शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: पराभवाच्या छायेने अनेक उमेदवारांचे अवसान गळाले; अंतिम टप्प्यात खर्चासाठी घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:02 IST

Maharashtra Election 2019: निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़

ठळक मुद्देआमदारकीच्या स्वप्नासाठी संपत्तीची विक्रीखर्चापाणी बंद झाल्याने ऐनवेळी कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवाराचा झेंडा हाती घेत आहेत़

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत १९ आॅक्टोबर हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे़ त्यानंतर दोन दिवसांनी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे़ परंतु, त्यापूर्वीच मतदारसंघातील जनतेच्या कौलाचा अंदाज घेत पराभवाच्या छायेतील उमेदवारांचे अवसान गळाले आहे़ त्यामुळे अशा अनेक उमेदवारांनी खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ खर्चापाणी बंद झाल्याने ऐनवेळी कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवाराचा झेंडा हाती घेत आहेत़

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांनी आमदारकीचे स्वप्न पाहत उडी घेतली़ पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतरही कार्यकर्त्यांनी दिलेल्या उसन्या अवसानावर रिंगणात उतरले आहेत़ त्यात निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़ ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत काही उमेदवारांनी तर मुंबईतील फ्लॅट अन् गावाकडच्या शेतजमिनींचा सौदा केला़ दिग्गज उमेदवारांना बजेटची चिंता नसली तरी, ऐनवेळी रोख रक्कम तीही मुबलक प्रमाणात असण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़ अशांच्या मदतीला त्यांचेच हितचिंतक धावून आले़ दिवसेंदिवस निवडणुका महाग होत चालल्या आहेत़ त्यामुळे पैसे खर्च करण्यात हात आखडता घेणारे कार्यकर्ते मग रिंगणात कशाला उतरलात?  असे खोचक प्रश्न विचारत आहेत

निवडणुकीची रणधुमाळी  अंतिम टप्प्यात आली़ १९ आॅक्टोबर हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे़ त्यामुळे २१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर सभा अन् रॅली काढता येणार नाहीत़ परंतु अंतर्गत प्रचार मात्र सुरु राहणार आहे़ त्यामुळे या काळातही खर्च सुरुच राहील़ परंतु आताच अनेक उमेदवारांचे पराभवाच्या छायेत अवसान गळाले आहे़ त्यामुळे खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ त्यामुळे कार्यकर्तेही संतप्त झाले आहेत़ ऐनवेळी या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या उमेदवाराचा झेंडा हाती घेतला आहे़ तर काही उमेदवारांनी थेट अन्य उमेदवाराला पाठींबा दिला आहे़ 

आमदारकीच्या स्वप्नासाठी संपत्तीची विक्रीनिवडणूक म्हटले की, अफाट खर्च आलाच़ निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चासाठी २५ लाखांची मर्यादा घालून दिली असली तरी, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक खर्च करण्यात येतो हे सर्वश्रुत आहे़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हजारो कोटी रुपयांचा चुराडा होतो़ निवडून येण्याची खात्री असलेल्या अनेक उमेदवारांना रोख रकमेची चणचण भासू लागली आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्याजवळील शेतजमीन, घर, फ्लॅट यांचे सौदे करुन त्याद्वारे रक्कम उभी केली आहे़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिणbhokar-acभोकरloha-acलोहाdeglur-acदेगलूर