शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सरकारच्या पाठबळामुळेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:59 IST

कोरेगाव-भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहीत आहे़ या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठीशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले़ हल्लाबोल यात्रेच्या दुसºया टप्प्यात मराठवाड्यात २६ सभा घेणार असून या माध्यमातून शेतकºयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कोरेगाव-भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहीत आहे़ या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठीशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले़ हल्लाबोल यात्रेच्या दुसºया टप्प्यात मराठवाड्यात २६ सभा घेणार असून या माध्यमातून शेतकºयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़मुंडे यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्य शासनाने १ तारखेपूर्वी अनेक बाबी हाताळण्याची आवश्यकता होती़ मात्र त्याकडे कानाडोळा केल्यानेच १ तारखेची दुदैवी घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले़ डिसेंबरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल यात्रा काढण्यात आली होती़ ११ दिवस चाललेल्या या यात्रेच्या माध्यमातून शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यात आला़ सरकार त्यावेळी पूर्णत: हतबल दिसले़ आमच्या मागण्यांनुसार त्यांनी काही निर्णयही घेतले, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही़ त्यामुळेच येत्या १६ तारखेपासून तुळजापूर येथून हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २७ विधानसभा मतदारसंघात या अंतर्गत २६ सभा घेण्यात येणार आहेत़ या यात्रेत माझ्यासह राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा़ सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांच्यासह सर्व नेते सहभागी होणार असून यात्रेचा समारोप ३ फेब्रुवारीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली़शेजारचे तेलंगणा राज्य शेतकºयांना कर्जमाफी देते़ त्यासोबतच २४ तास सलग वीज पुरवठा आणि तोही मोफत दिला जातो़तेलंगणासारख्या छोट्या राज्याला हा निर्णय घेता येतो़ मग महाराष्ट्र शासन याबाबत उदासीन का ? असा सवाल करीत शेतकºयांना मोफत वीजपुरवठा देण्याची मागणी या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले़हल्लाबोल यात्रा २० जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यात येणार आहे़ या दिवशी लोहा येथे सभा घेतल्यानंतर २१ रोजी दुपारी १ वाजता उमरी येथे तर सायंकाळी ५ वाजता माहूर येथे या यात्रेच्या माध्यमातून जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली़हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकºयांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी आम्ही केली होती़ यावर केंद्र, राज्य तसेच बी-बियाणे कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते़ प्रत्यक्षात बी-बियाणे कंपनीने अशी भरपाई देण्यास नकार दिल्याने सरकारने केलेली बोंडअळी बाबतच्या मदतीची घोषणा फसवी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले़‘मौका सभी को मिलता है ’देश पातळीवर समविचारी पक्षाने एकत्रित यावे असा सूर आहे़ त्यामुळेच नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या मोर्चाच्या समारोपाची सभा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत एकत्रित घेण्यात आली़ याच्यापुढे जात नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत आम्ही काँग्रेसच्या सहकार्याने अध्यक्षपद मिळविले़ मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी विश्वासात घेणे गरजेचे आहे़ स्थानिक पातळीवर दुजाभाव होत असेल तर ‘मौका सभी को मिलता है ’अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला इशारा दिला़