शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दंड भरू, पण बाहेर फिरू, विनाकारण फिरणारे ६२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

नांदेड शहरातील रूग्णसंख्या मार्चपासून झपाट्याने वाढू लागल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. त्यात एप्रिल महिन्यात दररोज अडीच हजाराहून अधिक रूग्ण ...

नांदेड शहरातील रूग्णसंख्या मार्चपासून झपाट्याने वाढू लागल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. त्यात एप्रिल महिन्यात दररोज अडीच हजाराहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्यात आला. त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. आजघडीला दररोज दोनशेच्या आसपास रूग्ण आढळत आहेत. त्यातही रूग्णालयात अथवा कोरोना तपासणी केंद्रावर जावून तपासणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने वेगवेगळी पथके तयार करून शहरात ठिकठिकाणी रिकामटेकड्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम सुरू केले. तसेच दुकानदारांचीही तपासणी करण्यात आली. या सर्व पथकांचे नियोजन डॉ.सचिन सिंघल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्या नियोजनानूसार शहरात जवळपास २३ ठिकाणी तपासणी केली जात आहे. आजघडील दिवसभरात बाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे स्वॅब घेतले जात आहेत. त्यात काही जणांची आरटीपीसीआर तर काही जणांची ॲन्टीजेन तपासणी केली जात आहे. १८ मेपासून चार दिवसात रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास चार हजार जणांची तपासणी केली. त्यापैकी अडीच हजार जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ५६ जण पॉझिटिव्ह आले. तर दिड हजार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच ८५१ जणांची ॲन्टीजेन टेस्ट केली असून त्यापैकी ६ जण पॉझिटिव्ह आले. दरम्यान, २२ मे रोजी रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल दिड हजार जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

शहरात २३ ठिकाणी तपासणी

नांदेड शहरात तपासणीचे झोननिहाय नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.सचिन सिंघल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रूग्ण तपासणीचे काम सुरू आहे. शहरात पंधरा ठिकाणी तसेच प्रत्येक झोनला एक आणि फिरते पथक असे एकूण २३ पथकाच्या माध्यमातून कोरोना टेस्टींगचे काम सुरू आहे. रस्त्यावरील तपासणीत वाढ केली असली तरी तपासणी केंद्रावर जावून तपासणी करणाऱ्यांची संख्या घटली आहे.

फिरणाऱ्यांची कारणे तिच, कोणाचा दवाखाना तर कोणाचा किराणा

घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कारणे ठरलेली आहेत. अनेकांकडून दवाखान्याची कारणे दिली जातात तर काही जणांकडून किराणा, भाजीपाला अथवा नातेवाईकांना दवाखान्यात डब्बा देण्यासाठी बाहेर पडलो, अशी तिच ती कारणे दिली जात आहेत. परिणामी रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास तयार नाही. त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे पाेलिसांनीही हात वर केल्याचे दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे पोलिसही कठोर कारवाई करत नसल्याने रिकामटेकड्यांचे फावत आहे.