शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

गांधी-आंबेडकरांच्या विचारांची कुरुंदकरांनी पेलली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:49 IST

देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरुंदकर यांनी पेलली़ स्वातंत्र्य हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दत्ता भगत यांनी कुरुंदकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले़

ठळक मुद्देदत्ता भगत यांचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचा कुरुंदकर पुरस्कार वितरण सोहळा थाटात

नांदेड : देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरुंदकर यांनी पेलली़ स्वातंत्र्य हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दत्ता भगत यांनी कुरुंदकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले़येथील कुसुम सभागृहात रविवारी जि़प़अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या नरहर कुरूंदकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ मंचावर आ़डी़पी़सावंत, ज्येष्ठ साहित्यिक भ़मा़परसावळे, डॉ़भगवान अंजनीकर, प्रा़ फ़मुं़ शिंदे, प्रा़मधू जामकर, डॉ़मथु सावंत, जि़प़शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जि़प़सदस्य साहेबराव धनगे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर आदींची प्रमुख उपस्थिती होती़नरहर कुरुंदकर यांनी विपुल लेखन केले़ ते असताना पंधरा पुस्तके प्रकाशित झाली होती़ मात्र त्यानंतर त्यांचे विपुल लेखन पाहून त्याच्या प्रकाशनासाठी प्रकाशन समिती नियुक्त करण्यात आली़ याची जबाबदारी माझ्यावर आली़ विशेषत: कोणत्या लेखनाला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे होते़ आज कुरुंदकर यांच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या ३५ इतकी आहे़ कुरुंदकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा स्वातंत्र्य होते़ त्यामुळेच त्यांच्या लेखांचे पहिले पुस्तक स्वातंत्र्यविषयक आशय असलेले ‘अभयारण्य’ प्रकाशित करण्यात आले़ जंगलातले पशू आज मानवी वस्तीत शिरत आहेत़ कारण मनुष्य त्यांचे जग उद्ध्वस्त करायला निघाला आहे़ पशुंची संख्या अशी वाढली तर माणसांसाठी अभयारण्य निर्माण करण्याची वेळ येईल़ त्यामुळेच या पुस्तकाला अभयारण्य हे नाव दिल्याचे सांगत कुरुंदकर यांच्या विचारांचे तसेच दूरदृष्टीचे प्रा़दत्ता भगत यांनी कौतुक केले़ तत्पूर्वी भ़मा़परसावळे यांनीही कुरुंदकरांच्या लिखाणाचा गौरव केला़ नरहर कुरुंदकर हे निरपेक्ष तितकेच परखड समीक्षक होते़ सर्वच विषयांवर प्रभुत्व असलेले ते संपूर्ण विद्वान होते़ प्रत्येक प्रश्नाचा ते लेखणीच्या माध्यमातून छडा लावत असत़ कुरुंदकरांनी याच निर्भीडपणे इस्लामचीही चिकित्सा केली़ राष्ट्रीय पातळीवर इस्लामची इतकी स्पष्ट आणि परखड चिकित्सा त्यापूर्वी केवळ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती़, असेही परसावळे यावेळी म्हणाले़ कुरुंदकर यांनी लेखणीच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविल्याचेही त्यांनी सांगितले. आ़डी़पी़सावंत, प्राफ़़मुं़शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली़ प्रास्ताविक शिक्षण सभापती माधवराव मिसाळे तर सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले़जिल्हा परिषदेकडून यांचा झाला गौरवजिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी कुसुम सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा़दत्ता भगत, प्रा़ फ़मु़ंशिंदे, डॉ.भगवान अंजनीकर, भ़मा़परसावळे, प्रा़मधू जामकर, प्रा़मथु सावंत यांना नरहर कुरुंदकर पुरस्काराने गौरविण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या वतीने साहित्यक्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्याचा हा उपक्रम मागील काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ तो कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही यावेळी मान्यवरांनी काढले़

टॅग्स :NandedनांदेडD.P. Sawantडी. पी. सावंत