शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जिल्ह्यात ८ लाख हेक्टर क्षेत्रात होणार खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ७ लाख ५९ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. पाऊसही सरासरीच्या तुलनेत १०३.७ टक्के झाला. ...

जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ७ लाख ५९ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. पाऊसही सरासरीच्या तुलनेत १०३.७ टक्के झाला. त्यामुळे यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढच अपेक्षित आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने या खरीप हंगामात प्रामुख्याने कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे नियाेजन केले आहे. त्यात तूर, मूग, उडीद आदी पिकांचा पेरा वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा होणारे सोयाबीन पीक आहे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील सोयाबीन बियाणांचा वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी गतवर्षी शेतकऱ्यांकडील ग्राम बीजोत्पादनचा कार्यक्रम हाती घेऊन २ लाख ७६ हजार १७१ क्विंटल सोयाबीन बियाणे यावर्षीच्या पेरणीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या खते, बियाणे, कीटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. चांगल्या प्रतीचे बियाणे, खते शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर १६ असे १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे.

खरीप पेरणीसाठी कृषी विभागाने तूर पिकाच्या ४ हजार ९५ क्विंटलची मागणी केली होती. त्यातील ३ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे, तर मुगाचे १ हजार ८ क्विंटलपैकी ७०० क्विंटल, उडदाचे १ हजार ९४२ पैकी १ हजार १०० क्विंटल, कपाशीचे १० लाख ७९ पॅकेटपैकी १० लाख पॅकेट प्राप्त झाले आहेत. सोयाबीनचे १ लाख २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे यांनी सांगितले. बियाणांचा मुबलक आणि आवश्यकतेपेक्षाही जादा साठा उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.

खतांचा साठाही भरपूर असून, नियमितपणे रेल्वे रॅकद्वारे खतांचा पुरवठा सुरूच आहे. खरिपासाठी जिल्ह्यात २ लाख २ हजार ४१० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यासाठी २ लाख ९ हजार ४० मेट्रिक टन खताचा साठा मंजूर केला आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ५४८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, त्यातील ७५ हजार १६४ मेट्रिक टन खताची विक्रीही झाली आहे.

चौकट -

पीककर्जासाठी १ हजार १६८ कोटींचे उद्दिष्ट

जिल्ह्यात २०२१-२२ या खरीप हंगामासाठी पीककर्जाचे १ हजार १६८ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मे अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४२ कोटी ४५ लाख रुपयेच पीककर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे पेरणीच्या पूर्वी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध झाले तरच शेतकरी खासगी सावकाराच्या दारात जाणार नाही. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामासाठी १ हजार १९ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले होते. हे प्रमाण केवळ ५०.२ टक्के हाेते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पीककर्ज वाटपासाठी बँकांना सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमधूनच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीककर्जासाठी नकारघंटा मिळते.