शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी निवडणुका थांबल्याने नवनेतृत्व निर्मिती प्रक्रियेस खीळ - जयदेव डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:27 IST

महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर होणा-या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधून नवनवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र ही निवडणूक प्रक्रिया थांबल्याने नवे नेतृत्वही विकसित होत नसल्याचे सांगत त्यामुळेच घराणेशाहीलाही चालना मिळाल्याचे माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी सांगितले.

नांदेड : महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर होणा-या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधून नवनवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र ही निवडणूक प्रक्रिया थांबल्याने नवे नेतृत्वही विकसित होत नसल्याचे सांगत त्यामुळेच घराणेशाहीलाही चालना मिळाल्याचे माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी सांगितले.

येथील पीपल्स कॉलेजच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्राचार्य डॉ. ना. य. डोळे स्मृती व्याख्यानमालेत ‘लोकशाहीची वार्ता’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सदाशिवराव पाटील होते. यावेळी महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. देवरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सध्याच्या काळात राजकारण निव्वळ सत्ता हस्तगत करण्यासाठी चाललेला खेळ झाले आहे. त्याला जी विचारांची आणि तत्त्वांची बैठक लागते ती नाहीशी झाली असून ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असल्याचे परखड मतही प्रा. डोळे यांनी व्यक्त केले.

निर्णय प्रक्रियेसंदर्भातील अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचली तरी मतदारांना विविध उमेदवारांमधून निवड करणे सोपे जाईल. परंतु आजकाल माध्यमांतून राजकारणाची नकारात्मक बाजू मोठ्या प्रमाणात पुढे आणली जात आहे. त्यामुळे जनमाणसात राजकारणाबद्दल तिटकारा निर्माण होत असल्याचे सांगत राजकारणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रा. डोळे यांनी व्यक्त केली.

समारोपात पाटील यांनी डॉ. डोळे यांची लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांवर निष्ठा होती. ही मूल्ये त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्याने भारतीय लोकशाहीला बळ मिळाल्याचे गौरवोद्गार काढले. तर प्राचार्य दवरे यांनी डॉ. ना. य. डोळे यांनी आवर्जुन मराठीतून राज्यशास्त्र विषयातील विपूल ग्रंथनिर्मिती केल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला संस्था सचिव प्रा. श्यामल पत्की, प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव, डॉ. सी. के. हरनावळे, शंतनू डोईफोडे, दीपनाथ पत्की, प्रा. उत्तमराव सूर्यवंशी, प्राचार्य गोपाळराव कदम, प्राचार्य देवदत्त आणि प्रा. शारदा तुंगार, प्रा. मधुकर राहेगावकर, डॉ. जीवन पिंपळवाडकर, प्रा. लक्ष्मण कोतापल्ले, प्रा. डॉ. ललिता अलसटवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अशोक सिद्धेवाड, सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल दहीफळे तर डॉ. विशाल पतंगे यांनी आभार मानले.