शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

केदारगुडा येथील आश्रमशाळा व्यवस्थापनाची विधिमंडळ समितीकडून खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:27 IST

तालुक्यातील एकमेव असलेल्या केदारगुडा येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या गाद्या गेली पाच वर्षांपासून बदलल्याच नाहीत़ शालेय साहित्यही भंगार झाल्याचे पाहून आश्वासन विधिमंडळ समितीने संताप व्यक्त केला़

हदगाव ( नांदेड ): तालुक्यातील एकमेव असलेल्या केदारगुडा येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या गाद्या गेली पाच वर्षांपासून बदलल्याच नाहीत़ शालेय साहित्यही भंगार झाल्याचे पाहून आश्वासन विधिमंडळ समितीने संताप व्यक्त केला.

बुधवारी रात्री ७़३० ते १० अडीच तास या शाळेची कसून चौकशी करण्यात आली़ या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणार्‍या शालेय साहित्याचा दर्जा कनिष्ठ असल्याचे समितीने नमूद केले तर सन २०१२ मध्ये झोपण्यासाठी देण्यात आलेल्या गाद्याही बदलण्यात आल्या नाहीत़ या गाद्या नॉयलॉनच्या आहेत़ त्यामुळे त्या चपटून गेलेल्या आहेत. पुस्तके व इतर साहित्य ठेवण्यासाठी दिलेल्या पेट्याही भंगार झाल्या आहेत़ विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या आहाराचे नमुने या समितीने तपासणीसाठी नेले़ तांदूळ नागपूरहून, तूरडाळ लातूरहून, गहू पुण्याहून असे हे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असल्याचे समितीला सांगण्यात आले़ अंथरूण, पांघरूणचा दर्जा, थंडीसाठी दिले जाणारे स्वेटर याविषयी सहाय्यक आयुक्तांना समितीने धारेवर धरले़.

स्त्री अधीक्षक पद अनेक वर्षांपासून रिक्त होते़, परंतु ते भरल्यामुळे मुलीच्या समस्या मिटल्या़ पुरुष अधीक्षक पदही सध्या भरले असून रिक्त शिक्षकांची पदे तूर्त भरली़ या समितीच्या गाड्याचा ताफाच शाळेत गेल्याने कर्मचार्‍यांची भंबेरी उडाली़ विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवितात की नाही याविषयी अनेक प्रश्न समितीने केले़ शाळेचा लेखी अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ शुक्रवारी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़ 

व्यवस्थापन समितीची पाचावर धारणआश्वासन समितीच्या सदस्यांनी केदारगुडा येथील आश्रमशाळेची पाहणी केल्यानंतर तेथील गंभीर परिस्थिती पाहून संताप व्यक्त केला़ यावेळी व्यवस्थापनावर प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली होती़