शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

काँग्रेसची किमान उत्पन्न योजना सर्वसामान्यांसाठी लाभदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:49 IST

राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्न योजनेवर भाजपा टिका करीत आहे. काँग्रेसची ही योजना चांगली असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे सांगत त्यातूनच या योजनेवर टीका होत आहे. काँग्रेसकडे मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आहेत.

ठळक मुद्देअशोक चव्हाण: ‘आरएसएस’ला काँग्रेसचा वैचारिक विरोध

नांदेड : राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्न योजनेवर भाजपा टिका करीत आहे. काँग्रेसची ही योजना चांगली असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे सांगत त्यातूनच या योजनेवर टीका होत आहे. काँग्रेसकडे मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आहेत. सरकार कसे चालवायचे ? सरकारसाठी रिसोर्सेस कसे उभे करायचे? याचा अभ्यास या तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे काँग्रेसची ही योजना आमचे सरकार आल्यास आम्ही चांगल्या पद्धतीने राबविण्यात येईल, असा निर्धार खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.बुधवारी सायंकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना-भाजपाला तुम्ही विरोधक मानता तर मग त्यांच्या ऐवजी केवळ काँग्रेसवरच टिकेची झोड का? असा प्रश्न करीत केवळ काँग्रेसवर टीका केली जात असल्यामुळेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होत नाही. त्यातूनच ‘बी-टीम’ कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करतात, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. एमआयएमने काँग्रेस बुडण्याची चिंता करु नये, काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते काँग्रेसच्या बळकटीसाठी कटीबद्ध आहेत. त्यांनी काय ते एमआयएमचे पहावे, अशी टीप्पनीही चव्हाण यांनी केली.प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी लोकसभा उमेदवाराच्या अनुषंगाने काँग्रेस आरएसएस समर्थक असल्याचा आरोप केला असल्याचे विचारले असता, काँग्रे्रसचा राष्टÑीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वयेही संबंध नाही.काँग्रेसची विचारधारा स्वतंत्र आहे. आरएसएसशी आमचा वैचारिक विरोध आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांची समर्थक होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. खरे तर प्रकाश आंबेडकर यांनी सेना-भाजप विरोधात बोलले पाहिजे. मात्र ते काँग्रेसवर टीका करीत आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांचीही भूमिका स्पष्ट होत नाही. या अशा विधानामुळेच भाजपाची ‘बी-टीम’ कोण? असा प्रश्न चर्चेत येतो, असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती़

  • जिल्ह्याने सातत्याने काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला आहे़ जनतेचे काँग्रेसशी अतुट असे नाते आहे़ त्यामुळे नांदेडमध्ये विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी येथील सुजाण मतदार काँग्रेसची साथ सोडणार नाहीत़ नांदेडच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटीबद्ध आहे़ माझ्यावरील विश्वासाचे हे नाते या निवडणूकीच्या माध्यमातून अधिक मजबूत होईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला़
टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक