शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी निवडणुका थांबल्याने नवनेतृत्व निर्मिती प्रक्रियेस खीळ - जयदेव डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:27 IST

महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर होणा-या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधून नवनवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र ही निवडणूक प्रक्रिया थांबल्याने नवे नेतृत्वही विकसित होत नसल्याचे सांगत त्यामुळेच घराणेशाहीलाही चालना मिळाल्याचे माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी सांगितले.

नांदेड : महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर होणा-या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधून नवनवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र ही निवडणूक प्रक्रिया थांबल्याने नवे नेतृत्वही विकसित होत नसल्याचे सांगत त्यामुळेच घराणेशाहीलाही चालना मिळाल्याचे माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी सांगितले.

येथील पीपल्स कॉलेजच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्राचार्य डॉ. ना. य. डोळे स्मृती व्याख्यानमालेत ‘लोकशाहीची वार्ता’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सदाशिवराव पाटील होते. यावेळी महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. देवरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सध्याच्या काळात राजकारण निव्वळ सत्ता हस्तगत करण्यासाठी चाललेला खेळ झाले आहे. त्याला जी विचारांची आणि तत्त्वांची बैठक लागते ती नाहीशी झाली असून ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असल्याचे परखड मतही प्रा. डोळे यांनी व्यक्त केले.

निर्णय प्रक्रियेसंदर्भातील अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचली तरी मतदारांना विविध उमेदवारांमधून निवड करणे सोपे जाईल. परंतु आजकाल माध्यमांतून राजकारणाची नकारात्मक बाजू मोठ्या प्रमाणात पुढे आणली जात आहे. त्यामुळे जनमाणसात राजकारणाबद्दल तिटकारा निर्माण होत असल्याचे सांगत राजकारणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रा. डोळे यांनी व्यक्त केली.

समारोपात पाटील यांनी डॉ. डोळे यांची लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांवर निष्ठा होती. ही मूल्ये त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्याने भारतीय लोकशाहीला बळ मिळाल्याचे गौरवोद्गार काढले. तर प्राचार्य दवरे यांनी डॉ. ना. य. डोळे यांनी आवर्जुन मराठीतून राज्यशास्त्र विषयातील विपूल ग्रंथनिर्मिती केल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला संस्था सचिव प्रा. श्यामल पत्की, प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव, डॉ. सी. के. हरनावळे, शंतनू डोईफोडे, दीपनाथ पत्की, प्रा. उत्तमराव सूर्यवंशी, प्राचार्य गोपाळराव कदम, प्राचार्य देवदत्त आणि प्रा. शारदा तुंगार, प्रा. मधुकर राहेगावकर, डॉ. जीवन पिंपळवाडकर, प्रा. लक्ष्मण कोतापल्ले, प्रा. डॉ. ललिता अलसटवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अशोक सिद्धेवाड, सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल दहीफळे तर डॉ. विशाल पतंगे यांनी आभार मानले.