शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरू, पण बाहेर फिरू, विनाकारण फिरणारे ६२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

नांदेड शहरातील रूग्णसंख्या मार्चपासून झपाट्याने वाढू लागल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. त्यात एप्रिल महिन्यात दररोज अडीच हजाराहून अधिक रूग्ण ...

नांदेड शहरातील रूग्णसंख्या मार्चपासून झपाट्याने वाढू लागल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. त्यात एप्रिल महिन्यात दररोज अडीच हजाराहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्यात आला. त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. आजघडीला दररोज दोनशेच्या आसपास रूग्ण आढळत आहेत. त्यातही रूग्णालयात अथवा कोरोना तपासणी केंद्रावर जावून तपासणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने वेगवेगळी पथके तयार करून शहरात ठिकठिकाणी रिकामटेकड्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम सुरू केले. तसेच दुकानदारांचीही तपासणी करण्यात आली. या सर्व पथकांचे नियोजन डॉ.सचिन सिंघल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्या नियोजनानूसार शहरात जवळपास २३ ठिकाणी तपासणी केली जात आहे. आजघडील दिवसभरात बाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे स्वॅब घेतले जात आहेत. त्यात काही जणांची आरटीपीसीआर तर काही जणांची ॲन्टीजेन तपासणी केली जात आहे. १८ मेपासून चार दिवसात रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास चार हजार जणांची तपासणी केली. त्यापैकी अडीच हजार जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ५६ जण पॉझिटिव्ह आले. तर दिड हजार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच ८५१ जणांची ॲन्टीजेन टेस्ट केली असून त्यापैकी ६ जण पॉझिटिव्ह आले. दरम्यान, २२ मे रोजी रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल दिड हजार जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

शहरात २३ ठिकाणी तपासणी

नांदेड शहरात तपासणीचे झोननिहाय नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.सचिन सिंघल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रूग्ण तपासणीचे काम सुरू आहे. शहरात पंधरा ठिकाणी तसेच प्रत्येक झोनला एक आणि फिरते पथक असे एकूण २३ पथकाच्या माध्यमातून कोरोना टेस्टींगचे काम सुरू आहे. रस्त्यावरील तपासणीत वाढ केली असली तरी तपासणी केंद्रावर जावून तपासणी करणाऱ्यांची संख्या घटली आहे.

फिरणाऱ्यांची कारणे तिच, कोणाचा दवाखाना तर कोणाचा किराणा

घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कारणे ठरलेली आहेत. अनेकांकडून दवाखान्याची कारणे दिली जातात तर काही जणांकडून किराणा, भाजीपाला अथवा नातेवाईकांना दवाखान्यात डब्बा देण्यासाठी बाहेर पडलो, अशी तिच ती कारणे दिली जात आहेत. परिणामी रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास तयार नाही. त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे पाेलिसांनीही हात वर केल्याचे दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे पोलिसही कठोर कारवाई करत नसल्याने रिकामटेकड्यांचे फावत आहे.