शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कोरोनामुळे मुखेडची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

पथदिवे सुरू करण्याची मागणी भोकर- शहरातील मुख्य रस्त्यासह परिसरातील अनेक ठिकाणच्या गल्लीतील अंतर्गत रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असून, रात्री ...

पथदिवे सुरू करण्याची मागणी

भोकर- शहरातील मुख्य रस्त्यासह परिसरातील अनेक ठिकाणच्या गल्लीतील अंतर्गत रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असून, रात्री आंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन रात्री वाहनधारकांना लुटण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे या रस्त्यावरून ये - जा करण्यास नागरिक भीत आहेत. पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.

अर्धापुरात जल्लोष

अर्धापूर- पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी विजय प्राप्त केल्याने अर्धापुरात महाविकास आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख, बालासाहेब गव्हाणे, संतोष कपाटे, गोविंद सिनगारे, राजेश्वर शेटे, शेख लायक आदी उपस्थित होते.

बिलोलीत आतषबाजी

बिलोली- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल बिलोली येथील जुन्या बसस्थानक चौरस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नागनाथ पाटील सावळीकर, अर्जुनराव अंकुशकर, नगरसेवक अनुप अंकुशकर, नगरसेवक प्रकाश पोवाडे, नगरसेवक जावेद कुरेशी आदी उपस्थित होते.

ग्रंथपाल रफिक यांचा सत्कार

कंधार - जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे दिव्यांग सहायक ग्रंथपाल मोहमद रफिक सत्तार यांचा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहमद हामेदोद्दीन यांची उपस्थिती होती.

शिंदे यांची बदली

नायगाव- दीड वर्षापूर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांची ३ डिसेंबर रोजी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर राजसाहेब मुत्येपोड यांची नियुक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या अचानक झालेल्या बदलीने एकच चर्चा सुरू झाली आहे.

शेतकरी वाऱ्यावर

शिवणी- किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील खरीप हंगाम जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबद्दल शासनाकडून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु दिवाळी होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी मदत मिळाली नाही.