शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:33 IST

नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या पोलसह रोहित्रांचे नुकसान होऊन महावितरणचे जवळपास १ कोटी ९५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

नांदेड : नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका हा भोकर विभागाला बसला आहे. 

भोकर विभागातील हदगाव, किनवट व माहूर परिसरात उच्चदाब वीज वाहिन्यांचे तब्बल १५१ विद्युत खांब, लघूदाब वाहिनीचे ६२१ खांब उद्ध्वस्त झाले. तर उच्चदाब आणि लघूदाब अशी ४२.९८ किमी. ची वीजवाहिनी तुटून पडली. तसेच २१ रोहित्र कोलमडून पडली. विशेष म्हणजे एकट्या भोकर विभागात एक कोटी ७२ लाख तर नांदेड ग्रामीण विभागात २१ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे लोहा, कंधारसह विविध परिसरात उच्चदाब वाहिनीचे ४४, लघूदाब वाहिनीचे १२३ पोल उद्ध्वस्त झाले. तर १० किमी.ची उच्चदाब व ३० किमी.ची लघुदाब वीजवाहिनी तुटून पडली. तसेच १४ रोहित्रांमध्ये बिघाड झाला. तर देगलूर भागात उच्चदाब वाहिनीचे १५, लघुदाब वाहिनीचे १९ पोल जमिनदोस्त झाले. त्यामुळे शहरी भागातील वीज ग्राहकांना १० ते १५ तास तर ग्रामीण भागातील ग्राहकांना ३० तास वीजपुरवठ्यापासून वंचित रहावे लागले. दरम्यान, काही ठिकाणी वीज दुरूस्तीचे काम अजूनही केले जात असल्याची माहिती आहे.

शनिवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या पोलसह रोहित्रांचे नुकसान होऊन महावितरणचे जवळपास १ कोटी ९५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे ९७३ विद्युत खांब जमीनदोस्त झाले. तर १२३ लोखंडी खांब बुडापासून वाकले असून ८२ किलोमीटर विजेच्या तारा तुटून पडल्याने अनेक गावांमध्ये अजूनही अंधार पसरलेला असून विद्युत दुरूस्तींची कामे केली जात आहेत.

पावसाळयामध्ये वीजग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे, आॅईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे आदी कामांचा समावेश आहे.

धर्माबाद तालुक्यातील दहा गावे, तीन दिवसांपासून अंधाराततालुक्यातील बाभळी(ध), सिरसखोड, नेरली, आल्लुर, बेल्लुर (बु), बेल्लुर (खु), नायगाव (ध), चिंचोली, जाफलापूर, शरिफाबाद या दहा गावात गेल्या तीन दिवसापासून लाईट नसल्याने अंधारात आहे. परिणामी पिण्याचे पाणी धर्माबाद येथून विकत आणावे लागत आहे. साडंपाणी नसल्याने स्नान करणे तर बंदच पण जनावरांनाही पाण्यासाठी  भटकंती करावी लागत आहे. गावातील पिठाच्या गिरणी बंद पडल्याने धर्माबाद येथून पीठ दळून आणावे लागत आहे. रात्रीच्या वेळी विंचू किड्याची भीती निर्माण झाली असून डासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRainपाऊसHailstormगारपीट