शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

मराठवाड्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST

भोकर (जि.नांदेड) : भाजप सरकारला सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही. केवळ भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्याचे काम या सरकारकडून केले जात असून ...

भोकर (जि.नांदेड) : भाजप सरकारला सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही. केवळ भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्याचे काम या सरकारकडून केले जात असून केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगारांविषयीचे दोन्ही कायदे मारक असल्याची टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी कायद्याच्या अनुषंगाने इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले. मागील राज्य शासनाच्या काळात मराठवाड्याचा विकास थांबला आहे. या विकासाला महाविकास आघाडीने पुन्हा गती दिल्याचे सांगत या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

भोकर शहरासह व तालुक्यातील १९४ रुपये कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर महाआघाडीच्या वतीने शहरातील मोंढा मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवशी बु. येथील मयत बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. मंचावर आ. अमरनाथ राजूरकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, राकाँचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, सभापती बाळासाहेब रावणगावकर, संजय बेळगे, रामराव नाईक, पं.स. सभापती नीता रावलोड, माजी सभापती गोविंदबाबा गौड, नागनाथराव घिसेवाड यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आगामी भोकर पालिका निवडणूक अनुषंगाने बोलताना जो लोकांना मान्य तोच मला मान्य राहणार असून जनसमर्थन दाखविणाऱ्यांनाच उमेदवारी मिळेल असे सुतोवाच त्यांनी केले. यावेळी जिल्ह्यासह तालुक्यात महाआघाडी सरकारने मंजूर केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा त्यांनी भाषणात मांडला. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी तर सूत्रसंचालन रामचंद्र मुसळे यांनी केले. शेवटी जगदीश पाटील भोसीकर यांनी आभार मानले.

चाैकट .......

विरोधक अवैध व्यवसायात मग्न

लोकसभेत या भागाचे नेतृत्व करणाऱ्यांनी पाळज येथील गणराया पुढे केलेली घोषणा खोटी ठरली, पाळज तीर्थक्षेत्र श्रद्धेचे ठिकाण आहे, दुकान नाही असा टोला लगावत जिल्ह्यात अवैध धंद्याचे अड्डे कोणाच्या राजकीय वरदहस्ताने चालतात हे जिल्हावासियांना माहीत आहे. जनतेच्या विकास कामांचे त्यांना देणे-घेणे नसल्याची टीका करीत जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेले हे अवैध धंदे मोडीत काढू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

महाआघाडीत बिघाडी होणार नाही

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काॅँग्रेससह मित्रपक्षांना जिल्ह्यात दमदार यश मिळाले आहे. विजयी झालेल्या सदस्यांनी एकोप्याने राहून गावाचा विकास करावा. अशा गावकारभाऱ्यांच्या पाठीशी कायम राहीन, अशी ग्वाही देत राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात एकोपा झाल्यामुळेच भाजपाला रोखता आले. राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठबळ असल्यामुळे राज्यातील महाआघाडीत बिघाडी होणार नाही, संपूर्ण पाच वर्ष सरकार सत्तेत राहील असे ते म्हणाले.

(फोटो कॅप्शन -

भोकर शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीच्या पहिला मजला कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगारानी अंबुलगेकर, काॅँग्रेस जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील , पंचायत समितीच्या सभापती निता रावलोड, बाबुराव सायाळकर आदी.)

(फोटो क्रमांक - २३एनपीएच जेएएन ०८ जेपीजी)