शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Maharashtra Election 2019: पराभवाच्या छायेने अनेक उमेदवारांचे अवसान गळाले; अंतिम टप्प्यात खर्चासाठी घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:02 IST

Maharashtra Election 2019: निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़

ठळक मुद्देआमदारकीच्या स्वप्नासाठी संपत्तीची विक्रीखर्चापाणी बंद झाल्याने ऐनवेळी कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवाराचा झेंडा हाती घेत आहेत़

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत १९ आॅक्टोबर हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे़ त्यानंतर दोन दिवसांनी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे़ परंतु, त्यापूर्वीच मतदारसंघातील जनतेच्या कौलाचा अंदाज घेत पराभवाच्या छायेतील उमेदवारांचे अवसान गळाले आहे़ त्यामुळे अशा अनेक उमेदवारांनी खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ खर्चापाणी बंद झाल्याने ऐनवेळी कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवाराचा झेंडा हाती घेत आहेत़

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांनी आमदारकीचे स्वप्न पाहत उडी घेतली़ पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतरही कार्यकर्त्यांनी दिलेल्या उसन्या अवसानावर रिंगणात उतरले आहेत़ त्यात निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़ ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत काही उमेदवारांनी तर मुंबईतील फ्लॅट अन् गावाकडच्या शेतजमिनींचा सौदा केला़ दिग्गज उमेदवारांना बजेटची चिंता नसली तरी, ऐनवेळी रोख रक्कम तीही मुबलक प्रमाणात असण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़ अशांच्या मदतीला त्यांचेच हितचिंतक धावून आले़ दिवसेंदिवस निवडणुका महाग होत चालल्या आहेत़ त्यामुळे पैसे खर्च करण्यात हात आखडता घेणारे कार्यकर्ते मग रिंगणात कशाला उतरलात?  असे खोचक प्रश्न विचारत आहेत

निवडणुकीची रणधुमाळी  अंतिम टप्प्यात आली़ १९ आॅक्टोबर हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे़ त्यामुळे २१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर सभा अन् रॅली काढता येणार नाहीत़ परंतु अंतर्गत प्रचार मात्र सुरु राहणार आहे़ त्यामुळे या काळातही खर्च सुरुच राहील़ परंतु आताच अनेक उमेदवारांचे पराभवाच्या छायेत अवसान गळाले आहे़ त्यामुळे खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ त्यामुळे कार्यकर्तेही संतप्त झाले आहेत़ ऐनवेळी या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या उमेदवाराचा झेंडा हाती घेतला आहे़ तर काही उमेदवारांनी थेट अन्य उमेदवाराला पाठींबा दिला आहे़ 

आमदारकीच्या स्वप्नासाठी संपत्तीची विक्रीनिवडणूक म्हटले की, अफाट खर्च आलाच़ निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चासाठी २५ लाखांची मर्यादा घालून दिली असली तरी, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक खर्च करण्यात येतो हे सर्वश्रुत आहे़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हजारो कोटी रुपयांचा चुराडा होतो़ निवडून येण्याची खात्री असलेल्या अनेक उमेदवारांना रोख रकमेची चणचण भासू लागली आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्याजवळील शेतजमीन, घर, फ्लॅट यांचे सौदे करुन त्याद्वारे रक्कम उभी केली आहे़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिणbhokar-acभोकरloha-acलोहाdeglur-acदेगलूर