शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शासकीय कार्यालयात मार्च एंडिंगची लगीनघाई; निधी पडून, टेबलावरची फाईल आता घेणार गती

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 6, 2024 18:55 IST

शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेतील चित्र

नांदेड: मार्च एंडिंग आता जवळ येऊ लागला असल्याने विविध योजनांचा निधी ३१ मार्चपूर्वी कसा खर्च करता येईल, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका यासह सर्वच शासकीय कार्यालयात मार्च एंडिंगची लगीनघाई पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेंतर्गत विकासकामासांठी निधी उपलब्ध होत असतो. हा निधी दिलेल्या आर्थिक वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे, अन्यथा अनेकवेळा उपलब्ध निधी वेळेत खर्च न झाल्याने तो परत पाठवावा लागतो. शासनाचा निधी विकासाच्या विविध बाबींवर खर्च व्हावा, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तसे नियोजन सुरू असल्याचे चित्र अनेक शासकीय कार्यालयांत दिसून येत आहे.

अनेक कामांना वर्क ऑर्डर मिळूनही ती कामे सहा महिने लोटली तरी सुरू झालेली नसतात, तर काही कामे वेळेत पूर्ण करूनही त्याचा निधी शासनस्तरावर प्रलंबित असतो. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विभागामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे दिसून येते. विविध विकासकामे केलेल्या संस्था, कंत्राटदारही कामाचे बिल वेळेत मिळावे, यासाठी शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांत चकरा मारताना दिसत आहेत. म्हणून गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत व महापालिकेत येणाऱ्या कंत्राटदार तत्सम व्यक्तींची संख्या वाढलेली आहे.

टेबलावरची फाईल घेणार गतीएखाद्या कामाची शासकीय कार्यालयातील टेबलावर अनेक महिन्यांपासून फाईल पडून असते. पण, संबंधित कर्मचारी त्या फायलींचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घेत नाही, पण आता मार्च जवळ येऊ लागल्याने टेबलावरच असलेल्या फाईल आता गती घेत आहेत.

पंचवीस पंधरांची अनेक बिले रखडलीजिल्ह्यात विविध आर्थिक वर्षात कामे केलेली अनेक बिले मागील चार ते पाच वर्षांपासून रखडली आहेत. संबंधित विभागाकडून फायली वरिष्ठ कार्यालयात पाठविल्या जातात, पण वरिष्ठांकडून विविध कारणे दाखवत त्या फायली परत बांधकाम विभागाकडे पाठविल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची बिले गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nandedनांदेड