शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये विकासकामांचा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:06 IST

मतदार विचारतात, साडेचार वर्षांत नांदेडसाठी काय दिले?

- विशाल सोनटक्के

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी तिरंगी सामना रंगला आहे़ प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रमुख पक्षांकडून जंगी सभांवर भर दिला जात आहे़ मात्र या सभांमध्ये विकासकामांचा मुद्दा भाजपासाठी अडचणीचा ठरत आहे़ युती शासनाच्या मागील साडेचार वर्षाच्या कालावधीत नांदेडला काय दिले? या प्रश्नावर युतीच्या नेत्यांना निरुत्तर व्हावे लागत आहे़

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नांदेड लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे़ दुसरीकडे भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे रिंगणात आहेत़ चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये नुकतीच प्रचारसभा घेतली़ या सभेला गर्दी जमविण्यात भाजपला यश आले असले तरी विकासकामांऐवजी आरोप-प्रत्यारोपावरच मोदींनी भर दिल्याचे दिसून आले़ दुसरीकडे काँग्रेस मात्र मागील कार्यकाळात नांदेडमध्ये केलेल्या विकासकामांची यादीच मतदारांसमोर मांडत आहे़ सध्या राज्यातील अनेक भाग पाणीटंचाईमुळे होरपळून निघालेले असताना नांदेडकरांना मात्र टंचाईची तीव्रता जाणवत नाही़ दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी साकारलेल्या विष्णूपुरी, उर्ध्व पैनगंगा तसेच सिद्धेश्वर आणि येलदरी प्रकल्पामुळेच हे शक्य झाल्याचे काँग्रेसतर्फे सांगितले जात आहे़ 

नांदेडला स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची शक्यता असतानाही शंकररावांनी आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र तर अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेडमध्ये आलेले रेल्वेचे विभागीय कार्यालय,  विमानतळाचा विस्तार, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत केलेली २,२०० कोटींची कामे तसेच गुरू-ता-गद्दीच्या माध्यमातून शहरात ७५० कोटी खर्चून केलेली विकासकामे काँग्रेस कार्यकर्ते मतदारांत घेऊन जात आहेत़ राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाव्यतिरिक्त सांगण्यासारखा एकही मोठा प्रकल्प नसल्याने युतीचे नेते विकासकामाचा हा मुद्दा टाळताना दिसून येतात़ त्यामुळेच मोदींंनीही जाहीर सभेत विकासकामांऐवजी काँग्रेसवर एकतर्फी टीका करणेच पसंत केले़ आता तीनही उमेदवार आक्रमक प्रचारावर भर देतील. 

प्रमुख उमेदवारअशोक चव्हाण । काँग्रेसप्रताप पाटील । भाजपयशपाल भिंगे । वंचित आघाडी

कळीचे मुद्देनांदेडसाठी स्वतंत्र आयुक्तालय देण्याची आग्रही मागणी आहे़ यावर सेना-भाजप नेते काय बोलतात, याची उत्सुकता आहे़ भाजप सरकार नांदेडकरांचे पाणी पळवीत असल्याचा आरोप होतो आहे़ याबाबतही भाजपला स्पष्टीकरण द्यावे लागेल़ 

जनता मतदानातून उत्तर देईल जातीपातीचे राजकारण काही काळ चालते़; परंतु सर्वांनाच विकास हवा असतो़ त्यामुळे आम्ही विकासाचे राजकारण करतो़ यूपीपी धरण काँग्रेसने आणले़; परंतु भाजपा सरकार या धरणातील पाणी वरच्या भागात वळती करण्याचा प्रयत्न करीत आहे़ या प्रकाराला येथील जनता मतदानातून उत्तर देईल़    - अशोक चव्हाण, काँग्रेस

विकासासाठी संधी द्या विकासकामे करण्यासाठी संधी देण्याची विनंती आम्ही मतदारांकडे करीत आहोत़ नांदेडच्या विकासासाठी मी स्वत: पाच कोटींचा निधी आणला़ मी केवळ विकासाच्या गप्पा आणि भावनिक मुद्यावर भर देत नाही़ सध्या महामार्गाची हजारो कोटींची कामे जिल्ह्यात सुरू आहेत़       - प्रताप पाटील, भाजप

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019