शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठवाड्यात रेमडेसिविरचा पुरवठा विस्कळीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

नांदेड- गंभीर संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. मागील काही दिवसांपासून या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली ...

नांदेड- गंभीर संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. मागील काही दिवसांपासून या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र, तरीही पुरवठा सुरळीत झालेला नाही. १ ते ९ मे या कालावधीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना ८९ हजार १२७ इंजेक्शन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, केवळ ५० हजार ४९५ इंजेक्शन मिळणार आहेत. रेमडेसिविर विषाणूवर मात करणारे ॲन्टीव्हायरल औषध आहे. इबोला या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी ते विकसित करण्यात आले होते. तेच इंजेक्शन आता कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येते. कोरोनाबाधिताच्या फुफ्फुसाला संसर्ग होतो. एचआरसीटी चाचणीत हा स्कोअर ९ च्या पुढे गेल्यानंतर तसेच रुग्णाचा ताप आटोक्यात येत नसेल तर रेमडेसिविर दिले जाते. सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड उपचारासाठी या इंजेक्शनची शिफारस केली होती. त्यानुसार ३० जून २०२० पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागले. राज्य शासनाने १४०० रुपयांपेक्षा अधिक पैसे या इंजेक्शनसाठी देऊ नका असे स्पष्ट सांगितले असले तरी मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून अगदी २० ते ४० हजारालाही इंजेक्शन खरेदी करणारे अनेकजण भेटतात. मध्यंतरीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने रेमडिसिवर कोरोनाच्या उपचारातून काढून टाकले मात्र त्यानंतरही या इंजेक्शनची मागणी कायम आहे.

२१ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना ५५ हजार २४१ इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले हाेते. मात्र, या कालावधीत केवळ ४१ हजार ७३७ इंजेक्शनचा पुरवठा झाला. त्यानंतर काही जिल्ह्यांतून इंजेक्शनची मागणी वाढल्यानंतर जिल्हानिहाय पुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले. आता १ ते ९ मे या कालावधीसाठी मराठवाड्याला ८९ हजार १२७ इंजेक्शन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, याही वेळी इंजेक्शनचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असून ९ मेपर्यंत ५० हजार ४९५ इंजेक्शन देण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस इंजेक्शनचा तुटवडा कायम राहण्याचीच शक्यता आहे.

कोट........

राज्य शासनाने जिल्हानिहाय इंजेक्शनचा कोटा ठरविलेला आहे. मध्यंतरीच्या काळात मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत होती. मात्र आता काहीशी परिस्थिती सुधारल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही मागणीपेक्षा कमी इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांनी गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करायला हवा, एचआरसीटी स्कोअर ९ पेक्षा असेल तर हे इंजेक्शन रुग्णाला देण्याची गरज नाही.

- डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी, नांदेड