शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८ लाख हेक्टर क्षेत्रात होणार खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ७ लाख ५९ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. पाऊसही सरासरीच्या तुलनेत १०३.७ टक्के झाला. ...

जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ७ लाख ५९ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. पाऊसही सरासरीच्या तुलनेत १०३.७ टक्के झाला. त्यामुळे यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढच अपेक्षित आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने या खरीप हंगामात प्रामुख्याने कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे नियाेजन केले आहे. त्यात तूर, मूग, उडीद आदी पिकांचा पेरा वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा होणारे सोयाबीन पीक आहे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील सोयाबीन बियाणांचा वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी गतवर्षी शेतकऱ्यांकडील ग्राम बीजोत्पादनचा कार्यक्रम हाती घेऊन २ लाख ७६ हजार १७१ क्विंटल सोयाबीन बियाणे यावर्षीच्या पेरणीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या खते, बियाणे, कीटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. चांगल्या प्रतीचे बियाणे, खते शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर १६ असे १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे.

खरीप पेरणीसाठी कृषी विभागाने तूर पिकाच्या ४ हजार ९५ क्विंटलची मागणी केली होती. त्यातील ३ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे, तर मुगाचे १ हजार ८ क्विंटलपैकी ७०० क्विंटल, उडदाचे १ हजार ९४२ पैकी १ हजार १०० क्विंटल, कपाशीचे १० लाख ७९ पॅकेटपैकी १० लाख पॅकेट प्राप्त झाले आहेत. सोयाबीनचे १ लाख २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे यांनी सांगितले. बियाणांचा मुबलक आणि आवश्यकतेपेक्षाही जादा साठा उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.

खतांचा साठाही भरपूर असून, नियमितपणे रेल्वे रॅकद्वारे खतांचा पुरवठा सुरूच आहे. खरिपासाठी जिल्ह्यात २ लाख २ हजार ४१० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यासाठी २ लाख ९ हजार ४० मेट्रिक टन खताचा साठा मंजूर केला आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ५४८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, त्यातील ७५ हजार १६४ मेट्रिक टन खताची विक्रीही झाली आहे.

चौकट -

पीककर्जासाठी १ हजार १६८ कोटींचे उद्दिष्ट

जिल्ह्यात २०२१-२२ या खरीप हंगामासाठी पीककर्जाचे १ हजार १६८ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मे अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४२ कोटी ४५ लाख रुपयेच पीककर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे पेरणीच्या पूर्वी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध झाले तरच शेतकरी खासगी सावकाराच्या दारात जाणार नाही. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामासाठी १ हजार १९ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले होते. हे प्रमाण केवळ ५०.२ टक्के हाेते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पीककर्ज वाटपासाठी बँकांना सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमधूनच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीककर्जासाठी नकारघंटा मिळते.