शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST

वाफेच्या मशीनचे मोफत वाटप मुखेड - शहरातील वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांना वाफेच्या मशीनचे मोफत वाटप आ. तुषार राठोड ...

वाफेच्या मशीनचे मोफत वाटप

मुखेड - शहरातील वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांना वाफेच्या मशीनचे मोफत वाटप आ. तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजकुमार बामणे, चंद्रकांत गरूडकर, नासेरखान पठाण, जगदीश बियाणी, दीपक मुक्कावार, उत्तम बनसोडे, पोलीस निरीक्षक विलास गबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब मगरे, राजकुमार बामणे, माधव टाकळे, किशोर चव्हाण यांची उपस्थिती होती.

पोक्सोतील आरोपीला अटक

कुंडलवाडी - अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ८ जून रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. ही घटना ७ जून रोजी घडली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे तपास करीत आहेत.

दिव्यांगांचे आमरण उपोषण

भोकर - येथील तहसील कार्यालयासमोर दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. दिव्यांगांना घरकूल मंजूर करावे, संजय गांधी निराधार योजनेमध्ये सदस्यत्व द्यावे, प्रलंबित रिफंड द्यावा, डीआरडीओमध्ये समावेश करावा, अंत्योदय योजनेत समावेश व्हावा आदी मागण्यांसाठी दिव्यांगांनी हे उपोषण सुरू केले आहे.

पावसामुळे नाल्या फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर

हिमायतनगर - हिमायतनगर शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नाल्यामध्ये कचरा अडकून दबावामुळे नाल्या व रस्त्यावरील पाईप फुटून नालीतील घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. गुरुजी चौक येथील नाली तुंबून रस्त्यावरील पाईप फुटल्याने नालीतील पाणी कापड मार्केट परिसरात वाहून दुर्गंधी सुटली आहे. या संदर्भात व्यापारी जयस्वाल यांनी वारंवार तक्रारी करूनही नगर पंचायतीने लक्ष दिले नाही. नाल्या तुंबून महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा तर काही भागात घाण पाणी थेट रस्त्यावर येते. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी ठेकेदाराला दर महा १५ लाख रुपये दाम मोजले जातात असा सवाल आहे. ग्रामपंचायत असताना शहराची स्वच्छता व नाले सफाई ९० हजारात व्हायची, आता १५ लाख खर्चूनही शहर घाणीच्या विळख्यात आणि डासांच्या गर्तेत सापडले आहे.

बोधडीला नगर पंचायतीचा दर्जा द्या

बोधडी - बोधडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा देऊन गावचा विकास करावा अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. किनवट तालुक्यातील सर्वात मोठी म्हणून ग्रामपंचायत पाहिले जाते. २० ते २५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. नगरपंचायतची मागणी अतिशय जुनी आहे. मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप आहे.