शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

खोटे बोलून मोदींनी देशाची अब्रु काढली - अ‍ॅड.आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 19:15 IST

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची घणाघाती टीका

भोकर (जि़नांदेड) : पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानचे विमान पाडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. त्यावर झालेल्या तपासात अमेरिकेने सांगितले की, पाकिस्तानला दिलेली सर्व १६ विमाने सुरक्षित आहेत. यावरुन मोदींनी खोटे बोलून जागतिक स्तरावर देशाची अब्रु काढल्याची घणाघाती टीका अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली़  

लोकसभा निवडणूकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्या प्रचारानिमित्त भोकर शहरातील मोंढा मैदानावर सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते़ मंचावर प्रा.यशपाल भिंगे, अ‍ॅड.अण्णाराव पाटील, फेरोजलाला, जाकेर चाऊस, प्रा.रामचंद्र भरांडे, प्रशांत इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, सध्याच्या सरकारचे चारित्र्य चोरांचे आहे़ कारण राफेल प्रकरणी पितळ उघडे पडू नये म्हणून कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगतात आणि सर्वोच्च न्यायालयात सांगतात की, कागदपत्रे समितीकडे आहेत. मंत्रालयातील कागदपत्रे जाळल्या जातात़ दहावी नापास असलेला पंतप्रधान देश कसा सांभाळणार असा प्रश्न करीत वंचित आघाडी सत्तेत आल्यास अशांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिला.

सध्या केंद्र व राज्यातील सरकारच्या काळात  विकासाची अनेक कामे बंद पडली़ कारण यांची टक्केवारी वाढल्याने कार्पोरेट करप्शन वाढल्याची टीकाही त्यांनी केली़ नोट बंदीचा अधिकार गव्हर्नरला असतो तर मग पंतप्रधाना हा अधिकार कोठून आला? देशात नोटबंदी करुन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली़ व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले. येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांचीही अवस्था शेतकऱ्यांसारखी झालेली दिसेल़ तेही आत्महत्येच्या मार्गाने जातील़ हे टाळण्यासाठी देशात परिवर्तन आवश्यक असल्याचे ते म्हणाले़  व्यापाऱ्यांनी हिंदू एकत्रीकरणाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे सांगून शेतकरी, व्यापारी, बहुजनांनी वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी रहावे, असे आवाहनही त्यांनी केले़ वंचित आघाडीच्या या सभेला भर उन्हातही मोठा प्रतिसाद लाभला़ 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019