शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Lok Sabha Election 2019 : शेकापचा लालबावटा मराठवाड्यातून पहिल्यांदाच रिंगणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 16:41 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मराठवाड्यातून लालबावटा हद्दपार झाल्याचे दिसून येते.

- विशाल सोनटक्के 

नांदेड : संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा मराठवाड्यासह महाराष्ट्रभर पसरला होता. नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीने विधानसभेसह लोकसभेतही आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्र गंभीर झालेले असताना संघर्षाचा इतिहास असलेला शेकापचा लालबावटा पहिल्यांदाच मराठवाड्यातून निवडणूक रिंगणाबाहेर गेला आहे. 

शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहिलेल्या उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, किशनराव देशमुख तसेच केशवराव धोंडगे आदींनी शेतकरी कामगार पक्षाचा मराठवाड्यात वेगळा दबदबा निर्माण केला होता. उद्धवराव पाटील यांच्या बांधणीमुळे  उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यात अनेक वर्षे शेकापचे अस्तित्व कायम होते. १९७७ च्या लाटेत उद्धवराव पाटील यांनी लातूर लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. या बरोबरच लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, रेणापूर व अहमदपूर तालुक्यांत शेकापचा प्रभाव होता. किशनराव देशमुख यांनी तब्बल तीन वेळा अहमदपूरचे प्रतिनिधीत्व केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातही परंडा, कळंब, उमरगा आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात शेकापने प्रभाव दाखविला होता. कळंबमधून कुंडलिक घोडके तर तुळजापुरातून माणिकराव खपले यांनी प्रत्येकी तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. तुळजापुरात नगराध्यक्षपदही शेकापकडे होते. बीड जिल्ह्यातील चौसाळ्याचे जनार्दन तुपे यांनी १९९५ पर्यंत काँग्रेसशी लढा दिला. तर माजलगावमध्ये गंगाभीषण धावरे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शेकापचा लालबावटा फडफडत ठेवला होता. परभणी जिल्ह्णात आण्णासाहेब गव्हाणे, नारायणराव वाघमारे, शेषराव देशमुख आदी मंडळींनी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचे काम केले. जिल्ह्यातील पाथरी, सिंगणापूर परिसरावरही शेकापची छाप होती. विशेष म्हणजे गंगाखेड मतदारसंघात शेकापच्याच ज्ञानोबा गायकवाड यांनी चार वेळा निवडून येण्याचा पराक्रम केला होता. हिंगोलीतील वसमतमध्येही शेकापने अनेक वर्षे झूंज दिली. १९७७ च्या लाटेत शेकापच्या भाई केशवराव धोंडगे यांनी नांदेडचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर कंधार विधानसभा मतदारसंघातू शेकापचेच गुरुनाथ कुरुडे निवडून आले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मराठवाड्यातून लालबावटा हद्दपार झाल्याचे दिसून येते.

जनता दल, जनता पार्टीही निष्प्रभजनता पार्टीचे नेते शरद जोशी यांनी १९९६ मध्ये नांदेड लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यांना ७१ हजार ४६० मते मिळाली होती; तर १९८९ ची लोकसभा जनता दलाच्या वतीने लढून २ लाख ७८ हजार ३२० मते घेत डॉ. व्यंकटेश काब्दे हे विजयी झाले होते. या बरोबरच १९९८ मध्ये जनता पार्टीच्या वतीने शंकर धोंडगे यांनी निवडणूक लढविली होती. त्याचवेळी जनता दलाकडून व्यंकटेश काब्देही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र शेकापप्रमाणेच याही दोन्ही पक्षांचा प्रभाव त्यानंतर ओसरत गेला. 

विधानसभेला सहा जागा लढविणार?मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष लोकसभेची एकही जागा लढवीत नाही हे खरे आहे; परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शेकापसाठी मराठवाड्याला ६ जागा सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीशी शेकापचे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच शेकापसाठी असलेली मावळ लोकसभेची जागा पक्षाने पार्थ पवार यांच्यासाठी सोडली आहे. तिथे चार तालुक्यांत शेकापचे प्रभुत्व आहे. नवी पिढी शेकापसोबत जोडण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतल्या आहेत.- भाई काकासाहेब शिंदे (औरंगाबाद), मराठवाडा विभागीय चिटणीस, शेकाप

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९MarathwadaमराठवाडाPoliticsराजकारण