शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एनटीएचा सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:58 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा नीट ५ मे रोजी होणार आहे़ परंतु, परीक्षेच्या पाच ते सहा दिवस अगोदर अचानक परीक्षा केंद्र बदलण्यात आले़

ठळक मुद्देनीट परीक्षा : परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची धावपळ

श्रीनिवास भोसले ।नांदेड : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा नीट ५ मे रोजी होणार आहे़ परंतु, परीक्षेच्या पाच ते सहा दिवस अगोदर अचानक परीक्षा केंद्र बदलण्यात आले़ त्यामुळे नवीन केंद्र असलेले हॉलतिकीट काढण्यासाठी परीक्षार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ एनटीएच्या ढिसाळ कारभाराचा फटका परीक्षार्थ्यांना बसत आहे़एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस यासारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशपातळीवर एकच राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा घेतली जाते़ या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात़ यंदाची नीट परीक्षा ५ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे़ यंदा पहिल्यांदाच सदर परीक्षा घेण्याचे काम नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) ला देण्यात आले आहे़ यापूर्वी गतवर्षी सदर परीक्षा सीबीएससी बोर्डामार्फत घेण्यात आली होती़नॅशनल एलिजिबिलीटी कम एंट्रेंस टेस्ट (नीट) परीक्षेस नांदेड जिल्ह्यातून जवळपास अठरा ते वीस हजार विद्यार्थी सामोरे जातील, अशी माहिती आहे़ नीट परीक्षार्थ्यांना १५ एप्रिलपासून आॅनलाईन हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटच्या प्रिंट काढून घेतल्या आहेत़ विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दिलेल्या पर्यायी चार केंद्रांपैकी एकही केंद्र न देता भलतीकडेच परीक्षा केंद्र दिले आहेत़ तर शेकडो विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेरील केंद्र देण्यात आले़ त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे़शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शहरी भागातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे़ त्यामुळे पर्यायच कशाला दिले, असा प्रश्न पालकांसह परीक्षार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे़ त्याचबरोबर हॉलतिकीटवर गतवर्षी ड्रेसकोडविषयी माहिती देण्यात आली होती़ परंतु, यंदाच्या हॉलतिकीटवर ड्रेसकोड संबंधित कुठलीच सूचना नाही़नॅशनल टेस्टींग एजन्सी ही पहिल्यांदाच नीटची परीक्षा घेत असून नियोजन आणि जिल्हा पातळीवर समन्वय साधण्यासाठी त्यांच्याकडून समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत़ नांदेड जिल्हा समन्वयक म्हणून श्रीवास्तव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ परंतु, अचानक परीक्षा केंद्र का बदलले, जिल्ह्यात किती विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत, याविषयी कुठलीही माहिती त्यांच्याकडे अथवा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध होवू शकली नाही़ केंद्र बदलल्याची माहिती वेबसाईटवरदेखील टाकली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले़परीक्षार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवणे गरजेचे

  • नीट परीक्षेवर हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते़ त्यामुळे एनटीएच्या अशा सावळ्या गोंधळामुळे कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये़ ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलले आहेत़ त्या विद्यार्थ्यांपर्यंत सदर माहिती पोहोचविणे गरजेचे आहे़
  • नीटचे परीक्षा केंद्र का बदलले, याविषयीची माहिती नॅशनल टेस्टींग एजन्सीचे जिल्हा समन्वयक यांच्याकडे उपलब्ध होवू शकली नाही़
  • काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलल्यामुळे परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास आपले परीक्षा केंद्र बदलले तर नसेल?, असा प्रश्न पडत आहे़ त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे़
टॅग्स :Nandedनांदेडexamपरीक्षाStudentविद्यार्थी