शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोरोनामुळे मुखेडची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

पथदिवे सुरू करण्याची मागणी भोकर- शहरातील मुख्य रस्त्यासह परिसरातील अनेक ठिकाणच्या गल्लीतील अंतर्गत रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असून, रात्री ...

पथदिवे सुरू करण्याची मागणी

भोकर- शहरातील मुख्य रस्त्यासह परिसरातील अनेक ठिकाणच्या गल्लीतील अंतर्गत रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असून, रात्री आंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन रात्री वाहनधारकांना लुटण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे या रस्त्यावरून ये - जा करण्यास नागरिक भीत आहेत. पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.

अर्धापुरात जल्लोष

अर्धापूर- पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी विजय प्राप्त केल्याने अर्धापुरात महाविकास आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख, बालासाहेब गव्हाणे, संतोष कपाटे, गोविंद सिनगारे, राजेश्वर शेटे, शेख लायक आदी उपस्थित होते.

बिलोलीत आतषबाजी

बिलोली- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल बिलोली येथील जुन्या बसस्थानक चौरस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नागनाथ पाटील सावळीकर, अर्जुनराव अंकुशकर, नगरसेवक अनुप अंकुशकर, नगरसेवक प्रकाश पोवाडे, नगरसेवक जावेद कुरेशी आदी उपस्थित होते.

ग्रंथपाल रफिक यांचा सत्कार

कंधार - जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे दिव्यांग सहायक ग्रंथपाल मोहमद रफिक सत्तार यांचा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहमद हामेदोद्दीन यांची उपस्थिती होती.

शिंदे यांची बदली

नायगाव- दीड वर्षापूर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांची ३ डिसेंबर रोजी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर राजसाहेब मुत्येपोड यांची नियुक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या अचानक झालेल्या बदलीने एकच चर्चा सुरू झाली आहे.

शेतकरी वाऱ्यावर

शिवणी- किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील खरीप हंगाम जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबद्दल शासनाकडून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु दिवाळी होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी मदत मिळाली नाही.