक्यता आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

बोधडीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बोधडी - मागील काही दिवसांपासून गावात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा फैलाव होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून धूर फवारणीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. या विचित्र वातावरणात डासांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन डेंग्यूचे रुग्णही वाढले आहेत.

आदिवासी कोळी समाजाची मागणी

बिलोली - औरंगाबाद येथे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राचे अस्तित्व नाकारून अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदन आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. सदरील समिती जाणिवपूर्वक भेदभाव करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दोन जमातींना वैधता प्रमाणपत्र मिळू द्यायचे नाही या मानसिकतेतून समिती काम करीत असल्याचा आरोप संघटनेच्या सदस्यांनी केला.

शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत

बाऱ्हाळी - पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येथील दोन केंद्रावर सुरळीत पार पडली. या केंद्रावर परिसरातील माध्यमिक शाळेतील ११६ विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. त्यापैकी १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र संचालक म्हणून एस.आर.राठोड यांनी काम पाहिले. तसेच विद्याविकास विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून व्ही.टी.कोंडे यांनी काम पाहिले.

जंगलाच्या बाजूने जाळे बसवा

भोकर - हिंस्त्र प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जंगलाभोवती जाळे बसविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे यांनी निवेदनाद्वारे केली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. जंगलात रोही, रानडुक्कर, मोर, हरीण यासारखे प्राणी मुक्तपणे वावरतात. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिके घेतली आहेत.