शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:33 IST

नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या पोलसह रोहित्रांचे नुकसान होऊन महावितरणचे जवळपास १ कोटी ९५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

नांदेड : नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका हा भोकर विभागाला बसला आहे. 

भोकर विभागातील हदगाव, किनवट व माहूर परिसरात उच्चदाब वीज वाहिन्यांचे तब्बल १५१ विद्युत खांब, लघूदाब वाहिनीचे ६२१ खांब उद्ध्वस्त झाले. तर उच्चदाब आणि लघूदाब अशी ४२.९८ किमी. ची वीजवाहिनी तुटून पडली. तसेच २१ रोहित्र कोलमडून पडली. विशेष म्हणजे एकट्या भोकर विभागात एक कोटी ७२ लाख तर नांदेड ग्रामीण विभागात २१ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे लोहा, कंधारसह विविध परिसरात उच्चदाब वाहिनीचे ४४, लघूदाब वाहिनीचे १२३ पोल उद्ध्वस्त झाले. तर १० किमी.ची उच्चदाब व ३० किमी.ची लघुदाब वीजवाहिनी तुटून पडली. तसेच १४ रोहित्रांमध्ये बिघाड झाला. तर देगलूर भागात उच्चदाब वाहिनीचे १५, लघुदाब वाहिनीचे १९ पोल जमिनदोस्त झाले. त्यामुळे शहरी भागातील वीज ग्राहकांना १० ते १५ तास तर ग्रामीण भागातील ग्राहकांना ३० तास वीजपुरवठ्यापासून वंचित रहावे लागले. दरम्यान, काही ठिकाणी वीज दुरूस्तीचे काम अजूनही केले जात असल्याची माहिती आहे.

शनिवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या पोलसह रोहित्रांचे नुकसान होऊन महावितरणचे जवळपास १ कोटी ९५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे ९७३ विद्युत खांब जमीनदोस्त झाले. तर १२३ लोखंडी खांब बुडापासून वाकले असून ८२ किलोमीटर विजेच्या तारा तुटून पडल्याने अनेक गावांमध्ये अजूनही अंधार पसरलेला असून विद्युत दुरूस्तींची कामे केली जात आहेत.

पावसाळयामध्ये वीजग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे, आॅईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे आदी कामांचा समावेश आहे.

धर्माबाद तालुक्यातील दहा गावे, तीन दिवसांपासून अंधाराततालुक्यातील बाभळी(ध), सिरसखोड, नेरली, आल्लुर, बेल्लुर (बु), बेल्लुर (खु), नायगाव (ध), चिंचोली, जाफलापूर, शरिफाबाद या दहा गावात गेल्या तीन दिवसापासून लाईट नसल्याने अंधारात आहे. परिणामी पिण्याचे पाणी धर्माबाद येथून विकत आणावे लागत आहे. साडंपाणी नसल्याने स्नान करणे तर बंदच पण जनावरांनाही पाण्यासाठी  भटकंती करावी लागत आहे. गावातील पिठाच्या गिरणी बंद पडल्याने धर्माबाद येथून पीठ दळून आणावे लागत आहे. रात्रीच्या वेळी विंचू किड्याची भीती निर्माण झाली असून डासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRainपाऊसHailstormगारपीट