शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गांधी-आंबेडकरांच्या विचारांची कुरुंदकरांनी पेलली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:49 IST

देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरुंदकर यांनी पेलली़ स्वातंत्र्य हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दत्ता भगत यांनी कुरुंदकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले़

ठळक मुद्देदत्ता भगत यांचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचा कुरुंदकर पुरस्कार वितरण सोहळा थाटात

नांदेड : देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरुंदकर यांनी पेलली़ स्वातंत्र्य हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दत्ता भगत यांनी कुरुंदकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले़येथील कुसुम सभागृहात रविवारी जि़प़अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या नरहर कुरूंदकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ मंचावर आ़डी़पी़सावंत, ज्येष्ठ साहित्यिक भ़मा़परसावळे, डॉ़भगवान अंजनीकर, प्रा़ फ़मुं़ शिंदे, प्रा़मधू जामकर, डॉ़मथु सावंत, जि़प़शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जि़प़सदस्य साहेबराव धनगे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर आदींची प्रमुख उपस्थिती होती़नरहर कुरुंदकर यांनी विपुल लेखन केले़ ते असताना पंधरा पुस्तके प्रकाशित झाली होती़ मात्र त्यानंतर त्यांचे विपुल लेखन पाहून त्याच्या प्रकाशनासाठी प्रकाशन समिती नियुक्त करण्यात आली़ याची जबाबदारी माझ्यावर आली़ विशेषत: कोणत्या लेखनाला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे होते़ आज कुरुंदकर यांच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या ३५ इतकी आहे़ कुरुंदकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा स्वातंत्र्य होते़ त्यामुळेच त्यांच्या लेखांचे पहिले पुस्तक स्वातंत्र्यविषयक आशय असलेले ‘अभयारण्य’ प्रकाशित करण्यात आले़ जंगलातले पशू आज मानवी वस्तीत शिरत आहेत़ कारण मनुष्य त्यांचे जग उद्ध्वस्त करायला निघाला आहे़ पशुंची संख्या अशी वाढली तर माणसांसाठी अभयारण्य निर्माण करण्याची वेळ येईल़ त्यामुळेच या पुस्तकाला अभयारण्य हे नाव दिल्याचे सांगत कुरुंदकर यांच्या विचारांचे तसेच दूरदृष्टीचे प्रा़दत्ता भगत यांनी कौतुक केले़ तत्पूर्वी भ़मा़परसावळे यांनीही कुरुंदकरांच्या लिखाणाचा गौरव केला़ नरहर कुरुंदकर हे निरपेक्ष तितकेच परखड समीक्षक होते़ सर्वच विषयांवर प्रभुत्व असलेले ते संपूर्ण विद्वान होते़ प्रत्येक प्रश्नाचा ते लेखणीच्या माध्यमातून छडा लावत असत़ कुरुंदकरांनी याच निर्भीडपणे इस्लामचीही चिकित्सा केली़ राष्ट्रीय पातळीवर इस्लामची इतकी स्पष्ट आणि परखड चिकित्सा त्यापूर्वी केवळ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती़, असेही परसावळे यावेळी म्हणाले़ कुरुंदकर यांनी लेखणीच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविल्याचेही त्यांनी सांगितले. आ़डी़पी़सावंत, प्राफ़़मुं़शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली़ प्रास्ताविक शिक्षण सभापती माधवराव मिसाळे तर सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले़जिल्हा परिषदेकडून यांचा झाला गौरवजिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी कुसुम सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा़दत्ता भगत, प्रा़ फ़मु़ंशिंदे, डॉ.भगवान अंजनीकर, भ़मा़परसावळे, प्रा़मधू जामकर, प्रा़मथु सावंत यांना नरहर कुरुंदकर पुरस्काराने गौरविण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या वतीने साहित्यक्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्याचा हा उपक्रम मागील काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ तो कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही यावेळी मान्यवरांनी काढले़

टॅग्स :NandedनांदेडD.P. Sawantडी. पी. सावंत