शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST

वाफेच्या मशीनचे मोफत वाटप मुखेड - शहरातील वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांना वाफेच्या मशीनचे मोफत वाटप आ. तुषार राठोड ...

वाफेच्या मशीनचे मोफत वाटप

मुखेड - शहरातील वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांना वाफेच्या मशीनचे मोफत वाटप आ. तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजकुमार बामणे, चंद्रकांत गरूडकर, नासेरखान पठाण, जगदीश बियाणी, दीपक मुक्कावार, उत्तम बनसोडे, पोलीस निरीक्षक विलास गबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब मगरे, राजकुमार बामणे, माधव टाकळे, किशोर चव्हाण यांची उपस्थिती होती.

पोक्सोतील आरोपीला अटक

कुंडलवाडी - अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ८ जून रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. ही घटना ७ जून रोजी घडली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे तपास करीत आहेत.

दिव्यांगांचे आमरण उपोषण

भोकर - येथील तहसील कार्यालयासमोर दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. दिव्यांगांना घरकूल मंजूर करावे, संजय गांधी निराधार योजनेमध्ये सदस्यत्व द्यावे, प्रलंबित रिफंड द्यावा, डीआरडीओमध्ये समावेश करावा, अंत्योदय योजनेत समावेश व्हावा आदी मागण्यांसाठी दिव्यांगांनी हे उपोषण सुरू केले आहे.

पावसामुळे नाल्या फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर

हिमायतनगर - हिमायतनगर शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नाल्यामध्ये कचरा अडकून दबावामुळे नाल्या व रस्त्यावरील पाईप फुटून नालीतील घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. गुरुजी चौक येथील नाली तुंबून रस्त्यावरील पाईप फुटल्याने नालीतील पाणी कापड मार्केट परिसरात वाहून दुर्गंधी सुटली आहे. या संदर्भात व्यापारी जयस्वाल यांनी वारंवार तक्रारी करूनही नगर पंचायतीने लक्ष दिले नाही. नाल्या तुंबून महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा तर काही भागात घाण पाणी थेट रस्त्यावर येते. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी ठेकेदाराला दर महा १५ लाख रुपये दाम मोजले जातात असा सवाल आहे. ग्रामपंचायत असताना शहराची स्वच्छता व नाले सफाई ९० हजारात व्हायची, आता १५ लाख खर्चूनही शहर घाणीच्या विळख्यात आणि डासांच्या गर्तेत सापडले आहे.

बोधडीला नगर पंचायतीचा दर्जा द्या

बोधडी - बोधडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा देऊन गावचा विकास करावा अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. किनवट तालुक्यातील सर्वात मोठी म्हणून ग्रामपंचायत पाहिले जाते. २० ते २५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. नगरपंचायतची मागणी अतिशय जुनी आहे. मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप आहे.