शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:33 IST

नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या पोलसह रोहित्रांचे नुकसान होऊन महावितरणचे जवळपास १ कोटी ९५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

नांदेड : नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका हा भोकर विभागाला बसला आहे. 

भोकर विभागातील हदगाव, किनवट व माहूर परिसरात उच्चदाब वीज वाहिन्यांचे तब्बल १५१ विद्युत खांब, लघूदाब वाहिनीचे ६२१ खांब उद्ध्वस्त झाले. तर उच्चदाब आणि लघूदाब अशी ४२.९८ किमी. ची वीजवाहिनी तुटून पडली. तसेच २१ रोहित्र कोलमडून पडली. विशेष म्हणजे एकट्या भोकर विभागात एक कोटी ७२ लाख तर नांदेड ग्रामीण विभागात २१ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे लोहा, कंधारसह विविध परिसरात उच्चदाब वाहिनीचे ४४, लघूदाब वाहिनीचे १२३ पोल उद्ध्वस्त झाले. तर १० किमी.ची उच्चदाब व ३० किमी.ची लघुदाब वीजवाहिनी तुटून पडली. तसेच १४ रोहित्रांमध्ये बिघाड झाला. तर देगलूर भागात उच्चदाब वाहिनीचे १५, लघुदाब वाहिनीचे १९ पोल जमिनदोस्त झाले. त्यामुळे शहरी भागातील वीज ग्राहकांना १० ते १५ तास तर ग्रामीण भागातील ग्राहकांना ३० तास वीजपुरवठ्यापासून वंचित रहावे लागले. दरम्यान, काही ठिकाणी वीज दुरूस्तीचे काम अजूनही केले जात असल्याची माहिती आहे.

शनिवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या पोलसह रोहित्रांचे नुकसान होऊन महावितरणचे जवळपास १ कोटी ९५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे ९७३ विद्युत खांब जमीनदोस्त झाले. तर १२३ लोखंडी खांब बुडापासून वाकले असून ८२ किलोमीटर विजेच्या तारा तुटून पडल्याने अनेक गावांमध्ये अजूनही अंधार पसरलेला असून विद्युत दुरूस्तींची कामे केली जात आहेत.

पावसाळयामध्ये वीजग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे, आॅईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे आदी कामांचा समावेश आहे.

धर्माबाद तालुक्यातील दहा गावे, तीन दिवसांपासून अंधाराततालुक्यातील बाभळी(ध), सिरसखोड, नेरली, आल्लुर, बेल्लुर (बु), बेल्लुर (खु), नायगाव (ध), चिंचोली, जाफलापूर, शरिफाबाद या दहा गावात गेल्या तीन दिवसापासून लाईट नसल्याने अंधारात आहे. परिणामी पिण्याचे पाणी धर्माबाद येथून विकत आणावे लागत आहे. साडंपाणी नसल्याने स्नान करणे तर बंदच पण जनावरांनाही पाण्यासाठी  भटकंती करावी लागत आहे. गावातील पिठाच्या गिरणी बंद पडल्याने धर्माबाद येथून पीठ दळून आणावे लागत आहे. रात्रीच्या वेळी विंचू किड्याची भीती निर्माण झाली असून डासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRainपाऊसHailstormगारपीट